शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

चिखलदऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:38 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविदर्भाच्या नंदनवनात पाणी पेटले : पर्यटकांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.सिडकोनंतर कोट्यवधीच्या विकासकामाचा कांगावा केला जात असला तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य बारा वर्षांपासून पाचवीला पुजलेले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो आराखडे कागदावरच आखण्यात आले. चिखलदरा शहर विकास प्राधिकरण अंतर्गत तयार बागलिंगा प्रकल्पाची उभारणी भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी असताना प्रत्यक्षात बारा वर्षांपासून चिखलदरावासीयांची फरफट थांबलेली नाही. पाण्याअभावी पर्यटकांनीसुद्धा सुविधा मिळत नसल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीतला आखलेला बेत रद्द केला आहे.टँकरने विकतचे पाणीपर्यटनस्थळावरील हॉटेल व्यावसायिकांना प्रतिटँकर सहाशे रुपये दराने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. सहा लाख लिटर दररोज हवे असताना दिवसाआड साडेचार लाख लिटर पाणी नळावाटे सोडले जात आहे.आठशे ग्राहक अन् तलाव कोरडेचिखलदरा शहराला जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. चिखलदºयात केवळ ८६९ ग्राहक आहेत. त्यांना दररोज सहा लक्ष लिटर पाणी आवश्यक आहे. शहरातील शक्कर तलाव आटला. कालापाणी तलावात मोजकाच जलसाठा उपलब्ध आहे. शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी गावातून चिखलदरा शहराची तहान भागविली जात आहे. शक्कर तलाव इंग्रजकालीन असला तरी १२ वर्षांपूर्वी खोदकामासोबत भूसुरुंग (ब्लास्टिंग) केल्याने खोलपर्यंत भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यातच तलावातील पाणी वाहून जाते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे स्वारस्य कुणीही दाखविले नाही.पाण्याऐवजी घोषणांचा पाऊसचिखलदरा शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. त्यालगत चंद्रभागा, सपन, शहानूर आदी प्रकल्पासह इतर लहान-मोठे तलाव आहेत. प्रत्यक्षात दरवर्षी उन्हाळा येताच पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. तरीसुद्धा स्थानिक प्रशासनासह कोणीच गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र नागरिकांसह पर्यटकांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई