शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

चिखलदऱ्यात दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:38 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविदर्भाच्या नंदनवनात पाणी पेटले : पर्यटकांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.सिडकोनंतर कोट्यवधीच्या विकासकामाचा कांगावा केला जात असला तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य बारा वर्षांपासून पाचवीला पुजलेले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो आराखडे कागदावरच आखण्यात आले. चिखलदरा शहर विकास प्राधिकरण अंतर्गत तयार बागलिंगा प्रकल्पाची उभारणी भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी असताना प्रत्यक्षात बारा वर्षांपासून चिखलदरावासीयांची फरफट थांबलेली नाही. पाण्याअभावी पर्यटकांनीसुद्धा सुविधा मिळत नसल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीतला आखलेला बेत रद्द केला आहे.टँकरने विकतचे पाणीपर्यटनस्थळावरील हॉटेल व्यावसायिकांना प्रतिटँकर सहाशे रुपये दराने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. सहा लाख लिटर दररोज हवे असताना दिवसाआड साडेचार लाख लिटर पाणी नळावाटे सोडले जात आहे.आठशे ग्राहक अन् तलाव कोरडेचिखलदरा शहराला जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. चिखलदºयात केवळ ८६९ ग्राहक आहेत. त्यांना दररोज सहा लक्ष लिटर पाणी आवश्यक आहे. शहरातील शक्कर तलाव आटला. कालापाणी तलावात मोजकाच जलसाठा उपलब्ध आहे. शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी गावातून चिखलदरा शहराची तहान भागविली जात आहे. शक्कर तलाव इंग्रजकालीन असला तरी १२ वर्षांपूर्वी खोदकामासोबत भूसुरुंग (ब्लास्टिंग) केल्याने खोलपर्यंत भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यातच तलावातील पाणी वाहून जाते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे स्वारस्य कुणीही दाखविले नाही.पाण्याऐवजी घोषणांचा पाऊसचिखलदरा शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. त्यालगत चंद्रभागा, सपन, शहानूर आदी प्रकल्पासह इतर लहान-मोठे तलाव आहेत. प्रत्यक्षात दरवर्षी उन्हाळा येताच पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. तरीसुद्धा स्थानिक प्रशासनासह कोणीच गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र नागरिकांसह पर्यटकांमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई