शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अखेर कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST

कॅप्शन - कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ जुलैला प्रकाशित केले होते. उच्च न्यायालयाचा दणका, कारागृह अपर ...

कॅप्शन - कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ जुलैला प्रकाशित केले होते.

उच्च न्यायालयाचा दणका, कारागृह अपर पोलीस महासंचालकांनी मागविले ३१ जानेवारीपर्यंत ई-मेलवर अर्ज

गणेश वासनिक -अमरावती : गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एककल्ली कारभारामुळे रखडलेल्या कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. परिणामी अपर पोलीस महासंचालक (कारागृह) यांनी ३१ जानेवारीपर्यंत ई-मेलवर बदली अर्ज मागविले आहेत. उशिरा का होईना, कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे.

धुळे जिल्हा कारागृहातील एका रक्षकाने १७ जानेवारी २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांना पत्र पाठविले. यात कारागृह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी न्यायालयाचा अवमान कसा करतात, हे पुराव्यानिशी मांडण्यात आले होते. पीआयएल-सीजे-एलडी-व्हीसी-२ ऑफ ॲन्ड २ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान होत असल्याचे त्याने सांगितले. औरंगाबाद मध्य विभाग कारागृह उपमहानिरीक्षकांकडे सन २०१६ ते २०२० दरम्यान पती-पत्नी एकत्रित शासन धोरणातंर्गत बदली विनंती अर्ज सादर केल्याचे पुरावेसुद्धा पाठविले होते. अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक (कारागृह सुधार

व सेवा) यांनी सन २०१९ पासून कारभार स्वीकारल्यानंतर वेगवेगळी तांत्रिक कारणे देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदलीपासून वंचित ठेवले, असा आक्षेप या रक्षकाने घेतला होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने या कारागृह रक्षकाची कैफीयत जाणून घेतली. एक रक्षकाने वरिष्ठाविरुद्ध आवाज बुलंद करताच त्याच्या मागणीची दखल उच्च न्यायालयाने घेतली. याचिकेतील सुनावणीनुसार ऐच्छिक जागांवर पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असे आदेश उच्च न्यायालयाने कारागृह विभागाच्या वरिष्ठांना दिलेत. त्याअनुषंगाने अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी १८ जानेवारी २०२१ रोजी एक पत्र निर्गमित करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना

सर्वसाधारण बदल्या, विनंती बदलीसाठी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

---------------------

जुलै २०२० पासून रखडल्या होत्या बदल्या

कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या जुलै २०२० पासून रखडल्या आहेत. वरिष्ठांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या बदलीसंदर्भात आदेशाचे वेगळे अर्थ काढले. त्यामुळे कोरोना संसर्गाचा फटका कारागृहातील बदलीपात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसला. मात्र, आता सार्वत्रिक बदल्या २०२१ अन्वये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविले आहे. यात सर्वसाधारण बदलीसाठी सहा वर्षे सेवेचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे, तर विनंती बदलीमध्ये बदलीचा कालावधी पूर्ण झालेला नाही, पण तातडीचे, अत्यंत निकडीचे कारणास्तव बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. बदलीसाठी सबळ पुरावे मुख्यालयात सादर करावे लागणार आहे.

----------------------------