शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

अखेर कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:14 IST

कॅप्शन - कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ जुलैला प्रकाशित केले होते. उच्च न्यायालयाचा दणका, कारागृह अपर ...

कॅप्शन - कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २७ जुलैला प्रकाशित केले होते.

उच्च न्यायालयाचा दणका, कारागृह अपर पोलीस महासंचालकांनी मागविले ३१ जानेवारीपर्यंत ई-मेलवर अर्ज

गणेश वासनिक -अमरावती : गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एककल्ली कारभारामुळे रखडलेल्या कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. परिणामी अपर पोलीस महासंचालक (कारागृह) यांनी ३१ जानेवारीपर्यंत ई-मेलवर बदली अर्ज मागविले आहेत. उशिरा का होईना, कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे.

धुळे जिल्हा कारागृहातील एका रक्षकाने १७ जानेवारी २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांना पत्र पाठविले. यात कारागृह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी न्यायालयाचा अवमान कसा करतात, हे पुराव्यानिशी मांडण्यात आले होते. पीआयएल-सीजे-एलडी-व्हीसी-२ ऑफ ॲन्ड २ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान होत असल्याचे त्याने सांगितले. औरंगाबाद मध्य विभाग कारागृह उपमहानिरीक्षकांकडे सन २०१६ ते २०२० दरम्यान पती-पत्नी एकत्रित शासन धोरणातंर्गत बदली विनंती अर्ज सादर केल्याचे पुरावेसुद्धा पाठविले होते. अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक (कारागृह सुधार

व सेवा) यांनी सन २०१९ पासून कारभार स्वीकारल्यानंतर वेगवेगळी तांत्रिक कारणे देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदलीपासून वंचित ठेवले, असा आक्षेप या रक्षकाने घेतला होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने या कारागृह रक्षकाची कैफीयत जाणून घेतली. एक रक्षकाने वरिष्ठाविरुद्ध आवाज बुलंद करताच त्याच्या मागणीची दखल उच्च न्यायालयाने घेतली. याचिकेतील सुनावणीनुसार ऐच्छिक जागांवर पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असे आदेश उच्च न्यायालयाने कारागृह विभागाच्या वरिष्ठांना दिलेत. त्याअनुषंगाने अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी १८ जानेवारी २०२१ रोजी एक पत्र निर्गमित करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना

सर्वसाधारण बदल्या, विनंती बदलीसाठी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

---------------------

जुलै २०२० पासून रखडल्या होत्या बदल्या

कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या जुलै २०२० पासून रखडल्या आहेत. वरिष्ठांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या बदलीसंदर्भात आदेशाचे वेगळे अर्थ काढले. त्यामुळे कोरोना संसर्गाचा फटका कारागृहातील बदलीपात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसला. मात्र, आता सार्वत्रिक बदल्या २०२१ अन्वये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अर्ज मागविले आहे. यात सर्वसाधारण बदलीसाठी सहा वर्षे सेवेचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे, तर विनंती बदलीमध्ये बदलीचा कालावधी पूर्ण झालेला नाही, पण तातडीचे, अत्यंत निकडीचे कारणास्तव बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. बदलीसाठी सबळ पुरावे मुख्यालयात सादर करावे लागणार आहे.

----------------------------