शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

अखेर जिल्हा दुष्काळग्रस्त

By admin | Updated: January 1, 2016 00:37 IST

यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४३ पैसे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. १ हजार ९६७ गावांत ५० पैशांच्या आत

गजानन मोहोड ल्ल अमरावतीयंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४३ पैसे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. १ हजार ९६७ गावांत ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त असण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. याविषयी शासनाच्या घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांना शासनाच्या सोई-सवलती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून पावसांची दडी, व नंतर पावसात खंड यामुळे जिल्ह्यातील ३ लाख १९ हजार ९९५ हेक्टरमधील सोयाबीन उद्ध्वस्त झाले. क्विंटल ऐवजी किलोमध्ये उतारी आली. शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत असताना शासनाने १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६५ पैशांपेक्षा कमी व अधिक या निकषा नुसार जिल्ह्यात ५९ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित केली होती. ही दुष्काळजन्य स्थिती गृहीत धरण्यात आली. मात्र एकाच आठवड्यात शासनाने निर्णय फिरविला. २३ सप्टेंबरला सुधारित निकष मागे घेऊन प्रचलीत ५० पैशांपेक्षा कमी किंवा अधिक अशी पैसेवारी घोषित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जिल्ह्यात खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ३२ आॅक्टोबरला ४६ पैसे जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती तालुका ३७ पैसे, भातकुली ४४, नांदगाव खंडेश्वर ४९, चांदूररेल्वे ४५, धामणगाव ४७, तिवसा ४३, मोर्शी ४८, वरुड ४९, अचलपूर ४७, चांदूरबाजार ४७, दर्यापूर ४८, अंजनगाव ४७, धारणी ४२ व चिखलदरा तालुक्यात ४५ पैसे ही पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान ३ आॅक्टोबर रोजी शासनाने पैसेवारी काढण्याविषयी सर्वसमावेशक निर्णय घेतला. त्या अनुषंगाने यंदाच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. ही ५० पैशांच्या आत असल्याने जिल्ह्यात दुष्काळस्थिती असल्याविषयी शिक्कामोर्तब झाले आहे.या सवलती मिळणार ४जमीन महसुलात सूट४सहकारी कर्जाचे पुर्नगठन४शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती४कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५ टक्के इतकी सूट४शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी४रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता ४आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर४शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.शासनाने यापूर्वी जाहीर केलेले दुष्काळग्रस्त जिल्हे हे कमी पाऊस या निकषावर आधारित होते. त्या तुलनेत जिल्ह्यात पाऊस ८० ते ९० टक्के होता. मात्र खरीप पिकांची सुधारित आणि अतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार आहे. - किरण गित्ते, जिल्हाधिकारी.महसूलमंत्र्यांना कधी येणार जाग ? ४राज्यातील दुष्काळग्रस्त काही जिल्ह्यांची यादी आॅक्टोबर अखेरीस महसूल मंत्र्यांनी जाहीर केली होती. तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ना. एकनाथ खडसे यांनी राज्यातील उर्वरित काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी घोषित करण्यात येईल, अशी घोषणा अकोला येथे माध्यमांशी बोलताना केली होती. मात्र डिसेंबरअखेर झाला असतानाही महसूल मंत्र्यांनी याविषयी घोषणा केलेली नाही. आता जिल्ह्यासह विभागातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने महसूलमंत्री जिल्हा दुष्काळाची केव्हा घोषणा करणार, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.