शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

अखेर जिल्हा दुष्काळग्रस्त

By admin | Updated: January 1, 2016 00:37 IST

यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४३ पैसे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. १ हजार ९६७ गावांत ५० पैशांच्या आत

गजानन मोहोड ल्ल अमरावतीयंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४३ पैसे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. १ हजार ९६७ गावांत ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त असण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. याविषयी शासनाच्या घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांना शासनाच्या सोई-सवलती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून पावसांची दडी, व नंतर पावसात खंड यामुळे जिल्ह्यातील ३ लाख १९ हजार ९९५ हेक्टरमधील सोयाबीन उद्ध्वस्त झाले. क्विंटल ऐवजी किलोमध्ये उतारी आली. शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत असताना शासनाने १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६५ पैशांपेक्षा कमी व अधिक या निकषा नुसार जिल्ह्यात ५९ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित केली होती. ही दुष्काळजन्य स्थिती गृहीत धरण्यात आली. मात्र एकाच आठवड्यात शासनाने निर्णय फिरविला. २३ सप्टेंबरला सुधारित निकष मागे घेऊन प्रचलीत ५० पैशांपेक्षा कमी किंवा अधिक अशी पैसेवारी घोषित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जिल्ह्यात खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ३२ आॅक्टोबरला ४६ पैसे जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती तालुका ३७ पैसे, भातकुली ४४, नांदगाव खंडेश्वर ४९, चांदूररेल्वे ४५, धामणगाव ४७, तिवसा ४३, मोर्शी ४८, वरुड ४९, अचलपूर ४७, चांदूरबाजार ४७, दर्यापूर ४८, अंजनगाव ४७, धारणी ४२ व चिखलदरा तालुक्यात ४५ पैसे ही पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान ३ आॅक्टोबर रोजी शासनाने पैसेवारी काढण्याविषयी सर्वसमावेशक निर्णय घेतला. त्या अनुषंगाने यंदाच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. ही ५० पैशांच्या आत असल्याने जिल्ह्यात दुष्काळस्थिती असल्याविषयी शिक्कामोर्तब झाले आहे.या सवलती मिळणार ४जमीन महसुलात सूट४सहकारी कर्जाचे पुर्नगठन४शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती४कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५ टक्के इतकी सूट४शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी४रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता ४आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर४शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.शासनाने यापूर्वी जाहीर केलेले दुष्काळग्रस्त जिल्हे हे कमी पाऊस या निकषावर आधारित होते. त्या तुलनेत जिल्ह्यात पाऊस ८० ते ९० टक्के होता. मात्र खरीप पिकांची सुधारित आणि अतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार आहे. - किरण गित्ते, जिल्हाधिकारी.महसूलमंत्र्यांना कधी येणार जाग ? ४राज्यातील दुष्काळग्रस्त काही जिल्ह्यांची यादी आॅक्टोबर अखेरीस महसूल मंत्र्यांनी जाहीर केली होती. तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ना. एकनाथ खडसे यांनी राज्यातील उर्वरित काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी घोषित करण्यात येईल, अशी घोषणा अकोला येथे माध्यमांशी बोलताना केली होती. मात्र डिसेंबरअखेर झाला असतानाही महसूल मंत्र्यांनी याविषयी घोषणा केलेली नाही. आता जिल्ह्यासह विभागातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने महसूलमंत्री जिल्हा दुष्काळाची केव्हा घोषणा करणार, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.