शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हा दुष्काळग्रस्त

By admin | Updated: January 1, 2016 00:37 IST

यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४३ पैसे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. १ हजार ९६७ गावांत ५० पैशांच्या आत

गजानन मोहोड ल्ल अमरावतीयंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४३ पैसे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. १ हजार ९६७ गावांत ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त असण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. याविषयी शासनाच्या घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व गावांना शासनाच्या सोई-सवलती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून पावसांची दडी, व नंतर पावसात खंड यामुळे जिल्ह्यातील ३ लाख १९ हजार ९९५ हेक्टरमधील सोयाबीन उद्ध्वस्त झाले. क्विंटल ऐवजी किलोमध्ये उतारी आली. शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत असताना शासनाने १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६५ पैशांपेक्षा कमी व अधिक या निकषा नुसार जिल्ह्यात ५९ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित केली होती. ही दुष्काळजन्य स्थिती गृहीत धरण्यात आली. मात्र एकाच आठवड्यात शासनाने निर्णय फिरविला. २३ सप्टेंबरला सुधारित निकष मागे घेऊन प्रचलीत ५० पैशांपेक्षा कमी किंवा अधिक अशी पैसेवारी घोषित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जिल्ह्यात खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ३२ आॅक्टोबरला ४६ पैसे जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती तालुका ३७ पैसे, भातकुली ४४, नांदगाव खंडेश्वर ४९, चांदूररेल्वे ४५, धामणगाव ४७, तिवसा ४३, मोर्शी ४८, वरुड ४९, अचलपूर ४७, चांदूरबाजार ४७, दर्यापूर ४८, अंजनगाव ४७, धारणी ४२ व चिखलदरा तालुक्यात ४५ पैसे ही पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान ३ आॅक्टोबर रोजी शासनाने पैसेवारी काढण्याविषयी सर्वसमावेशक निर्णय घेतला. त्या अनुषंगाने यंदाच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. ही ५० पैशांच्या आत असल्याने जिल्ह्यात दुष्काळस्थिती असल्याविषयी शिक्कामोर्तब झाले आहे.या सवलती मिळणार ४जमीन महसुलात सूट४सहकारी कर्जाचे पुर्नगठन४शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती४कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५ टक्के इतकी सूट४शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी४रोहयोअंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता ४आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर४शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.शासनाने यापूर्वी जाहीर केलेले दुष्काळग्रस्त जिल्हे हे कमी पाऊस या निकषावर आधारित होते. त्या तुलनेत जिल्ह्यात पाऊस ८० ते ९० टक्के होता. मात्र खरीप पिकांची सुधारित आणि अतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार आहे. - किरण गित्ते, जिल्हाधिकारी.महसूलमंत्र्यांना कधी येणार जाग ? ४राज्यातील दुष्काळग्रस्त काही जिल्ह्यांची यादी आॅक्टोबर अखेरीस महसूल मंत्र्यांनी जाहीर केली होती. तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ना. एकनाथ खडसे यांनी राज्यातील उर्वरित काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची यादी घोषित करण्यात येईल, अशी घोषणा अकोला येथे माध्यमांशी बोलताना केली होती. मात्र डिसेंबरअखेर झाला असतानाही महसूल मंत्र्यांनी याविषयी घोषणा केलेली नाही. आता जिल्ह्यासह विभागातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने महसूलमंत्री जिल्हा दुष्काळाची केव्हा घोषणा करणार, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.