शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

हिवाळ्यातही पाणी पेटले

By admin | Updated: December 10, 2014 22:50 IST

मोर्शी तालुक्यातील तळणी येथे पिण्याच्या पाण्याची ऐन हिवाळ्यात टंचाई निर्माण झाली असून गावाला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

नरेंद्र निकम - तळणीमोर्शी तालुक्यातील तळणी येथे पिण्याच्या पाण्याची ऐन हिवाळ्यात टंचाई निर्माण झाली असून गावाला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.महत्त्वाकांक्षी सत्तरगाव पाणी पुरवठा योजना मागील दोन वर्षांपासून बंद पडल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या गावांना जलस्त्रोत शोधावे लागत आहे. ही योजना बंद पडल्यामळे अनेक गावांत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरु करावी लागत आहे. यासाठी नवीन आराखडे मंजूर झाले असले तरी प्रत्यक्षात काम सुरु होऊन पाणीपुरवठा व्हायला अजूनही सहा महिने लागू शकतात. एकीकडे शासनाने दोन अब्ज रुपयांची सत्तर गाव योजना दोन कोटी रुपयाच्या विद्युत बिलापोटी बंद पाडली. दुसरीकडे प्रत्येक गावांना नवीन योजनांसाठी ५०-५० लाखांचा निधी मंजूर केला जात आहे. एवढे करुनही अपुरा पावसाळा किंवा कोरडा दुष्काळ पडल्यास पाणी पुरवठ्याची कोणतीही हमी नाही.सत्तरगाव पाणीपुरवठा योजना सुरु असताना मोर्शी तालुक्यात साथीचे आजार पावसाळ्यात नगण्य असायचे. यावर्षी मात्र याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. लगतच्या निंभी गावात योजना बंद पडल्यावर दोनदा साथीच्या आजाराने थैमान घातले होते.यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच शेताताल विहिरींची पाणी पातळी घटली असून डिसेंबर, जानेवारीत कृषी पंप सुरु करावे लागणार नाही, अशी विदारक स्थिती आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहण केलेल्या विहिरीवरुन पाणीपुरवठा करणे शक्य होत नसून तळणी गावात आताच दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे, अशी स्थिती सत्तरगाव पाणीपुरवठा योजनेवर दोन वर्षांपूर्वी अवलंबून असलेल्या अनेक गावांची झाली आहे.ही योजना बंद पडल्यामुळे योजनेचे लोखंडी साहित्य बेवारस स्थितीत असून चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपळखुटा (मोठा) येथील जलशुध्दीकरण यंत्रणा धूळखात पडली असून या ठिकाणी असलेले कार्यालय, मोठी इमारत बेवारस झाली आहे. १० वर्षांपूर्वी ८४ कोटी रुपये खर्चून निर्मिलेली ही योजना आज दोन अब्ज रुपये किमतीची झाली आहे. एवढा खर्च करुनही केवळ दोन कोटी रुपये वीज बिलापोटी ही योजना बंद पडली पुन्हा सुरु होण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. त्यामुळे जनता तहानलेलीच राहणार आहे.दुसरीकडे तहानलेल्या गावांसाठी कोट्यवधी रुपयांच्या नवीन योजनांना शासन मान्यता देत आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या दुष्काळामुळे स्थानिक योजनांना भविष्य नाही. महावितरणने पाणीपुरवठा योजनेला व्यावसायिक दर लावल्यामुळे बिलाची रक्कम वाढत गेली. त्यामुळे ग्रामपंचायतींना सदर बिले भरणे कठीण होत गेले. एक लिटर मिनरल वाटरच्या बॉटलची किंमत बाजारात १५ रुपये मोजावे लागते तर ९० रुपये महिन्याचे शुध्द पाणी घरपोच मिळत असतानाही जनतेने किमतीचा कांगावा करीत योजनेचे महत्त्व समजून न घेता योजना बंद पडू दिली. सुरुवातील अनेक मोठ्या ग्रामंपाचयतींवर थकीत बिले असल्यामुळे त्या गावांनी पाणी नाकारून योजनेतून बाहेर पडले. नियमित वसुली देणाऱ्या गावांवर योजनेचा डोलारा चालू शकत नाही.