शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काळाबाजार रोखण्यासाठी १५ भरारी पथके स्थापित

By admin | Updated: April 26, 2015 00:13 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाल्याने यावर्षी बियाण्याची टंचाई भासणार आहे.

महिनाभरावर खरीप : जिल्हा कृषी अधिकारी उदय काथोडे यांची माहितीअमरावती : मागील वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाल्याने यावर्षी बियाण्याची टंचाई भासणार आहे. याचा फायदा घेऊन बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, तसेच अप्रमाणित बियाणे विकले जाऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यात एक व जिल्ह्याचे एक असे १५ भरारी पथके नेमण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी उदय काथोडे यांनी दिली. याच अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात सर्व कृषी केंद्रधारकांची बैठक येत्या ५ मे पर्यंत घेण्यात येऊन त्यांना याविषयी सूचना दिली जाणार आहे. बियाण्यांचा काळाबाजार व अप्रमाणित बियाणे किंवा एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास त्या दुकानांचा परवाना रद्द करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती काथोडे यांनी दिली. शेतकऱ्यांना बियाण्यांविषयी शंका असल्यास किंवा दुकानदार अधिक दराने विक्री करीत असल्यास १८००००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यात अपुऱ्या पावसाअभावी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परंतु असणाऱ्या सोयाबीनमध्ये उगवाणशक्ती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यांवर बीज प्रकिया करुन पेरणी करण्यास हरकत नाही. मागील हंगामात सोयबाीन काढणीच्या वेळी पाऊ स आल्यामुळे सोयाबीन डागी झाले. त्यामुळे उगवणशक्तीवर परिणाम झाला होता. यावेळेस अशी स्थिती नाही, असे काथोडे यांनी सांगितले. यावर्षी जवळपास साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान दोन लाख क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. यापैकी सार्वजनिक ७५ हजार, खासगी ३९ हजार ७५० व महाबीजव्दारा ५० हजार बियाणे उपलब्ध होणार असल्याने फारशी टंचाई राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. बियाणे खरेदी करताना अशी घ्या काळजीअधिकृत परवानाधारक दुकानदाराकडून कपाशी बियाण्यांची खरेदी करावी. बियाणे खरेदी केल्यावर त्याचे पक्के बिल न चुकता घ्यावे.कपाशी बियाण्यांच्या पाकिटावरील सरकारमान्य चिन्ह तपासून घ्यावे. बोलगार्ड-१ मध्ये उपलब्ध वाण ८३० रुपये व बोलगार्ड-२ मधील वाणांची ९३० रुपये या शासनमान्य दरानेच खरेदी करावी.सरकारमान्य बोलगार्डचे चिन्ह व बोलगार्ड २ चिन्हासोबत दोन उभ्या रेषा तपासून घ्याव्यात.दुकानदार पक्की पावती देत नसल्यास १८००००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.बियाण्यांचे पाकीट वरच्या बाजूने न फाडता खालच्या बाजूने फाडावे.बियाण्यांचे पाकीट सीलबंद/मोहरबंद असल्याची खात्री करुनच खरेदी करावे. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटवरची अंतिम मुदत तपासावी.टॅग व लेबल पाहूनच करावी बियाण्यांची खरेदीबियाण्यांच्या पिशवीवरील टॅग बघूनच बियाणे खरेदी करावे. या टॅगवरील लॉट नंबरवरुन त्या बियाण्यांची निर्मिती करणारे राज्य व बियाणे निर्मिती करणारे राज्य कळते. त्यामुळे फसवणूक टाळता येते. लेबल नसलेल्या बियाण्यांचे पाकीट खरेदी केल्यास फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नावाने होऊ शकते फसगतआरआर, राऊंडअप बीटी, तणावरची बीटी, वीडर्गा यासह अन्य नावाने बोगस व बेकायदेशीर बियाणे विक्री होण्याची शक्यता आहे. हे बियाणे अधिकृत नाहीत, या बियाण्यांच्या विक्रीला शासनाची परवानगी नाही. हे बियाणे जादा दराने विकले जातात व बिल दिले जात नाही. या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नसतो. पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण दिलेले नसते. या बियाण्यांमुळे शतीचे व पर्यावरणाचे नुकसान होते.