शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी नववधूचे पलायन

By admin | Updated: May 15, 2014 23:05 IST

चांदूररेल्वे/तळेगाव : लग्नाच्या तिसर्‍या दिवशीच नवर्‍या मुलाची व नातेवाईकांची नजर चुकवून नववधूने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना तालुक्यातील सातेफळ येथे बुधवारी दुपारी घडली.

चांदूररेल्वे/तळेगाव : लग्नाच्या तिसर्‍या दिवशीच नवर्‍या मुलाची व नातेवाईकांची नजर चुकवून नववधूने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना तालुक्यातील सातेफळ येथे बुधवारी दुपारी घडली. प्रियकरासह नववधूला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.

सातेफळ येथील तरुणीचा विवाह दारव्हा येथील नीलेश महादेव शेलोकार या युवकासोबत ठरला होता. १२ मे रोजी सातेफळ येथे वधूमंडपी धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला. सायंकाळी नवरी मुलीचा ‘बिदाई’चा कार्यक्रम पार पडला. मुलीला सासरी पाठविताना तिच्या आई-वडील आणि इतरांचेही मन भरुन आले. त्यानंतर ही नववधू वरासह दारव्हा येथे पोहोचली. त्या ठिकाणीही नववधूचे पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. मुलाकडील सत्यनाराणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नीलेश दुसर्‍या दिवशी या नवधूला घेऊन तिच्या माहेरी म्हणजे सातेफळ गावात घेऊन आला. १४ मे रोजी मुलीकडेही सत्यनाराणाच्या पूजेचा कार्यक्रम पार पडला. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. घरासमोर जेवणावळ सुरु होती. ज्येष्ठ मंडळी एकमेकांच्या भेटी-गाठी आणि चर्चेत मग्न होते. महिला मंडळीही एकमेकींच्या ख्यालखुशालीत मग्न होत्या. दरम्यान नववधू व तिच्या प्रियकरामध्ये कधी संवाद साधल्या गेला आणि कधी पळून जाण्याची योजना आखली याची पुसटशी कल्पनाही घरच्या मंडळींना नव्हती. १४ मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नववधू व तिच्या प्रियकरामध्ये तयार केलेल्या योजनेप्रमाणे प्रियकराने तिच्या घराच्या मागील बाजुला चार चाकी वाहन आणून उभे केले. नववधूने वेळीच संधी साधून घरातून मागच्या दाराने पळ काढून प्रियकराच्या वाहनाने पोबारा केला. काही वेळानंतर नवरी मुलगी दिसत नसल्याचे पाहून शेजार्‍यांकडे तिचा शोध घेणे सुरु झाले. तिच्या मैत्रींकडेही शोधाशोध सुरु झाली. या प्रकरणाची कुजबूज लग्नमंडपातील पाहुणे मंडळींपर्यंत पोहोचली. काही वेळानंतरच सत्य उघड झाले आणि दोन दिवसांपूर्वी बोहल्यावर चढलेली वधू प्रियकरासोबत पळाल्याचे निश्‍चित झाली. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच वर नीलेशने थेट तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. तत्पूर्वी मुलीच्या वडिलांनीही आपली मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. पोलिसांनी याघटनेची माहिती ‘वारलेस’हून सर्व पोलीस ठाण्याला देण्यात आली. बुधवारीच रात्री नववधू व तिचा प्रियकर ज्ञानेश्‍वर किसन ढोणे (२६, जळका जगताप) हे दोघे औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही माहिती तळेगाव पोलिसांना मिळाली. पोलीस पथक औरंगाबादकरिता रवाना झाले. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरु होती.