शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी नववधूचे पलायन

By admin | Updated: May 15, 2014 23:05 IST

चांदूररेल्वे/तळेगाव : लग्नाच्या तिसर्‍या दिवशीच नवर्‍या मुलाची व नातेवाईकांची नजर चुकवून नववधूने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना तालुक्यातील सातेफळ येथे बुधवारी दुपारी घडली.

चांदूररेल्वे/तळेगाव : लग्नाच्या तिसर्‍या दिवशीच नवर्‍या मुलाची व नातेवाईकांची नजर चुकवून नववधूने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना तालुक्यातील सातेफळ येथे बुधवारी दुपारी घडली. प्रियकरासह नववधूला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.

सातेफळ येथील तरुणीचा विवाह दारव्हा येथील नीलेश महादेव शेलोकार या युवकासोबत ठरला होता. १२ मे रोजी सातेफळ येथे वधूमंडपी धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला. सायंकाळी नवरी मुलीचा ‘बिदाई’चा कार्यक्रम पार पडला. मुलीला सासरी पाठविताना तिच्या आई-वडील आणि इतरांचेही मन भरुन आले. त्यानंतर ही नववधू वरासह दारव्हा येथे पोहोचली. त्या ठिकाणीही नववधूचे पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. मुलाकडील सत्यनाराणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नीलेश दुसर्‍या दिवशी या नवधूला घेऊन तिच्या माहेरी म्हणजे सातेफळ गावात घेऊन आला. १४ मे रोजी मुलीकडेही सत्यनाराणाच्या पूजेचा कार्यक्रम पार पडला. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. घरासमोर जेवणावळ सुरु होती. ज्येष्ठ मंडळी एकमेकांच्या भेटी-गाठी आणि चर्चेत मग्न होते. महिला मंडळीही एकमेकींच्या ख्यालखुशालीत मग्न होत्या. दरम्यान नववधू व तिच्या प्रियकरामध्ये कधी संवाद साधल्या गेला आणि कधी पळून जाण्याची योजना आखली याची पुसटशी कल्पनाही घरच्या मंडळींना नव्हती. १४ मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नववधू व तिच्या प्रियकरामध्ये तयार केलेल्या योजनेप्रमाणे प्रियकराने तिच्या घराच्या मागील बाजुला चार चाकी वाहन आणून उभे केले. नववधूने वेळीच संधी साधून घरातून मागच्या दाराने पळ काढून प्रियकराच्या वाहनाने पोबारा केला. काही वेळानंतर नवरी मुलगी दिसत नसल्याचे पाहून शेजार्‍यांकडे तिचा शोध घेणे सुरु झाले. तिच्या मैत्रींकडेही शोधाशोध सुरु झाली. या प्रकरणाची कुजबूज लग्नमंडपातील पाहुणे मंडळींपर्यंत पोहोचली. काही वेळानंतरच सत्य उघड झाले आणि दोन दिवसांपूर्वी बोहल्यावर चढलेली वधू प्रियकरासोबत पळाल्याचे निश्‍चित झाली. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच वर नीलेशने थेट तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. तत्पूर्वी मुलीच्या वडिलांनीही आपली मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. पोलिसांनी याघटनेची माहिती ‘वारलेस’हून सर्व पोलीस ठाण्याला देण्यात आली. बुधवारीच रात्री नववधू व तिचा प्रियकर ज्ञानेश्‍वर किसन ढोणे (२६, जळका जगताप) हे दोघे औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही माहिती तळेगाव पोलिसांना मिळाली. पोलीस पथक औरंगाबादकरिता रवाना झाले. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरु होती.