शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

अनधिकृत बियाण्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास; आठ कंपन्या एसआयटीचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:41 IST

बीटी बियाण्यांमध्ये विनापरवानगी तणनाशकाला सहनशील करणाऱ्या जनुकांचा वापर करणाऱ्या आठ बियाणे कंपन्या विशेष तपास (एसआयटी) पथकाचे लक्ष्य राहणार आहे. या कंपन्यांविरोधात पाराशिवणी येथे गुन्हा दाखल आहे.

ठळक मुद्देअवैध उत्पादनविक्री करणाऱ्या अनेक राज्यांमध्ये टोळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बीटी बियाण्यांमध्ये विनापरवानगी तणनाशकाला सहनशील करणाऱ्या जनुकांचा वापर करणाऱ्या आठ बियाणे कंपन्या विशेष तपास (एसआयटी) पथकाचे लक्ष्य राहणार आहे. या कंपन्यांविरोधात पाराशिवणी येथे गुन्हा दाखल आहे. त्या कागदपत्रांची छाननी करून शासनाला अहवाल सादर होणार आहे. या बियाण्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. अशाप्रकारे बियाण्यांची विक्री करणाऱ्या टोळ्या अनेक राज्यांमध्ये कार्यरत असल्याचा शासनाचा अंदाज आहे. त्या दृष्टीेनेदेखील एसआयटी तपास करणार आहे.बीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले जनुक वापरून अवैध विक्री होत असल्याची बाब शासनाच्या निर्दशनात आली. एखाद्या बियाणे कंपनीला केंद्र शासनाने बियाणे अधिनियम १९६६ च्या तरतुदीअंतर्गत अधिसूचित असलेले अथवा नसलेले, परंतु संशोधित जनुक परिवर्तित वाण व्यापारी तत्त्वावर उत्पादित करावयाचे असल्यास, प्रचलित कार्यपद्धतीनुसार अशा कंपनीला जेनेटिक इंजिनीअरिंग अपरायझल कमिटीकडून परवानगी आवश्यक आहे. त्यानंतरच महाराष्ट्रात सदर वाण विकण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून परवानगीची कार्यवाही करण्यात येते.राज्यात सद्यस्थितीत बीटी कापूस बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असलेले जनुक असलेल्या बियाणे विक्रीला कमिटीने मान्यता दिलेली नाही. मात्र, अशा प्रकारचे उत्पादन अनेक कंपन्यांद्वारा राज्यासह देशभरात सुरू आहे. या बियाण्यांची अवैध विक्री, साठवणूक सुरू असून, अशा प्रकारचा अपराध करणाºया टोळ्या अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने आता शासनाद्वारा या कंपन्यांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठीच एसआयटीचा उतारा शासनाने शोधला आहे. या कमिटीच्या शिफारशींवरून आता कारवाई होणार आहे.एकाही बियाणे कंपनीला परवानगी नाहीजनुक परिवर्तित पिकांच्या चाचण्या घेण्यास बियाणे कंपन्यांनी परवानगी मागितल्यामुळे शासनाने १० सदस्यीय राज्य सल्लागार समिती स्थापित केली. देशात सध्या जनुक परिवर्तित पीक म्हणून सन २००२ मध्ये बीजी-१ व सन २००६ मध्ये बीजी-२ या बीटी कपाशीच्या वाणाला राज्यात बियाणे विक्रीला परवानगी आहे. मात्र, केंद्र शासनाने बियाणे अधिनियम १९६६ अन्वये जनुक परिवर्तित वाण उत्पादित करण्याची व विकण्याची परवानगी समितीने एकाही कंपनीला दिलेली नसताना काही बियाणे कंपन्यांनी महाराष्ट्रसह अन्य राज्यातदेखील अवैधपणे बियाणे विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याने पर्यावरणाचीही हानी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस