शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’ झुगारून बडनेऱ्यात ‘एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने लोक गावाकडे परत येत आहेत. लॉकडाऊनला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. शासनाने आहे तिथेच थांबा, घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्यावरही मोठ्या संख्येत लोक पळवाटा शोधत आहेत. अशाच प्रकारे २७ मार्च रोजी १३ जण मुंबईतून बडनेºयात आले. मोदी दवाखान्यात या सर्वांची थर्मल स्क्रीनिंग झाल्यावर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशहर धास्तावले : मुंबईतून १३ जण आले

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : ‘लॉकडाऊन’ झुगारून मुंबईतून खासगी वाहनाने १३ व्यक्ती बडनेºयात आल्याने शहरात भीतीचे वातावरण तयार झाले. या सर्वांचे थर्मल स्क्रीनिंग मोदी दवाखान्यात करण्यात आले. एंट्री चेक पॉइंटला आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे, अन्यथा जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना ही झुंबड अपयशी ठरवेल, असे चित्र आहे.खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने लोक गावाकडे परत येत आहेत. लॉकडाऊनला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. शासनाने आहे तिथेच थांबा, घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्यावरही मोठ्या संख्येत लोक पळवाटा शोधत आहेत. अशाच प्रकारे २७ मार्च रोजी १३ जण मुंबईतून बडनेऱ्यात आले. मोदी दवाखान्यात या सर्वांची थर्मल स्क्रीनिंग झाल्यावर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. एका नगरसेवकाने या सर्वांच्या पाठीशी राहून बरीच धावपळ केली. त्यांच्या घरीच तपासणी करा, असा आग्रहदेखील या नगरसेवकाने प्रशासनाकडे केला होता. मात्र, शहरासाठी ही सहृदयता किती धोकादायक ठरू शकते, याचादेखील विचार झाला पाहिजे, अशी जनभावना याप्रकरणी व्यक्त होत आहे.बडनेºयात वैद्यकीय विभागाची काळजी लोंढ्यामुळे वाढली आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन एकही कोरोनाबाधित रुग्ण असू नये, यासाठी जिवाचे रान करून प्रयत्न करीत आहे. २८ मार्च रोजीदेखील मोठ्या संख्येत ट्रकने जाणारे बडनेरा शहराच्या आऊटरला पकडण्यात आले. चार दिवसांपूर्वीदेखील नाशिकहून ३२ लोक आले होते. चेकपॉइंट तसेच महामार्गावरील पेट्रोलिंग अधिक सतर्क करावी, अशी शहरवासीयाकडून मागणी होत आहे.बडनेºयातील पाच परतले परदेशातूनबडनेरा शहरातीलच पाच जण परदेशातून परत आल्याचे प्रशासनाने सांगितले. या सर्वांचा क्वारंटाइन कालावधी संपला आहे. त्यांना कुठलीच बाधा नव्हती. तथापि, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष दिले जात आहे. ५८ जण मुंबई, पुण्याहून घरी परत आलेले आहे. लपूनछपून आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. लोकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे.रेल्वे थांबवून उपयोग काय; झुंबड सुरूचकोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. पण, ट्रक व इतर वाहनांनी बडनेऱ्यात झुंबड दाखल होत आहे. संचारबंदीचा नियम तोडला जात आहे. बाहेरून येणाऱ्यांकडून संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. अशांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीदेखील पुढे येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस