शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
2
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
3
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
4
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
5
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
6
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
8
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
9
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
10
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
12
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
13
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
14
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
15
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
16
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
17
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
18
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
19
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्रत्येक विहिरीची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:28 IST

राज्याच्या नव्या भूजल अधिनियमानुसार आता प्रत्येक विहीर मालकास विहिरीची नोंदणी २० जानेवारी २०१९ च्या आत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करणे बंधनकारक केले आहे. विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र २० वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य असेल.

ठळक मुद्दे२० वर्षांसाठी परवानगी महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ मध्ये सुधारणा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या नव्या भूजल अधिनियमानुसार आता प्रत्येक विहीर मालकास विहिरीची नोंदणी २० जानेवारी २०१९ च्या आत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करणे बंधनकारक केले आहे. विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र २० वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य असेल. हा मसुदा व नियम सध्या राज्य शासनाचे संकेतस्थळावर नागरिकांच्या अभिप्रायासाठी खुला ठेवण्यात आलेला आहे.महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारा २५ जुलै, २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र भूजल नियम-२०१८ प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक विहीर मालकास (विंधन विहीर/ खोदलेली विहीर/कूपनलिका) आपल्या विहिरीची नोंदणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे १८० दिवसांच्या आत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विहिरीची मालकी ग्रामपंचायतीकडे अथवा अन्य संस्थेकडे असेल तरीही विहिरीची नोंदणी करणे आवश्यक असल्याची बाब या मसुद्यात नमूद आहे. याबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मात्र, प्रत्येक विहिरीसाठी स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक आहे. आता ६० मीटर खोलीची विहीर ही केवळ पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यास परवानगी देण्यात येईल आणि अशी परवानगी देण्याचा अधिकार राज्य भूजल प्राधिकरणास राहणार आहे.आस्तित्वातील खोल विहिरींमधून शेती किंवा औद्योगिक वापरासाठी भूजलाचा उपसा करण्यावर महसूल विभागामार्फत आता कर आकारणी करण्यात येईल. १०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम असेल तर, अशा बांधकामावर पाऊस पाणी साठवण संरचना बांधणे अनिवार्य आहे. त्याशिवाय अशा बांधकामास मान्यता व बांधकामास पाणीपुरवठा व भोगवटाचे प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याची बाब मसुद्यात नमूद आहे.आता भूजलावर आधारित पीक योजनाराज्यातील अधिसूचित क्षेत्रामध्ये भूजलावर आधारित पीक योजना कृषी विभागामार्फत तयार करण्यात येईल. या पीक योजनेनुसारच पिके घेणे अनिवार्य राहणार आहे. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या लागवडीसाठी पिकाच्या पेरणीपूर्वी पाणलोटक्षेत्र जलसंपत्ती समितीकडे अर्ज करावा लागेल.या आहेत महत्त्वाच्या सुधारणा

  • राज्यात विंधन विहीर खोदकामाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या कोणत्याही विंधन यंत्र मालकाला आपल्या यंत्राची नोंदणी जीएसडीएकडे करावी लागेल.
  • अयशस्वी झालेली विंधन विहीर/कूपनलिका ही कायमस्वरूपी बंद करण्याची जबाबदारी विंधन यंत्र मालकाची व जमीन मालकाची असेल.
  • सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या प्रभाव क्षेत्रामधील विहिरींना पूर्णत: अथवा अंशत: बंद करण्याचा अधिकार उपजिल्हाधिकारी यांना असेल.
  •  विहीर पूर्णत: अथवा अंशत: बंद करण्याचा निर्णय झाल्यास शेतातील उभ्या पिकांच्या भरपाईचा अर्ज उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करता येईल.
टॅग्स :Governmentसरकार