शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

इंजिनिअरही कोतवालांच्या शर्यतील; २३१५ परीक्षार्थींनी दिली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 13:41 IST

इनकॅमेरा पेपर चेकिंग, जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन निकालही केला जाहीर

अमरावती : जिल्ह्यातील कोतवालांच्या ११६ रिक्त पदाकरिता रविवारी १४ केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी एकूण ५,३५६ परीक्षार्थींनी अर्ज केले होते. परंतु प्रत्यक्षात २३१५ परीक्षार्थींनीच परीक्षा दिली असून, ४१ परीक्षार्थी हे गैरहजर होते. चौथी पास पात्रता असलेल्या या परीक्षेमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांसह इंजिनिअरही बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली असून, ऑनकॅमेरा पेपर तपासणीनंतर निकालही जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन जाहीर केला आहे.

महसूल विभागातील गावपातळीवरचा शेवटचा दुवा म्हणून कोतवालपदाचे महत्त्व आहे. कोतवाल हा प्रशासनाचा एक भाग असला तरी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्याला कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नाही. त्याला एक प्रकारचे मानधन स्वरूपात १५ हजार रुपये इतके वेतन दिले जाते. परंतु बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच सरकारी नोकरीचे घटलेले प्रमाण लक्षात घेता चौथीपास अर्हता असलेल्या कोतवाल पदासाठी जिल्ह्यात अनेक पदवी, पदव्युत्तर-पदवीधारकांनीही अर्ज केले होते. याबरोबर काही इंजिनिअर असलेल्या तरुणांनीदेखील कोतवाल परीक्षा दिली. जिल्ह्यात रविवारी ११६ पदांकरीता पार पडलेल्या परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यावर एक परीक्षा केंद्र देण्यात आले होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षार्थींना त्यांनी सोडविलेल्या उत्तरांची कार्बनकॉपीदेखील देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच परीक्षेचा निकाल ही जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर करण्यात आला असून, सोमवारी प्राथमिक निवड यादी प्रत्येक तालुकास्तरावर लावण्यात येणार आहे. यानंतर ज्या उमेदवारांचा या निवड यादीवर काही आक्षेप असल्यास त्या आक्षेपाची पूर्तता करून अंतिम निवड यादी ही दि. ३० ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात कोतवालांची परीक्षा सुरळीत पारा पडली असून, कोणत्याही केंद्रावर अनूचित प्रकार घडलेला नाही. सर्व परीक्षार्थींना त्यांनी सोडविलेल्या उत्तरांची कार्बनकॉपी देण्यात आली आहे. तसेच ऑन कॅमेरा पेपरची तपासणी करण्यात आली असून, सोमवारी प्राथमिक निवड यादी जाहीर होईल.

- विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :examपरीक्षाAmravatiअमरावती