शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

शहरात अतिक्रमण सुसाट...

By admin | Updated: February 20, 2017 00:09 IST

संपूर्ण महापालिका क्षेत्रात निवडणुकीचे वारे वाहत असताना अतिक्रमणधारकांनी तोंड वर काढले आहे.

पथक निद्रिस्त : आयुक्त घालतील का लक्ष ?अमरावती : संपूर्ण महापालिका क्षेत्रात निवडणुकीचे वारे वाहत असताना अतिक्रमणधारकांनी तोंड वर काढले आहे. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने घेतलेली धृतराष्ट्राची भूमिका आहे. त्यामुळे हा विभाग कार्यरत आहे की नाही, असा सवाल उपस्थित करणारी ठरली आहे. अतिक्रमण विभागावर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. ट्रक, बुलडोजरसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासह आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तथापि या पथकाकडून किंवा विभागाकडून अतिक्रमण निर्मूलनाचे अपेक्षित काम होत नाही. तूर्तास तर परप्रांतीय लोकांनी ज्यूसविक्रीसाठी गर्दीचे रस्ते व्यापले असताना त्यांना रान मोकळे करून दिले आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने व संबंधितांची महिन्याकाठी घसघशीत कमाई होत असल्याने अतिक्रमित मुजोर झाले आहेत. रस्त्याच्या अर्ध्या भागासह संपूर्ण फूटपाथ या अतिक्रमणधारकांनी कवेत घेतला असताना ‘कुत्तरमारे आणि टिमने’ त्याकडे केलेले दुर्लक्ष अनेक प्रश्न उपस्थित करणारे ठरले आहे. अमरावतीकरांच्या खिशातून कररूपाने येणाऱ्या पैशातून अतिक्रमण विभागाचा डोलारा सांभाळला जातो. मात्र हा विभाग नेमका काय करतो आहे, हे एककोडेच आहे. मागील एक महिन्यापासून अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई थंडबस्त्यात असल्याने या पथकाविषयीच शंकेचे काहूर उठले आहे. सीएम किंवा एखाद्या मंत्र्यांचा दौरा असला की, तोंडदेखली कारवाई करायची आणि त्यानंतर पुढचे पाढे ५५ अशी महापालिका अतिक्रमण विभागाची स्थिती झाली आहे. शहरातील अतिक्रमणे सुसाट झाली आहेत. जीवघेणे अतिक्रमणशहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारचे कोषागार कार्यालय, आरटीओ परिसर, राजकमल, श्याम, चित्रा, सरोजसह गांधी चौक, बसस्थानक रस्ता या ठिकाणी जीवघेणे अतिक्रमण डोके वर काढले असताना तेथील अतिक्रमणात पडलेली भर संतापजनक आहे. थोड्याशा चिरीमिरीसाठी महापालिकेने अमरावती नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. थंडपेयवाल्यांची मुजोरीजिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टेलिफोन भवनाच्या बाजूला अगदी राजरोसपणे सरकारी जागेवर अतिक्रमण करून लस्सीवाल्यांनी दुकानदारी थाटली आहे. याच भागात नव्हे, तर शिवटेकडी भागात तर या परदेशी लस्सी, ज्यूसवाल्यांनी महापालिकेला आव्हान देत राजरोसपणे मुजोरी सुरू केली आहे. अपघात झाल्यावरच येईल का जाग?जि.प. विश्रामगृहालगत दिवसाढवळ्या सरकारी नियमाच्या चिंधड्या उडविल्या जात असताना या भागातील अतिक्रमण, नाश्तावाल्यांच्या गाड्या उचलण्याचे सौजन्य कुत्तरमारे आणि टिमला अद्यापही सुचलेले नाही. नाश्ता करण्यास येणाऱ्यांची शेकडो वाहने या भागात अस्ताव्यस्त पार्क केली जात असताना वाहतूक शाखासुद्धा अपघाताची वाट पाहत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.