शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरात अतिक्रमण सुसाट...

By admin | Updated: February 20, 2017 00:09 IST

संपूर्ण महापालिका क्षेत्रात निवडणुकीचे वारे वाहत असताना अतिक्रमणधारकांनी तोंड वर काढले आहे.

पथक निद्रिस्त : आयुक्त घालतील का लक्ष ?अमरावती : संपूर्ण महापालिका क्षेत्रात निवडणुकीचे वारे वाहत असताना अतिक्रमणधारकांनी तोंड वर काढले आहे. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने घेतलेली धृतराष्ट्राची भूमिका आहे. त्यामुळे हा विभाग कार्यरत आहे की नाही, असा सवाल उपस्थित करणारी ठरली आहे. अतिक्रमण विभागावर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. ट्रक, बुलडोजरसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासह आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तथापि या पथकाकडून किंवा विभागाकडून अतिक्रमण निर्मूलनाचे अपेक्षित काम होत नाही. तूर्तास तर परप्रांतीय लोकांनी ज्यूसविक्रीसाठी गर्दीचे रस्ते व्यापले असताना त्यांना रान मोकळे करून दिले आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने व संबंधितांची महिन्याकाठी घसघशीत कमाई होत असल्याने अतिक्रमित मुजोर झाले आहेत. रस्त्याच्या अर्ध्या भागासह संपूर्ण फूटपाथ या अतिक्रमणधारकांनी कवेत घेतला असताना ‘कुत्तरमारे आणि टिमने’ त्याकडे केलेले दुर्लक्ष अनेक प्रश्न उपस्थित करणारे ठरले आहे. अमरावतीकरांच्या खिशातून कररूपाने येणाऱ्या पैशातून अतिक्रमण विभागाचा डोलारा सांभाळला जातो. मात्र हा विभाग नेमका काय करतो आहे, हे एककोडेच आहे. मागील एक महिन्यापासून अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई थंडबस्त्यात असल्याने या पथकाविषयीच शंकेचे काहूर उठले आहे. सीएम किंवा एखाद्या मंत्र्यांचा दौरा असला की, तोंडदेखली कारवाई करायची आणि त्यानंतर पुढचे पाढे ५५ अशी महापालिका अतिक्रमण विभागाची स्थिती झाली आहे. शहरातील अतिक्रमणे सुसाट झाली आहेत. जीवघेणे अतिक्रमणशहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारचे कोषागार कार्यालय, आरटीओ परिसर, राजकमल, श्याम, चित्रा, सरोजसह गांधी चौक, बसस्थानक रस्ता या ठिकाणी जीवघेणे अतिक्रमण डोके वर काढले असताना तेथील अतिक्रमणात पडलेली भर संतापजनक आहे. थोड्याशा चिरीमिरीसाठी महापालिकेने अमरावती नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. थंडपेयवाल्यांची मुजोरीजिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टेलिफोन भवनाच्या बाजूला अगदी राजरोसपणे सरकारी जागेवर अतिक्रमण करून लस्सीवाल्यांनी दुकानदारी थाटली आहे. याच भागात नव्हे, तर शिवटेकडी भागात तर या परदेशी लस्सी, ज्यूसवाल्यांनी महापालिकेला आव्हान देत राजरोसपणे मुजोरी सुरू केली आहे. अपघात झाल्यावरच येईल का जाग?जि.प. विश्रामगृहालगत दिवसाढवळ्या सरकारी नियमाच्या चिंधड्या उडविल्या जात असताना या भागातील अतिक्रमण, नाश्तावाल्यांच्या गाड्या उचलण्याचे सौजन्य कुत्तरमारे आणि टिमला अद्यापही सुचलेले नाही. नाश्ता करण्यास येणाऱ्यांची शेकडो वाहने या भागात अस्ताव्यस्त पार्क केली जात असताना वाहतूक शाखासुद्धा अपघाताची वाट पाहत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.