शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अतिक्रमण कारवाई, नागरिक रस्त्यावर

By admin | Updated: May 30, 2014 23:22 IST

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या चिलमछावणी, राजीव गांधीनगर, चमन शाहवली या ठिकाणी सन १९८६ पासून वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण हटवू नये, यासाठी या परिसरातील

अमरावती : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या चिलमछावणी, राजीव गांधीनगर, चमन शाहवली या ठिकाणी सन १९८६ पासून वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण हटवू नये, यासाठी या परिसरातील शेकडो नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. सन १९८६ सालापासून शहरातील चिलमछावणी, राजीव गांधीनगर, चमन शाहवली या परिसरातील झोपडपट्टीमध्ये मोलमजुरी करुन सुमारे ५00 नागरिक वास्तव्य करीत आहेत. महसूल विभागाच्या नझुल शिट क्रमांक ७, प्लॉट नं. २/४ या नझूलच्या जागेवर राहणार्‍या वरील गोर गरीब कुटुंबांना शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाने ही कारवाई सुरु केल्यामुळे चिलमछावणी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शासनाने सुमारे ३0 वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या या झोपडपट्टीतील नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा त्यानंतरच येथील अतिक्रमण काढण्यात यावे. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची नोटीस बजाविल्याने मोल मजुरी करुन वास्तव्य करीत असलेल्या या गरीब जनतेने निवार्‍याचा आश्रय कोठे घ्यावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासन गरिबांना निवार्‍याची सुविधा व्हावी म्हणून घरकुलाची योजना राबवितो; मात्र याचा लाभ गरजूंना मिळत नाही. बाब लक्षात घेऊन शासनाने अगोदर झोपडपट्टीतील या नागरिकांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन द्यावी. कुठल्याही परिस्थितीत या परिसरातील अतिक्रमण हटवू देणार नाही या विषयासाठी चिलमछावणी परिसरातील सुमारे ५00 नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. उपोषणकर्त्यांमध्ये अफजल भाई, शफीक राजा, शाहीस्ता परवीन, शेख जाकीर, गफ्फार खां, शेख फारूख, शेख युसूफ, शेख सुभान, आशा कोबळे, शेख जावेद आदींसह परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)