शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

चांदूर पालिकेच्या २१ दुकानांत अतिक्रमण

By admin | Updated: December 13, 2014 00:42 IST

स्थानिक नगर पालिका प्रशासनातर्फे शहरात अतिक्रमण हटाओ मोहीम जोमात सुरु असताना नगर पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील ...

सुमित हरकुट चांदूरबाजारस्थानिक नगर पालिका प्रशासनातर्फे शहरात अतिक्रमण हटाओ मोहीम जोमात सुरु असताना नगर पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील २१ दुकानांमधील अतिक्रमण कधी निघणार, असा सवाल नागरिकांनी पालिका प्रशासनाला केला आहे.सहा वर्षांनंतर नगरपालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये स्वत: पालिकेचे मुख्याधिकारी विजय देशमुख संपूर्ण नगर पालिकेचे कर्मचारी घेऊन कार्यवाहीत सामील होते. पालिकेने शहरातील कच्चे अतिक्रमण काढताच शहरातील अनेक दुकानदारांनी धास्तीने स्वत:च्या दुकानातील अतिक्रमण काढायला सुरुवात केली. मात्र या कार्यवाहीत काही मोजकीच दुकानांवर कारवाई झाल्याचा आरोप नागरिकांतर्फे होत आहे. काही जवळच्या कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यावर मुख्याधिकाऱ्यांनी त्या हॉटेलवर कारवाईचे आदेश देणे चुकीचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.शहरात आठवड्यातून एकदा अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरु असताना नगरपालिकेने बांधलेल्या व्यापारी संकुलातील २१ दुकानांतील अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण कधी निघणार? असा प्रश्न पालिकेला केला आहे. पालिकेने १९९६ साली मौलाना अब्दुल कलाम व्यापारी संकुलात ३९ दुकाने बांधली होती. त्यांचा हर्राससुध्दा करण्यात आला होता. मात्र केवळ १८ दुकानदारांनीच ही दुकाने पालिकेकडून भाडे तत्त्वावर घेतली होती. तर २१ दुकानांकरिता कोणीही बोली न बोलल्याने ती दुकाने पालिकेकडेच राहिली. मात्र, काही दिवसांतच या २१ दुकानांमध्ये अतिक्रमण करुन सर्रास दुकाने सुरु झाली. या २१ दुकानांकडून आजवर नगर पालिकेला कोणतेच उत्पन्न मिळालेले नाही. पालिका प्रशासनाने त्या २१ दुकानांतील अतिक्रमण हटविले नसून उर्वरित १८ दुकानांकडून लाखो रुपयांची वसुली केव्हा केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नगर पालिकेची स्वत:ची मालमत्ताच अतिक्रमणात अडकलेली असताना सर्वसाधारण नागरिकांवरील कार्यवाही ही फक्त ‘तानाशाही’ असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. त्या २१ दुकानांचा हर्रास झाला नसताना पालिका प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून हे अतिक्रमण का हटविले नाही. पालिकेची परिस्थिती जेमतेम असताना व्यापारी संकुलातील दुकानांवर लाखो रुपये थकबाकी ठेवण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्या अतिक्रमणीत २१ दुकानांसह एकूण २५ दुकाने अद्यापही रिकामीच असून बाजारपेठेच्या दरानुसार एक कोटींच्यावर पालिकेची रक्कम अडकली आहे. अतिक्रमण हटाओ मोहीम राबवून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न अलीकडे नगरपालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, यात कित्येक बेरोजगारांचा रोजगार हिरावला जात आहे. अशा स्थितीत नगरपालिकेच्या मालकीच्या दुकानांवरच झालेले अतिक्रण व त्यातून पालिकेचे होणारे लाखोंचे नुकसान टाळण्यासाठी हे दुकानांमधील अतिक्रमण हटविण्याची गरज आहे. पालिकेने तत्काळ कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहेकेव्हा होणार वसुली?नगरपालिका या व्यापारी संकुलातील दुकानांतून प्रती दुकान हजार रुपये वार्षिक भाडे तसेच १३८० रुपये वार्षिक मालमत्ता कर वसूल करते. परंतु या दुकानांकडून नगरपालिका कोणतीच वसुली करीत नाही. तर निलाम झालेल्या १८ दुकानांकडे १८ लाख ७७ हजार ७०१ रुपये थकीत आहेत. या २१ दुकानांत अतिक्रमणामुळे नगरपालिका दरवर्षी ९१ हजार ९८० रुपये उत्पन्नसुध्दा वसूल करीत आहे. या १८ दुकानदारांकडून १८ लाख ७७ हजार रुपये नगरपालिका कधी वसूल करणार? असा प्रश्न आहे.