शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

झेडपीतील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा गायब, प्रशासनही अनभिज्ञ

By जितेंद्र दखने | Updated: June 24, 2023 17:40 IST

अपघात झाला तर करायचे काय?

अमरावती : जिल्हा परिषद इमारतीतील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा गत कित्येक वर्षांपासून गायब झाली आहे. अग्निरोधक यंत्रे (फायर बॉटल) कालबाह्य झाली आहेत. वाळूच्या बादल्या व इतर सुरक्षा साहित्य अडगळीत पडले आहे. दुर्दैवाने जिल्हा परिषद इमारतीत काही अपघात घडला, तर प्रशासन काय करणार. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा भार वाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीची व त्यात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतीत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

या इमारतीच्या आपत्कालीन सुरक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे सुरक्षिततेच्या उपाययोजना कार्यान्वित नसल्याचे वास्तव जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. पाणीपुरवठा, आरोग्य आणि सामान्य प्रशासन विभागात असलेले अग्निरोधक यंत्र अडगळीत पडले आहे. जलसंधारण विभागात उपलब्ध वाळूच्या बादल्या पूर्णत: सडल्याचे दिसून आले. आग विझवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी अग्निरोधक यंत्रे निरुपयोगी झाली तर बहुतांश विभागात खबरदारीच्या उपाययोजनाच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन ठिकाणी असलेल्या यंत्रांवर नमूद करण्यात आलेली वापरण्याची मुदत संपली असून, हे कालबाह्य यंत्र आग विझवण्यात कितपत सक्षम आहे हा प्रश्न आहे. 

एकाही विभागात नाही यंत्रणा

जिल्हा परिषद मुख्यालय असलेल्या बांधकाम, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, पंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त, जलसंधारण, पाणीपुरवठा व स्वच्छता, शिक्षण, कृषी, भांडार, विभाग आदी विभागात खबरदारीसाठी अग्निरोधक यंत्रणाच अस्तित्वात नाही.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात महत्वाच्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निरोधक यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपत्कालीन सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोनजा करण्याचे निर्देश ॲडिशनल सीईओमार्फत बांधकाम विभागाला दिले आहेत.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती