शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

झेडपीतील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा गायब, प्रशासनही अनभिज्ञ

By जितेंद्र दखने | Updated: June 24, 2023 17:40 IST

अपघात झाला तर करायचे काय?

अमरावती : जिल्हा परिषद इमारतीतील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा गत कित्येक वर्षांपासून गायब झाली आहे. अग्निरोधक यंत्रे (फायर बॉटल) कालबाह्य झाली आहेत. वाळूच्या बादल्या व इतर सुरक्षा साहित्य अडगळीत पडले आहे. दुर्दैवाने जिल्हा परिषद इमारतीत काही अपघात घडला, तर प्रशासन काय करणार. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा भार वाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीची व त्यात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतीत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

या इमारतीच्या आपत्कालीन सुरक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे सुरक्षिततेच्या उपाययोजना कार्यान्वित नसल्याचे वास्तव जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. पाणीपुरवठा, आरोग्य आणि सामान्य प्रशासन विभागात असलेले अग्निरोधक यंत्र अडगळीत पडले आहे. जलसंधारण विभागात उपलब्ध वाळूच्या बादल्या पूर्णत: सडल्याचे दिसून आले. आग विझवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी अग्निरोधक यंत्रे निरुपयोगी झाली तर बहुतांश विभागात खबरदारीच्या उपाययोजनाच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन ठिकाणी असलेल्या यंत्रांवर नमूद करण्यात आलेली वापरण्याची मुदत संपली असून, हे कालबाह्य यंत्र आग विझवण्यात कितपत सक्षम आहे हा प्रश्न आहे. 

एकाही विभागात नाही यंत्रणा

जिल्हा परिषद मुख्यालय असलेल्या बांधकाम, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, पंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त, जलसंधारण, पाणीपुरवठा व स्वच्छता, शिक्षण, कृषी, भांडार, विभाग आदी विभागात खबरदारीसाठी अग्निरोधक यंत्रणाच अस्तित्वात नाही.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात महत्वाच्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निरोधक यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपत्कालीन सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोनजा करण्याचे निर्देश ॲडिशनल सीईओमार्फत बांधकाम विभागाला दिले आहेत.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती