शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

झेडपीतील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा गायब, प्रशासनही अनभिज्ञ

By जितेंद्र दखने | Updated: June 24, 2023 17:40 IST

अपघात झाला तर करायचे काय?

अमरावती : जिल्हा परिषद इमारतीतील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा गत कित्येक वर्षांपासून गायब झाली आहे. अग्निरोधक यंत्रे (फायर बॉटल) कालबाह्य झाली आहेत. वाळूच्या बादल्या व इतर सुरक्षा साहित्य अडगळीत पडले आहे. दुर्दैवाने जिल्हा परिषद इमारतीत काही अपघात घडला, तर प्रशासन काय करणार. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाचा भार वाहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या इमारतीची व त्यात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतीत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

या इमारतीच्या आपत्कालीन सुरक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे सुरक्षिततेच्या उपाययोजना कार्यान्वित नसल्याचे वास्तव जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. पाणीपुरवठा, आरोग्य आणि सामान्य प्रशासन विभागात असलेले अग्निरोधक यंत्र अडगळीत पडले आहे. जलसंधारण विभागात उपलब्ध वाळूच्या बादल्या पूर्णत: सडल्याचे दिसून आले. आग विझवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी अग्निरोधक यंत्रे निरुपयोगी झाली तर बहुतांश विभागात खबरदारीच्या उपाययोजनाच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन ठिकाणी असलेल्या यंत्रांवर नमूद करण्यात आलेली वापरण्याची मुदत संपली असून, हे कालबाह्य यंत्र आग विझवण्यात कितपत सक्षम आहे हा प्रश्न आहे. 

एकाही विभागात नाही यंत्रणा

जिल्हा परिषद मुख्यालय असलेल्या बांधकाम, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, पंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, वित्त, जलसंधारण, पाणीपुरवठा व स्वच्छता, शिक्षण, कृषी, भांडार, विभाग आदी विभागात खबरदारीसाठी अग्निरोधक यंत्रणाच अस्तित्वात नाही.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात महत्वाच्या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निरोधक यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपत्कालीन सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोनजा करण्याचे निर्देश ॲडिशनल सीईओमार्फत बांधकाम विभागाला दिले आहेत.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती