शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोरडवाहू शेतकऱ्यांवर वीज कंपनीची वक्रदृष्टी

By admin | Updated: June 9, 2016 00:24 IST

पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे.

अचलपूर : वीजजोडणीसाठी झिजवावे लागतात उंबरठेअचलपूर : पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. अशाही परिस्थितीशी दोन हात करीत शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत कार्यालयात पायपीट करीत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील तीन-चार वर्षांपासून अचलपूर तालुक्यात नापिकीची स्थिती आहे. त्यामुळे अधिकाधीक जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे. शासनाने यासाठी धडक सिंचन योजना सुरू केली. या योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच वीजजोडणी तत्काळ स्वरुपाची केल्याने इतर शेतकरी मात्र सिंचन सुविधेपासून वंचित राहिले आहेत. तालुक्यात आतापर्यंत २ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज दाखल केले. त्यातील कित्येक शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात पडले आहेत. विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज जोडण्या देण्याचे काम कासवगतीने करीत आहेत. तालुक्याचे क्षेत्रफळ ६४,६३० हेक्टर आहे. त्यापैकी ५४,११६ हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. यात ३३ टक्के जमीन मध्यम तर ३५ टक्के भारी स्वरुपाची आहे. यातील ३० ते ३५ टक्के शेती सद्यस्थितीत संरक्षित ओलीताखाली आल्याची माहिती आहे. संथगतीने होणारा शेतीप्रयोगाचा आलेख असाच राहिल्यास पुढे ५० वर्ष तालुक्यातील शेती ओलिताखाली येण्याची शक्यता नाही, असे मत जाणकार व अनुभवी शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बागायती शेती करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असतांना अनावश्यक कागदपत्रे आणि मन:स्ताप शेतकऱ्यांच्या इच्छेला बाधक ठरत आहे.यामुळे मागेल त्याला शेततळे व वीजजोडणी तत्काळ देण्याची गरज असल्याचे मत बबल्या पोटे, गजानन मेहरे, सुभाष फुकटे, पांडुरंग काटोलकर (बोपापूर), मुरलीधर घुलक्षे, नरेंद्र राऊत, अतुल गणगणे, नीलेश मालगे, सुरेश मोहोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. (शहर प्रतिनिधी)