शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

कोरडवाहू शेतकऱ्यांवर वीज कंपनीची वक्रदृष्टी

By admin | Updated: June 9, 2016 00:24 IST

पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे.

अचलपूर : वीजजोडणीसाठी झिजवावे लागतात उंबरठेअचलपूर : पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. अशाही परिस्थितीशी दोन हात करीत शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत कार्यालयात पायपीट करीत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील तीन-चार वर्षांपासून अचलपूर तालुक्यात नापिकीची स्थिती आहे. त्यामुळे अधिकाधीक जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आहे. शासनाने यासाठी धडक सिंचन योजना सुरू केली. या योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच वीजजोडणी तत्काळ स्वरुपाची केल्याने इतर शेतकरी मात्र सिंचन सुविधेपासून वंचित राहिले आहेत. तालुक्यात आतापर्यंत २ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज दाखल केले. त्यातील कित्येक शेतकऱ्यांचे अर्ज धूळखात पडले आहेत. विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज जोडण्या देण्याचे काम कासवगतीने करीत आहेत. तालुक्याचे क्षेत्रफळ ६४,६३० हेक्टर आहे. त्यापैकी ५४,११६ हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. यात ३३ टक्के जमीन मध्यम तर ३५ टक्के भारी स्वरुपाची आहे. यातील ३० ते ३५ टक्के शेती सद्यस्थितीत संरक्षित ओलीताखाली आल्याची माहिती आहे. संथगतीने होणारा शेतीप्रयोगाचा आलेख असाच राहिल्यास पुढे ५० वर्ष तालुक्यातील शेती ओलिताखाली येण्याची शक्यता नाही, असे मत जाणकार व अनुभवी शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बागायती शेती करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असतांना अनावश्यक कागदपत्रे आणि मन:स्ताप शेतकऱ्यांच्या इच्छेला बाधक ठरत आहे.यामुळे मागेल त्याला शेततळे व वीजजोडणी तत्काळ देण्याची गरज असल्याचे मत बबल्या पोटे, गजानन मेहरे, सुभाष फुकटे, पांडुरंग काटोलकर (बोपापूर), मुरलीधर घुलक्षे, नरेंद्र राऊत, अतुल गणगणे, नीलेश मालगे, सुरेश मोहोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. (शहर प्रतिनिधी)