शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

वांगी, टोमॅटोने बिघडविले बजेट हिरव्या मिरचीने केले तोंड लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत असल्याने बाहेर जिल्ह्यातून दररोज हजारो क्विंटटल भाजीपाला शहरात येतो. त्यात डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला मंगळवारी ५० ते १६० रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागल्याचे वास्तव आहे.

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऑक्टोबरच्या संततधार पावसाने भाजीपाला खराब झाला. त्यामुळे बाजारपेठेत आवक कमी व वाढता वाहतूक खर्च पाहता दामदुप्पट दराने भाजीपाला खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. त्यात बारमाही उपयोगात येणाऱ्या वांगीने आर्थिक बजेट बिघडविले, तर हिरवी मिरची ८० रुपयांवर पोहचल्यामुळे गृहिणींचे तोंड लाल झाले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत असल्याने बाहेर जिल्ह्यातून दररोज हजारो क्विंटटल भाजीपाला शहरात येतो. त्यात डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला मंगळवारी ५० ते १६० रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागल्याचे वास्तव आहे.

नाशिकहून येतो टोमॅटोजिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन फार कमी प्रमाणात घेण्यात येते. वाढत्या मागणीनुसार टोमॅटोची तोकडी आवक नागरिकांची गरज भागवू शकत नसल्याने नाशिक येथून टोमॅटो बोलविला जातो. त्यातच डिझेल दरवाढीने वाहतूक खर्चापोटी कधी नव्हे इतके भाव टोमॅटोचे वाढलेले पहावयास मिळत आहे.

कांदा दिवाळीपर्यंत ६० जिल्ह्यात कांदा धुळे, सोलापूर व कर्नाटक राज्यातून बोलावले जातात. मात्र, पाऊस सुरू राहिल्याने धुळे, सोलापूरसह कर्नाटक येथून होणारी कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे यंदाही दिवाळीत कांदा ५० ते ६० रुपयांपर्यंत खरेदी करावा लागणार असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी सतीश कावरे यांनी दिली.

भाजीपाल्याचे दर अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्याने अर्धा किलोऐवजी एकच पाव घ्यावा लागत आहे. परंतु, स्वस्त असो वा महाग गरजेनुसार खरेदी करावाच लागतो. - अर्चना गौतम मेश्राम, गृहिणी

सर्व डाळींचेही दर वाढलेले असून, पावसाने भाजीपाला खराब झाल्यामुळे तेदेखील कधी नव्हे इतके वाढले आहे. सामान्य माणूस महागाईने डबघाईस येऊ लागला आहे - रमेश राठोड, एक ग्राहक

पावसामुळे खराब झाला. तसेच वाहतूक खर्च प्रतीकिलो १० रुपये झाल्याने भाजीपाल्याचे दर सद्यस्थितीत सर्वाधिक आहे. आम्हाला २-५ रुपये नफ्याने विकावा लागत आहे.     - प्रकाश बाहेकर, विक्रेता

 

टॅग्स :vegetableभाज्या