शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
3
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
6
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
7
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
8
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
9
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
10
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
11
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
12
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
13
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
14
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
15
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
16
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
17
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
18
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
20
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून ‘शिक्षणोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

शिक्षणप्रक्रियेत होत असलेले बदल सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत, याद्वारे नवनवीन विचारांचे आदान प्रदान होऊन सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे, यासाठी तालुकास्तरावर शिक्षणोत्सव साजरा करावा, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २ मार्चला बजावले.

ठळक मुद्देभातकुली पंचायत समितीमध्ये आयोजन । आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे तीनतेरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासकीय कार्यक्रमास १५ एप्रिलपर्यंत मनाई आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती प्राधिकरणाचे जिल्हाध्यक्ष शैलेश नवाल यांनी ११ मार्चला सर्व शासकीय विभागांना बजावले. हे आदेश धुडकावून भातकुली पंचायत समितीद्वारे आवारातील सभागृहात शनिवारी शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला. यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिक्षणप्रक्रियेत होत असलेले बदल सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत, याद्वारे नवनवीन विचारांचे आदान प्रदान होऊन सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे, यासाठी तालुकास्तरावर शिक्षणोत्सव साजरा करावा, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २ मार्चला बजावले. याच अनुषंगाने हा कार्यक्रम असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. कार्यक्रमासाठी ५० हजारांचे अनुदानदेखील उपलब्ध करण्यात आलेले आहे.जागतिक संकट ठरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमविणारे कोणतेच कार्यक्रम आयोजित करू नये, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी बजावले असतानाही हा कार्यक्रम घेण्यात आला. याविषयी आता शिक्षण वर्तुळात उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.कार्यक्रमात २२ स्टॉलभातकुली पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित शिक्षणोत्सवाच्या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व डायटचे अधिकारी उपस्थित होते. यात तालुक्यातील विविध शाळांतील २२ स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये स्वच्छ विद्यालय, शाळा स्वच्छता, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी व हात धुण्याची सुविधा, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, वाचन चळवळीशी संबंधित उपक्रम, मूल्यमापन संदर्भातील तंत्रज्ञान या नावीन्यपूर्ण पद्धती, अध्ययन निष्पत्ती, सौरऊर्जा, मध्यान्ह भोजन, किचन गार्डन, ज्ञानरचनावाद, जीवन कौशल्यावर आधारित अशा प्रकारचे कलात्मक प्रदर्शन यामध्ये शिक्षकांनी ठेवले होते.गर्दीच्या कार्यक्रमास मनाई आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांशी चर्चा झाली. संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल.- नितीन व्यवहारेनोडल आॅफिसर (आरडीसी)जिल्हा ठिकाणी कार्यक्रमास मनाई आहे, असे उपशिक्षणाधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे पूर्वनियोजनानुसार कार्यक्रम घेण्यात आला.- संतोष घुगेगटशिक्षणाधिकारी, भातकुली.मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी शिक्षक समितीने सीईओंकडे १२ मार्चला केली. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.- राजेश सावरकर, राज्य प्रतिनिधी, शिक्षक समिती

टॅग्स :Educationशिक्षण