शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ईडी, आयकरचा ससेमिरा लावून राज्य सरकार पाडण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 17:49 IST

Amravati News काही ठराविक नेत्यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी), आयकर चौकशीचा ससेमिरा लावून राज्याचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आराेप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला.

ठळक मुद्देगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आरोपदोन वर्षांत भाजपच्या नेत्यांकडे ईडीचे धाडसत्र का नाही?

अमरावती : काही ठराविक नेत्यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी), आयकर चौकशीचा ससेमिरा लावून राज्याचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आराेप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला. (Dilip Walse Patil)

वळसे पाटील हे अमरावती दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमली पदार्थ तस्करीविरुद्ध राज्याचे पोलीस दल सक्षमपणे कारवाई करीत आहे. मात्र, एनसीबीने कारवाई करताना महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. जणू काही महाराष्ट्रातच अमली पदार्थ विक्री होते, असा देखावा उभा केला जात असल्याची टीकाही गृहमंत्र्यांनी केली. ईडी, आयकर हे अलीकडे केंद्र सरकारच्या हातचे बाहुले झाले असून, तशीच कारवाई होत आहे. महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांना लक्ष करून ईडी, आयकरचे धाडसत्र राबविले जात आहे. परंतु, गत दोन वर्षांत एकाही भाजपच्या नेत्याकडे ईडी, आयकरची नोटीस किंवा धाडसत्र का पडले नाही, असा सवाल गृहमंत्र्यांनी उपस्थित केला. यावेळी माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले उपस्थित होते.

प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही लागणार आहेत. त्यानुसार प्रस्ताव मागविले जातील. अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी निधीसंदर्भात चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी गैर राजकीय महिलांची नियुक्ती का नाही, या प्रश्नावर बोलताना गृहमंत्र्यांनी रूपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष तर आहेतच; पण त्या कायदेतज्ज्ञही असल्याचा दुजोरा दिला.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटील