शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उन्नत अभियानाद्वारे उंचावणार शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:32 IST

प्रमुख पिकांची प्रत्यक्षात असणारी उत्पादकता व या पिकांच्या आनुवंशिक उत्पादन क्षमतेमधील तफावत कमी करण्यासाठी जिल्ह्यात उन्नत शेती- समृद्ध शेती अभियान राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउत्पादनवाढीसाठी प्रयत्न : शेतीपूरक व्यवसायाला देणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रमुख पिकांची प्रत्यक्षात असणारी उत्पादकता व या पिकांच्या आनुवंशिक उत्पादन क्षमतेमधील तफावत कमी करण्यासाठी जिल्ह्यात उन्नत शेती- समृद्ध शेती अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाच्या तुलनेत अधिक उत्पन्न प्राप्त करून देणे, नैसर्र्गिक आपत्तीमध्ये पिकांचा बचाव होण्यासाठी पीकविम्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.यंदाच्या हंगामापासून कृषी विकास व उत्पादनवाढीसाठी तालुका हा घटक गृहित धरण्यात येणार आहे. यामध्ये पिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी पिकांचे वैविध्यकरणाद्वारे उत्पादनखर्च कमी करणे. शेतमालाच्या बाजारभावातील नियमित चढ-उतार लक्षात घेऊन शेतमाल विक्रीचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत करून देणे. शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे. बाजारपेठ आधारित कृषी उत्पादनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने शेतकºयांच्या उत्पादक कंपन्यांची व्यावसायिक क्षमता बांधणी करणे. काढणीपश्चात शेतमाल हाताळणी व शेतमालाचे मूल्यवर्धन करणे, यावर यावर्षीच्या खरीप व रबी हंगामामध्ये भर राहणार आहे.ज्या तालुक्यातील प्रमुख पिकांच्या कमी उत्पादकतेमुळे प्रमुख पिकांच्या कमी उत्पादकतेमुळे त्या पिकांसाठी हमीभावानुसार प्राप्त होणारे उत्पन्न हे शेतकºयाने घेतलेल्या पीक कर्जापेक्षा प्रत्यक्षात जास्त असावे, यासाठी तालुक्यांना त्या पिकांसाठी २० टक्के वाढीव उत्पादकतेचा लक्षांक देण्यात यावा असे, कृषी आयुक्तालयाने बजावले आहे. दरम्यान हा उपक्रम खरिपामध्ये राबविण्यासाठी कृषी विभागाची लगबग सुरू आहे.आता १० हेक्टरमध्ये पीक प्रत्यक्षिकयापूर्वी १०० हेक्टर अशा विखुरलेल्या क्षेत्रावर पीक प्रत्यक्षिक करण्यात येत होती. त्यामुळे शेतकºयांशी नियमित संवाद साधण्यामध्ये बाधा येऊन कृषी तंत्रज्ञान प्रसारामध्ये अडचणी यायची. त्यामुळे या हंगामापासून सर्व प्रचलित योजनांसाठी पीक प्रथ्यक्षिके ही १० हेक्टर क्षेत्र मर्यादेच घेण्यात याव व एका कृषी सहायकाकडे एका हंगामात दोन्ही हंगाम मिळून किमान ५ पाच पीक प्रत्यक्षिके राहतील, अशा सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत.तंत्रज्ञान माहीती १५ मे पूर्वी संकेतस्थळावरकृषी विभागाच्या प्रचलीत योजनांचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी, स्थानिक पीक प्रात्यक्षिकातंर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहीती देण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ होण्यासाठी कृषी आयुक्तांद्वारा कृषी विभागाच्या संकेतस्थाळावर १५ मे २०१८ पूर्वी टाकणे बंधनकारक केले आहे.या शिवाय विविध माध्यमांच्याद्वारे ही माहीती शेतकऱ्यांपर्यत पोहचली पाहीेजे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.