शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

उन्नत अभियानाद्वारे उंचावणार शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:32 IST

प्रमुख पिकांची प्रत्यक्षात असणारी उत्पादकता व या पिकांच्या आनुवंशिक उत्पादन क्षमतेमधील तफावत कमी करण्यासाठी जिल्ह्यात उन्नत शेती- समृद्ध शेती अभियान राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउत्पादनवाढीसाठी प्रयत्न : शेतीपूरक व्यवसायाला देणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रमुख पिकांची प्रत्यक्षात असणारी उत्पादकता व या पिकांच्या आनुवंशिक उत्पादन क्षमतेमधील तफावत कमी करण्यासाठी जिल्ह्यात उन्नत शेती- समृद्ध शेती अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाच्या तुलनेत अधिक उत्पन्न प्राप्त करून देणे, नैसर्र्गिक आपत्तीमध्ये पिकांचा बचाव होण्यासाठी पीकविम्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.यंदाच्या हंगामापासून कृषी विकास व उत्पादनवाढीसाठी तालुका हा घटक गृहित धरण्यात येणार आहे. यामध्ये पिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी पिकांचे वैविध्यकरणाद्वारे उत्पादनखर्च कमी करणे. शेतमालाच्या बाजारभावातील नियमित चढ-उतार लक्षात घेऊन शेतमाल विक्रीचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत करून देणे. शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे. बाजारपेठ आधारित कृषी उत्पादनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने शेतकºयांच्या उत्पादक कंपन्यांची व्यावसायिक क्षमता बांधणी करणे. काढणीपश्चात शेतमाल हाताळणी व शेतमालाचे मूल्यवर्धन करणे, यावर यावर्षीच्या खरीप व रबी हंगामामध्ये भर राहणार आहे.ज्या तालुक्यातील प्रमुख पिकांच्या कमी उत्पादकतेमुळे प्रमुख पिकांच्या कमी उत्पादकतेमुळे त्या पिकांसाठी हमीभावानुसार प्राप्त होणारे उत्पन्न हे शेतकºयाने घेतलेल्या पीक कर्जापेक्षा प्रत्यक्षात जास्त असावे, यासाठी तालुक्यांना त्या पिकांसाठी २० टक्के वाढीव उत्पादकतेचा लक्षांक देण्यात यावा असे, कृषी आयुक्तालयाने बजावले आहे. दरम्यान हा उपक्रम खरिपामध्ये राबविण्यासाठी कृषी विभागाची लगबग सुरू आहे.आता १० हेक्टरमध्ये पीक प्रत्यक्षिकयापूर्वी १०० हेक्टर अशा विखुरलेल्या क्षेत्रावर पीक प्रत्यक्षिक करण्यात येत होती. त्यामुळे शेतकºयांशी नियमित संवाद साधण्यामध्ये बाधा येऊन कृषी तंत्रज्ञान प्रसारामध्ये अडचणी यायची. त्यामुळे या हंगामापासून सर्व प्रचलित योजनांसाठी पीक प्रथ्यक्षिके ही १० हेक्टर क्षेत्र मर्यादेच घेण्यात याव व एका कृषी सहायकाकडे एका हंगामात दोन्ही हंगाम मिळून किमान ५ पाच पीक प्रत्यक्षिके राहतील, अशा सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत.तंत्रज्ञान माहीती १५ मे पूर्वी संकेतस्थळावरकृषी विभागाच्या प्रचलीत योजनांचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी, स्थानिक पीक प्रात्यक्षिकातंर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहीती देण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ होण्यासाठी कृषी आयुक्तांद्वारा कृषी विभागाच्या संकेतस्थाळावर १५ मे २०१८ पूर्वी टाकणे बंधनकारक केले आहे.या शिवाय विविध माध्यमांच्याद्वारे ही माहीती शेतकऱ्यांपर्यत पोहचली पाहीेजे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.