शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

नाफेड तूर खरेदीला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:58 IST

आॅनलाईन लोकमतदर्यापूर : गत वर्षी झालेल्या तुरीच्या बंपर उत्पादनाचे पडसाद यंदाच्या तूर खरेदीवर उमटू लागले आहे. दर्यापूर बाजार समितीत नाफेड केंद्रावर साडेचार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना ७५० शेतकऱ्यांची केवळ १० हजार क्विंटल तूर खरेदी केल्याचे समोर आले आहे.पणन महासंघाच्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नाफेडच्या माध्यमातून २ फेब्रुवारीपासून ...

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : ४ हजार ४०० अर्ज, खरेदी केवळ ७४९ शेतकऱ्यांची

आॅनलाईन लोकमतदर्यापूर : गत वर्षी झालेल्या तुरीच्या बंपर उत्पादनाचे पडसाद यंदाच्या तूर खरेदीवर उमटू लागले आहे. दर्यापूर बाजार समितीत नाफेड केंद्रावर साडेचार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना ७५० शेतकऱ्यांची केवळ १० हजार क्विंटल तूर खरेदी केल्याचे समोर आले आहे.पणन महासंघाच्या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नाफेडच्या माध्यमातून २ फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरू झाली. परंतु मागील २७ दिवसांत नाफेडने केवळ १० हजार क्विंटल तूर खरेदी केली. दररोज ४ ते ५ हजार क्विंटल तूर मार्केट यार्डमध्ये येत असताना बहुतांश तूर व्यापारी खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. नाफेडच्या ढिम्म गतीमुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. बाजार समितीच्या आवक पत्रानुसार दररोज ५ हजार क्विंटल तूर बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत.एसएमएसही मिळत नाहीतनाफेडच्या खरेदी प्रक्रियेनुसार ४ हजार ४०० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. रोज ४० शेतकºयांना फोन वा एसएमएसद्वारे माल विक्रीस आणावा, अशी माहिती दिली जाते. तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे निमित्त करून शेतकऱ्यांना माहितीच दिली जात नाही, अशी तक्रार करावी कुणाकडे असा सवाल आहे.व्यापाऱ्यांकडे कमी दरनाफेडमध्ये तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार ४५० येवढा भाव असताना शेतकरी व्यापाऱ्यांकडे ४ हजार रुपये दराने तुरीची विक्री करीत आहे. यामुळे शेतकºयांचा प्रत्येक क्विंटल मागे सुमारे १ हजार ४५० रुपयांचे नुकसान होत आहे. नाफेड खरेदीचा क्रमांक कधी लागेल, याची शाश्वती नसल्याने हाती पैसा यावा, यासाठी असा निर्णय घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.खरेदी मर्यादा एकरी चार क्विंटलतूर खरेदीच्या मर्यादा ठरवून दिल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. खरेदी मर्यादा केवळ ४ क्विंटल आहे. सुरुवातीला ही मर्यादा एकरी दोन क्विंटल होती. परंतु शेतकऱ्यांनी ओरड केल्याने ती वाढविण्यात आली आहे. सध्या निश्चित केलेली मर्यादादेखील कमी असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे खरेदीवर परिणाम होऊ लागला आहे.जाणीवपूर्वक खरेदी संथनाफेडने २ फेब्रुवारी रोजी तूर खरेदी सुरू केली. २७ दिवसांपासून केंद्र सुरू असताना या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. अशीच परिस्थिती सुरूराहिली तर नाफेडला लवकरच आपला गाशा गुंडाळावा लागेल, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.