शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

समारंभातील जेवण करा जपूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:16 IST

लग्न समारंभात धूमधाम, मौजमस्ती व आनंद घ्या, पण जेवणाचा स्वाद जरा जपूनच घ्या, अशी म्हणण्याची वेळ अमरावतीकरांसमोर आली आहे. शहरातील काही लग्न समारंभांमध्ये जेवल्यानंतर अन्नातून विषबाधेचा प्रसंग काही जणांवर ओढावला असून, अनेकांना उलट्या व अतिसाराचा त्रासामुळे दवाखान्यात जाण्याची वेळसुद्धा आली आहे.

ठळक मुद्देअन्नातून विषबाधेची शक्यता : उलट्या, अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लग्न समारंभात धूमधाम, मौजमस्ती व आनंद घ्या, पण जेवणाचा स्वाद जरा जपूनच घ्या, अशी म्हणण्याची वेळ अमरावतीकरांसमोर आली आहे. शहरातील काही लग्न समारंभांमध्ये जेवल्यानंतर अन्नातून विषबाधेचा प्रसंग काही जणांवर ओढावला असून, अनेकांना उलट्या व अतिसाराचा त्रासामुळे दवाखान्यात जाण्याची वेळसुद्धा आली आहे.अमरावतीत सध्या लग्नसराईची धूम पाहायला मिळत असून, बहुतांश मंगल कार्यालये दाट लग्नतिथीमुळे फुल्ल आहेत. दररोज शहरातील चारही दिशेने सनई-चौघड्यांची वाजंत्रीचे आवाज, कुठे डीजेचे ताल, नाचत गाजत वराची मिरवणुकीत वºहाडी मंडळी आनंद घेताना दिसत आहे. मात्र, हा आनंद लग्नात जेवण केल्यानंतर निराशेत बदलू शकतो. लग्नसराईचा सिझन असल्यामुळे अनेक कॅटरर्स संचालक एक दिवसांपूर्वी अन्नपदार्थ बनविण्याच्या तयारीत लागतात. दुसऱ्या दिवशी लग्न लागल्यानंतर तेच अन्न वºहाड मंडळींना दिले जाते. आजच्या फॅशनच्या युगात आगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्न करण्याची पद्धत रुजू झालेली आहे. लग्नासोबतच अन्न पदार्थ वेगवेगळ्या डिशेश पाहून थक्क होण्याची वेळ येऊ लागली आहे. या अन्नपदार्थांपैकी काही दुग्धजन्य पदार्थाच्या मेजवानीचे वेगवेगळे स्टॉलसुद्धा सजविले जाते. सर्वसाधारण पोळी, भाजी, वरण, भात सारखे अन्न जेवणात असतात. सकाळी शिजविलेले अन्न रात्रीच्या वेळेत खाण्यात आल्यास ते पचनी पडते. मात्र, ते अन्न शिळे असल्यास विषबाधेचा त्रास जाणवतोच. याशिवाय अन्य आकर्षक दुग्धजन्य अन्न पदार्थांचा स्वाद घेण्यास अनेक जण इच्छुक असतात. त्याच पदार्थांवर सर्वाधिक ताव वºहाडी मंडळी मारत असतात. मात्र, जर शिळे दुग्धजन्य पदार्थ खाण्यात आल्यास विषबाधेचा प्रभाव अधिक जाणवतो. शहरात लग्नसराईत काही मंगल कार्यालये व लॉनमधील कार्यक्रमातील जेवण करून घरी गेल्यानंतर अनेकांना उलट्यांचा व अतिसाराचा त्रास जाणवला आहे. नाव न छापण्याच्या अटीवर लग्न वºहाडींनी आपली व्यथा ‘लोकमत’समोर मांडली. शुक्रवारी रात्री बडनेरा रोडवरील एका लॉनमधील कार्यक्रम आटोपून घरी पोहोचलेल्या नागरिकांना मळमळ, उलट्या व अतिसाराचा मोठा त्रास जाणवला. त्यांनी आपआपल्या फॅमीली डॉक्टरांकडे धाव घेऊन उपचार केलेत. उलट्या करून अदमुसे झाल्याच्या स्थितीपर्यंत अनेकांची प्रकृती खालावल्याचेही आढळून आले आहे.नोंदणीकृत परवानाधारक असल्याची शहानिशा कराशहरात शेकडोंच्या संख्येने कॅटरर्स चालविणारे असून, त्यापैकी काहीच कॅटरर्सने अन्न व औषधी प्रशासनाकडे नोंदणी करून अधिकृत परवाना घेतला आहे. ज्या कॅटरर्स संचालकांकडे एफडीएचा परवाना आहे, अशाच कॅटरर्सना जेवण तयार करण्याची आॅर्डर दिल्यास ते जेवणाबाबत योग्य ती काळजी घेऊ शकतात. अनधिकृत कॅटरर्स संचालक खाद्य पदार्थ तयार करण्यात हयगय करू शकतात. अन्न पदार्थाविषयी अनधिकृत कॅटरर्स चालक हवी तशी तसदी घेत नाही. अशाप्रसंगी शिळ्या अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी परवानाधारक कॅटरर्स असल्याची खात्री करूनच जेवण तयार करण्याची आर्डर द्यावी, असे आवाहन एफडीए सहायक आयुक्त एस.डी. केदार यांनी केले आहे.ही आहेत लक्षणेशिळे किंवा दूषित अन्नपदार्थ खाण्यात आल्याने मळमळ, उलट्या, हातपाय थरथर कापणे, अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात.अशी घ्यावी काळजीअन्नातून विषबाधा झाल्यास सर्वप्रथम जड अन्न खाणे बंद करा. इलेक्ट्राल पावडरयुक्त पाणी अधिक प्यावे. हलके अन्न ग्रहण करावे, जसे वरण-भात, सोजी व फळे. हा त्रास कमी होत नसल्यास डॉक्टरांच्या सल्लाने औषधोपचार घ्यावा, अशी माहिती उदरविकार तज्ज्ञ उज्वल बारंगे यांनी दिली.लग्न समारंभ वैयक्तिक असल्यामुळे संबंधित व्यक्तीनेच काळजी घेणे आवश्यक आहे. लग्नसमारंभाच्या आयोजकांनी नोंदणीकृत परवानाधारक कॅटरर्स असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. कॅटरर्सला वेळोवेळी सूचना देतो.- एस.डी. केदारसहायक आयुक्त (अन्न)लग्नातील जेवणात बुफे पार्टीत वेगवेगळ्या पदार्थाचा स्वाद घेतला आहे. मात्र, काही वेळा पोट दुखण्यासह उलट्यांचाही त्रास जाणवला आहे. आपल्या परिचयातील लग्न असल्यामुळे तक्रार करावी तरी कोणाकडे, असा पेच अशावेळी पडतो.- राजेश जगतापनागरिक.लग्न समारंभातील जेवण चांगले असेल, या भावनेतून आपण जेवण करतो. मात्र, जेवल्यानंतर अनेकदा पोटाचा त्रास जाणवला आहे. कारणे काहीही असोत, पाहुणे मंडळींना चांगले अन्न मिळायलाच हवे.- संदीप तेलखेडेनागरिकशिळे अन्न खाण्यात आल्यास पचनक्रिया मंदावते. उलट्या, मळमळ, अतिसाराचा त्रास जाणवतो. सध्या लग्न सराईत हे प्रमाण वाढले असून, दररोज पाच ते सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत.- उज्ज्वल बारंगेउदरविकार तज्ज्ञ.