शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

चार जुलैला सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १५२ दशलक्ष किमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:21 PM

पृथ्वी-सूर्याचे सरासरी अंतर १५ कोटी किमी. असते. मात्र, दर चार वर्षांनी ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे सर्वाधिक अंतर १५२ दशलक्ष किमी राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'अ‍ॅपीहेलिऑन' म्हणजे अपसूर्य असे म्हणतात.

ठळक मुद्दे सरासरी अंतर १५ कोटी किमी'अ‍ेपिहेलिऑन'

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पृथ्वी-सूर्याचे सरासरी अंतर १५ कोटी किमी. असते. मात्र, दर चार वर्षांनी ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे सर्वाधिक अंतर १५२ दशलक्ष किमी राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'अ‍ॅपीहेलिऑन' म्हणजे अपसूर्य असे म्हणतात. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असते.सूर्य हा तप्त वायूचा गोळा असून, यात हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र सुरू राहते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळते. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलियम तयार होते. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तूमानाचे रुपांतर सौर ऊर्जेत होते. सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी होते त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असतात. या डागाचा शोध सन १८४३ मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला. या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले आहेत. फेब्रुवारी २००८ पासून २४ वा चक्र सुरू झाले असून, मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.एक लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे एक सेमीने ओढली जातेयजग पाच खंडांत व्याप्त असून, हळूहळू ही पृथ्वी सूर्याकडे सरकू लागली आहे. दर एक लाख वर्षांनी एक सेंटीमीटरने ती सूर्याकडे ओढली जात आहे. न्यूयॉर्क शहर लंडनपासून दरवर्षी २.५ से.मी. दूर सरकल्याचे संशोधन नुकतेच पुढे आल्याचे हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

पाच अब्ज वर्षांनी सूर्याचे बटुक ताऱ्यात रुपांतरसूर्याचे वय १० अब्ज वर्ष वैज्ञानिक सर ऑर्थर एडींग्टन यांनी निश्चित केले आहे. त्यापैकी ५ अब्ज वर्षे निघून गेले असून, उर्वरित पाच अब्ज वर्षानंतर सूर्याचे अंत होऊन बटू ताऱ्यात रुपांतर होईल. सूर्याकडून चुंबकीय लहरी फेकºया जात असल्याने कधी-कधी चुंबकीय वादळे आल्याचे सांगण्यात आले आहे. सन १८५९ मध्ये ते वादळ आल्याने जगातील टेलीग्राफ यंत्रणा बंद पडल्याची खगोलशास्त्रात नोंद आहे. या वादळाला 'केरीगटन' इव्हेंट' हे नाव दिले होते. या वादळाने सॅटेलाईट, जीपीएस यंत्रणा पूर्णपणे बंद पडतात.४ जुलैला पृथ्वी-सूर्य हे अंतर अधिक असण्याचा सजीव सृष्टीवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. मात्र, सूर्याकडे साध्या डोळ्यांनी थेट पाहिल्यास धोका संभवण्याची शक्यता आहे.- विजय गिरुळकर, हौशी खगोल अभ्यासक, अमरावती

टॅग्स :Earthपृथ्वी