शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चार जुलैला सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १५२ दशलक्ष किमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:23 IST

पृथ्वी-सूर्याचे सरासरी अंतर १५ कोटी किमी. असते. मात्र, दर चार वर्षांनी ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे सर्वाधिक अंतर १५२ दशलक्ष किमी राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'अ‍ॅपीहेलिऑन' म्हणजे अपसूर्य असे म्हणतात.

ठळक मुद्दे सरासरी अंतर १५ कोटी किमी'अ‍ेपिहेलिऑन'

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पृथ्वी-सूर्याचे सरासरी अंतर १५ कोटी किमी. असते. मात्र, दर चार वर्षांनी ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे सर्वाधिक अंतर १५२ दशलक्ष किमी राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'अ‍ॅपीहेलिऑन' म्हणजे अपसूर्य असे म्हणतात. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असते.सूर्य हा तप्त वायूचा गोळा असून, यात हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र सुरू राहते. सूर्याच्या केंद्रामध्ये एका सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळते. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलियम तयार होते. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तूमानाचे रुपांतर सौर ऊर्जेत होते. सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी होते त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असतात. या डागाचा शोध सन १८४३ मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला. या डागाचे आतापर्यंत २३ चक्र पूर्ण झाले आहेत. फेब्रुवारी २००८ पासून २४ वा चक्र सुरू झाले असून, मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.एक लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे एक सेमीने ओढली जातेयजग पाच खंडांत व्याप्त असून, हळूहळू ही पृथ्वी सूर्याकडे सरकू लागली आहे. दर एक लाख वर्षांनी एक सेंटीमीटरने ती सूर्याकडे ओढली जात आहे. न्यूयॉर्क शहर लंडनपासून दरवर्षी २.५ से.मी. दूर सरकल्याचे संशोधन नुकतेच पुढे आल्याचे हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

पाच अब्ज वर्षांनी सूर्याचे बटुक ताऱ्यात रुपांतरसूर्याचे वय १० अब्ज वर्ष वैज्ञानिक सर ऑर्थर एडींग्टन यांनी निश्चित केले आहे. त्यापैकी ५ अब्ज वर्षे निघून गेले असून, उर्वरित पाच अब्ज वर्षानंतर सूर्याचे अंत होऊन बटू ताऱ्यात रुपांतर होईल. सूर्याकडून चुंबकीय लहरी फेकºया जात असल्याने कधी-कधी चुंबकीय वादळे आल्याचे सांगण्यात आले आहे. सन १८५९ मध्ये ते वादळ आल्याने जगातील टेलीग्राफ यंत्रणा बंद पडल्याची खगोलशास्त्रात नोंद आहे. या वादळाला 'केरीगटन' इव्हेंट' हे नाव दिले होते. या वादळाने सॅटेलाईट, जीपीएस यंत्रणा पूर्णपणे बंद पडतात.४ जुलैला पृथ्वी-सूर्य हे अंतर अधिक असण्याचा सजीव सृष्टीवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. मात्र, सूर्याकडे साध्या डोळ्यांनी थेट पाहिल्यास धोका संभवण्याची शक्यता आहे.- विजय गिरुळकर, हौशी खगोल अभ्यासक, अमरावती

टॅग्स :Earthपृथ्वी