शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ई-पीक पाहणी आता 'मोबाईल अ‍ॅप'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या सातबारावर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंद असणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने सदर मोबाईल अ‍ॅपवर नोंदी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अमरावती विभागातून अचलपूर तालुक्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या हिताचा उपक्रम : कृषी विभागाकडून माहिती 'अपलोड' करण्याचे आवाहन

अचलपूर/परतवाडा : शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने 'ई पीक पाहणी' हे मोबाईलवरील अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपचा वापर करून शेतकरी स्वत: आपल्या शेतातील पिकांची नोंद सातबारावर करू शकणार आहेत.शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या सातबारावर त्यांनी पेरलेल्या पिकांच्या नोंद असणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणी जलद, वस्तुनिष्ठ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने सदर मोबाईल अ‍ॅपवर नोंदी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अमरावती विभागातून अचलपूर तालुक्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आलेली आहे. यात वेळोवेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बाठिया, माजी सनदी अधिकारी नरेंद्र कवडे, संभाजी कडू पाटील, तांत्रिक सल्लागार रामदास जगताप व त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे. हा प्रकल्प अचलपूर तालुक्यात यशस्वी व्हावा यासाठी विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त गजेंद्र बावणे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे, उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख हे सर्व मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कोतवाल, कृषी सहायक, पोलीस पाटील यांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहित करत आहेत.अ‍ॅप शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचे?या माहितीचा उपयोग आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्री करणे, पीककर्ज, पीकविमा, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप करणे, न्यायालयीन प्रकरणे यामध्ये होणार आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात अचलपूर तालुक्यातील २३,८०८ शेतकऱ्यांनी या अ‍ॅपद्वारे आपली नोंदणी केली. तालुक्यातील हिवरा, दोनोडा, येसुर्णा, येलकी, रायपुरा, भिलोना, वडगाव खु। या गावांत ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे उल्लेखनीय काम झालेले आहे. १५ जुलैपासून खरीप हंगामातील संपूर्ण पीक पाहणी सदर अ‍ॅपच्या माध्यमातून केली जाईल.अ‍ॅपवरील माहिती मराठी भाषेत उपलब्धसर्व शेतकऱ्यांना मोबाईलवर प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप सहज घेता येते. या अ‍ॅपमध्ये सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाची नोंद घेऊ शकतो. पिकाचा फोटो काढून तो अ‍ॅपवर 'अपलोड' करू शकतो. शेतकऱ्यांनी पिकाची नोंद करताच ही माहिती तलाठी त्यांच्या 'लॉग इन'वर उपलब्ध होणार आहे. त्याला तलाठ्यांनी मान्यता देताच त्या नोंदीचा अंमल शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर तात्काळ होते. ई-पीक पाहणी अ‍ॅपवरून शेतकऱ्यांनी पिकाची नोंद केल्यास अचूक होईल.जे शेतकरी मोबाईलच्या माध्यमातून स्वत: ई-पीक पाहणी करणार नाहीत, त्यांच्या पिकाची नोंद सातबारावर होणार नाही. त्यामुळे त्यांना पीककर्जासह कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येतील. सदर अ‍ॅपद्वारे पिकाची नोंद करावी.- मदन जाधव,तहसीलदार, अचलपूर

टॅग्स :agricultureशेतीMobileमोबाइल