शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

चांदूर बाजारात आठ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 13:29 IST

शेतकऱ्यांनो तुम्ही ई-केवायसी केली नसल्याने दुष्काळाचा निधी रखडला : सतत सूचना देऊनही अव्हेर

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : राज्य शासनाने शेतकऱ्यांना दुष्काळ, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यांचा निधी वितरित केला. यामध्ये २०२१-२२ व २०२२-२३ तसेच २०२३ खरीप मधील अतिवृष्टीच्या अंशतः मदतीचा समावेश आहे. महसूल प्रशासनाद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र, मार्च महिन्यापासून जूनपर्यंत शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी अद्याप केली नाही.

आजच्या घटकेला तालुक्यात ८ हजार ३०० लाभार्थी शेतकऱ्यांची ई- केवायसी प्रलंबित आहे. अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात ई- केवायसी न केल्यामुळे मुदत संपल्यानंतर ते व्ही. के. नंबर रद्द झाले. शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने नव्याने निधी मंजूर करून पुन्हा नवीन व्ही. के. नंबर दिले. ई- केवायसीकरिता व्ही. के. नंबर महसूल प्रशासनाने तलाठ्यांद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले. मात्र, चार महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी आपली ई- केवायसी केली नाही. तेव्हा शासन आहे द्यायला, पदर नाही घ्यायला, असे म्हणायची वेळ आली आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांच्या पेंडिंग ई केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. त्यासाठी तहसीलदार चांदूरबाजार यांनी मंडळ अधिकारी, तलाठी व सेतू केंद्र चालक यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत या सर्वांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गावात मुनादी देऊन व प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्याला ई केवायसी करण्यास प्रेरित करावे, तसेच ई केवायसी संबंधात केलेल्या कामाची विशेष दैनंदिन नोंदी ठेवाव्या. या कामात हयगय केल्यास त्यासंबंधीचा लेखी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, अशी सक्त ताकीदही या बैठकीत देण्यात आली.

"स्थानिक महसूल प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. लवकरात लवकर पेंडिंग ई- केवायसी करून घेण्याचा स्थानिक महसूल प्रशासनाचा प्रयत्न राहील."- रूणय जक्कुलवार, तहसीलदार, चांदूर बाजार

टॅग्स :farmingशेतीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती