शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी कर्तव्यावरील कर्मचारीच दोषी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 19:11 IST

Amravati News ¯ मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केल्याप्रकरणी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.

ठळक मुद्देबराकीचे तोडलेले कुलूप पोलिसांच्या ताब्यातचौकशी समितीने नोंदविले कैदी, कर्मचाऱ्यांचे बयाण

अमरावती : मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केल्याप्रकरणी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. दरम्यान शनिवारी चौकशीच्या तिसऱ्या दिवशी कर्मचारी आणि कैद्यांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरूच होती. रविवार, ३ जुलै रोजी चौकशी पूर्ण हाेणार असून, येत्या आठवड्यात अहवाल कारागृह प्रशासनाच्या डीआयजी स्वाती साठे यांच्याकडे सोपविला जाणार आहे.

अमरावती ‘जेलब्रेक’ प्रकरणाचा तपास डीआयजी साठे यांनी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे सोपविला आहे. त्यानुसार चौकशी समितीचे पथक गुरुवारपासून अमरावती मध्यवर्ती कारागृहात तळ ठोकून आहे. प्रारंभी चौकशी समितीने कारागृहातील घटनाक्रम जाणून घेतला. तीन कैदी पलायन झाल्याचा मार्ग, वापरण्यात आलेले अंथरूण, कारागृहाच्या तटाची उंची, आतील संरक्षण भिंतीची उंची, बराकीतून बाहेर पडल्यानंतर कोणत्या छतावरून कैद्यांनी पलायन केले, अशा विविध बाबींचा उलगडा करण्याचा प्रयत्न चौकशी समितीने केल्याची माहिती आहे.

‘जेलब्रेक’ प्रकरणाशी संबंधित १० कर्मचारी, सहा कैद्यांचे बयाण शनिवारपर्यंत नोंदविण्यात आले आहे. मात्र, चौकशी समितीने २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजता घटनेच्या दिवशी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक, अंतर्गत सुरक्षा अधिकारी दोषी असल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत. तथापि, दोषी कोण? हे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निश्चित होईल, अशी माहिती आहे.

कैद्यांनी तोडलेले कुलूप पोलिसांकडून जप्त

बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केले. हे तोडलेले कुलूप फ्रेजरपुरा पाेलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे; परंतु कुलूप तोडण्यासाठी कोणते साहित्य वापरण्यात आले, याचा उलगडा अद्यापही होऊ शकला नाही. कारागृह प्रशासनाने नेमलेली चौकशी समितीसुद्धा कुलूप तोडण्यात आल्याबाबत चकित झाली आहे. सुरक्षा व्यवस्थेत उणिवा असल्यामुळेच ‘जेलब्रेक’ झाले असे एकूणच चौकशीनंतरचे वास्तव आहे.

दोषींवर होणार निलंबनाची कारवाई

बराकीचे कुलूप तोडून तीन कैद्यांनी पलायन केल्याप्रकरणी ४ ते ५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचे दिसून येते. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळेच कैद्यांनी पलायन होण्याचे षड्यंत्र रचले, असेही चौकशी समितीच्या निदर्शनास आल्याचे विश्वासू सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या आठवड्यात ४ ते ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :jailतुरुंग