शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी कर्तव्यावरील कर्मचारीच दोषी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 19:11 IST

Amravati News ¯ मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केल्याप्रकरणी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.

ठळक मुद्देबराकीचे तोडलेले कुलूप पोलिसांच्या ताब्यातचौकशी समितीने नोंदविले कैदी, कर्मचाऱ्यांचे बयाण

अमरावती : मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केल्याप्रकरणी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. दरम्यान शनिवारी चौकशीच्या तिसऱ्या दिवशी कर्मचारी आणि कैद्यांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरूच होती. रविवार, ३ जुलै रोजी चौकशी पूर्ण हाेणार असून, येत्या आठवड्यात अहवाल कारागृह प्रशासनाच्या डीआयजी स्वाती साठे यांच्याकडे सोपविला जाणार आहे.

अमरावती ‘जेलब्रेक’ प्रकरणाचा तपास डीआयजी साठे यांनी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे सोपविला आहे. त्यानुसार चौकशी समितीचे पथक गुरुवारपासून अमरावती मध्यवर्ती कारागृहात तळ ठोकून आहे. प्रारंभी चौकशी समितीने कारागृहातील घटनाक्रम जाणून घेतला. तीन कैदी पलायन झाल्याचा मार्ग, वापरण्यात आलेले अंथरूण, कारागृहाच्या तटाची उंची, आतील संरक्षण भिंतीची उंची, बराकीतून बाहेर पडल्यानंतर कोणत्या छतावरून कैद्यांनी पलायन केले, अशा विविध बाबींचा उलगडा करण्याचा प्रयत्न चौकशी समितीने केल्याची माहिती आहे.

‘जेलब्रेक’ प्रकरणाशी संबंधित १० कर्मचारी, सहा कैद्यांचे बयाण शनिवारपर्यंत नोंदविण्यात आले आहे. मात्र, चौकशी समितीने २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजता घटनेच्या दिवशी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक, अंतर्गत सुरक्षा अधिकारी दोषी असल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत. तथापि, दोषी कोण? हे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निश्चित होईल, अशी माहिती आहे.

कैद्यांनी तोडलेले कुलूप पोलिसांकडून जप्त

बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केले. हे तोडलेले कुलूप फ्रेजरपुरा पाेलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे; परंतु कुलूप तोडण्यासाठी कोणते साहित्य वापरण्यात आले, याचा उलगडा अद्यापही होऊ शकला नाही. कारागृह प्रशासनाने नेमलेली चौकशी समितीसुद्धा कुलूप तोडण्यात आल्याबाबत चकित झाली आहे. सुरक्षा व्यवस्थेत उणिवा असल्यामुळेच ‘जेलब्रेक’ झाले असे एकूणच चौकशीनंतरचे वास्तव आहे.

दोषींवर होणार निलंबनाची कारवाई

बराकीचे कुलूप तोडून तीन कैद्यांनी पलायन केल्याप्रकरणी ४ ते ५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचे दिसून येते. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळेच कैद्यांनी पलायन होण्याचे षड्यंत्र रचले, असेही चौकशी समितीच्या निदर्शनास आल्याचे विश्वासू सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या आठवड्यात ४ ते ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :jailतुरुंग