शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी कर्तव्यावरील कर्मचारीच दोषी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 19:11 IST

Amravati News ¯ मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केल्याप्रकरणी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.

ठळक मुद्देबराकीचे तोडलेले कुलूप पोलिसांच्या ताब्यातचौकशी समितीने नोंदविले कैदी, कर्मचाऱ्यांचे बयाण

अमरावती : मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केल्याप्रकरणी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. दरम्यान शनिवारी चौकशीच्या तिसऱ्या दिवशी कर्मचारी आणि कैद्यांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरूच होती. रविवार, ३ जुलै रोजी चौकशी पूर्ण हाेणार असून, येत्या आठवड्यात अहवाल कारागृह प्रशासनाच्या डीआयजी स्वाती साठे यांच्याकडे सोपविला जाणार आहे.

अमरावती ‘जेलब्रेक’ प्रकरणाचा तपास डीआयजी साठे यांनी चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे सोपविला आहे. त्यानुसार चौकशी समितीचे पथक गुरुवारपासून अमरावती मध्यवर्ती कारागृहात तळ ठोकून आहे. प्रारंभी चौकशी समितीने कारागृहातील घटनाक्रम जाणून घेतला. तीन कैदी पलायन झाल्याचा मार्ग, वापरण्यात आलेले अंथरूण, कारागृहाच्या तटाची उंची, आतील संरक्षण भिंतीची उंची, बराकीतून बाहेर पडल्यानंतर कोणत्या छतावरून कैद्यांनी पलायन केले, अशा विविध बाबींचा उलगडा करण्याचा प्रयत्न चौकशी समितीने केल्याची माहिती आहे.

‘जेलब्रेक’ प्रकरणाशी संबंधित १० कर्मचारी, सहा कैद्यांचे बयाण शनिवारपर्यंत नोंदविण्यात आले आहे. मात्र, चौकशी समितीने २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजता घटनेच्या दिवशी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक, अंतर्गत सुरक्षा अधिकारी दोषी असल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत. तथापि, दोषी कोण? हे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निश्चित होईल, अशी माहिती आहे.

कैद्यांनी तोडलेले कुलूप पोलिसांकडून जप्त

बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केले. हे तोडलेले कुलूप फ्रेजरपुरा पाेलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे; परंतु कुलूप तोडण्यासाठी कोणते साहित्य वापरण्यात आले, याचा उलगडा अद्यापही होऊ शकला नाही. कारागृह प्रशासनाने नेमलेली चौकशी समितीसुद्धा कुलूप तोडण्यात आल्याबाबत चकित झाली आहे. सुरक्षा व्यवस्थेत उणिवा असल्यामुळेच ‘जेलब्रेक’ झाले असे एकूणच चौकशीनंतरचे वास्तव आहे.

दोषींवर होणार निलंबनाची कारवाई

बराकीचे कुलूप तोडून तीन कैद्यांनी पलायन केल्याप्रकरणी ४ ते ५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचे दिसून येते. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळेच कैद्यांनी पलायन होण्याचे षड्यंत्र रचले, असेही चौकशी समितीच्या निदर्शनास आल्याचे विश्वासू सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या आठवड्यात ४ ते ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :jailतुरुंग