शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हरमच्या वेदांतमुळे मिळाले तिघांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

हरम येथील दुष्यंतसिंह बद्रटिये आणि अंजली या दाम्पत्याचा दहावीत शिकणारा मुलगा वेदांत हा शिकवणीकरिता २७ नोव्हेंबरला अचलपूरला सायकलने गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास त्याला गावापासून अर्धा किलोमीटर अपघात झाला. त्याला प्रथम परतवाडा व नंतर अमरावती येथे खासगी रुग्णालयात तेथे शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तो ब्रेनडेड अवस्थेला गेला.

ठळक मुद्देअवयवदान : कुटुंबीय, सामाजिक संघटनांचा पुढाकार; नागपूरकरिता ‘ग्रीन कॉरिडॉर’,

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील हरम येथील वेदांतमुळे तिघांना जीवनदान मिळाले आहे. वेदांत ब्रेनडेड अवस्थेत गेल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी २ डिसेंबर रोजी आपल्या एकुलता एक मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय समाजाला प्रेरक ठरला आहे.हरम येथील दुष्यंतसिंह बद्रटिये आणि अंजली या दाम्पत्याचा दहावीत शिकणारा मुलगा वेदांत हा शिकवणीकरिता २७ नोव्हेंबरला अचलपूरला सायकलने गेला. सायंकाळी ७ च्या सुमारास त्याला गावापासून अर्धा किलोमीटर अपघात झाला. त्याला प्रथम परतवाडा व नंतर अमरावती येथे खासगी रुग्णालयात तेथे शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तो ब्रेनडेड अवस्थेला गेला. तेथून त्याला नागपूर येथे दाखल केले. ३० नोव्हेंबरला वेदांतला ब्रेनडेड स्थितीत परतवाडा येथील डॉ. आशिष भंसाली यांच्या दवाखान्यात आणले गेले. १ नोव्हेंबरला वेदांतच्या स्थितीबाबत आई अंजली यांना माहिती देण्यात आली आणि त्याच शोकमग्न अवस्थेत किशोर बद्रटिये, सचिन बद्रटिये, कैलास बद्रटिये, राजू खोजरे, मंगेश भोरे यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. डॉ. आशिष भंसालींसह पुनर्जीवन फाऊंडेशनचे डॉ. राजेश उभाड, डॉ. हर्षराज डफडे, जितेंद्र रोडे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत २ डिसेंबरला अवयवदानाची प्रक्रिया पूर्णत्वास नेली.वेदांतची किडनी, यकृत नागपूरला पाठविण्यात आले. डोळे अमरावतीला हरिना फाऊंडेशन अंतर्गत आय बँकच्या सुपूर्द करण्यात आले. दिल्ली येथील डॉ. अजिताभ श्रीवास्तव आणि नागपूर येथील डॉ. प्रकाश जैन यांच्यासह त्यांच्या चमूने तब्बल दीड तास शस्त्रक्रिया केली. यानंतर ‘ग्रीन कॅरिडोर’ करून अवयव नागपूरला रवाना करण्यात आले.ग्रामीण भागातील पहिली व्यवस्थाग्रामीण भागात किंवा लहान शहरांपैकी परतवाडा येथे असलेली ही व्यवस्था राज्यात पहिली आणि एकमेव असल्याची माहिती डॉ. हर्षराज डफडे यांनी ‘लोकमत’ला दिली. अचलपूर तालुक्यातील ३०० जणांनी मागील दीड वर्षांत अवयवदानाचा संकल्प केला असल्याचे पुनर्जीवन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश उभाड यांनी दिली.