शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

‘आॅनलाईन’च्या सक्तीमुळे ‘पणन’ची केंद्रे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:21 IST

जिल्ह्यात पणन महासंघाची सहा व सीसीआयची दोन केंद्रे सुरू झाली. मात्र, उद्घाटनाला कापसाचे बोंडही मिळाले नाही.

ठळक मुद्देशेतकºयांची धाव व्यापाºयांकडे : कापसाला दोन्ही ठिकाणी भाव सारखाच

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात पणन महासंघाची सहा व सीसीआयची दोन केंद्रे सुरू झाली. मात्र, उद्घाटनाला कापसाचे बोंडही मिळाले नाही. खुल्या बाजारात शासन केंद्राइतकाच भाव मिळत असताना केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्थींचा भडीमार असल्यानेच शेतकºयांनी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. केवळ अंजनगाव सुर्जी केंद्रावर मुहूर्ताला ३० क्विंटल कापूस मिळाला. आतापर्यंत आठ केंद्रांवर केवळ १६ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असल्याचे वास्तव आहे.यंदा अमरावती, अचलपूर, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तिवसा व वरूड या केंद्रांवर २५ आॅक्टोबरपासून कापसाची खरेदी सुरू झाली. मात्र अंजनगाव सुर्जी वगळता या केंद्रांवर आतापर्यतची खरेदी निरंक आहे. हीच स्थिती सीसीआयची आहे. चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात आली असताना शेतकºयांची मात्र पाठ आहे. यंदा पणनला स्वतंत्रपणे कापूस खरेदीची परवानगी नाकारली. सीसीआयची अभिकर्ता म्हणूून खरेदीची परवानगी दिली. सध्या ६ केंद्रांवर पणन महासंघाद्वारा कापूस खरेदीचा शुभारंभ केला. तूर्तास शेतकºयांवर कापूस नाही, ज्यांच्याकडे कापूस आहे तो शेतकरी केंद्रावरील अटी व शर्तीमूळे खुल्या बाजारात वळला आहे.बोनस देण्याची घोषणा, पूर्तता नाहीचराज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी कापसाला किमान ५०० रूपये बोनस देण्याची घोषणा केली होती. अद्यापही या घोषणेची पूर्तता नाहीच. गुजरात सरकारने कापूस उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. राज्यात अशीच स्थिती राहिल्यास कापूस व कापड उद्योगांवर संक्रांत येणार आहे.नोंदणीसाठी अटी-शर्तींचा भडीमारपणनच्या कापूस खरेदी केंद्रांवर कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकºयांना बाजार समितीमध्ये आॅनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी शेतकºयांना सातबारा, बँकेचे खाते क्रमांकासह अधारक्रमांकही द्यावा लागणार आहे. यामध्ये कापसात आठ ते १२ टक्क्यांपेक्षा आर्द्रता नको, हेदेखील निकष आहे. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी कापसाचे पेमेंट एका आठवड्यात देण्याचे आश्वासन दिले असले तरी केंद्रांवर अटी व शर्तींचा भडीमार असल्यानेच शेतकºयांचा कल व्यापाºयांकडे आहे.असा आहे हमीभाव अन् खासगीत भावयंदाच्या हंगामात कापसाच्या वाणानुसार हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या स्टेपलमध्ये ४,३२० व दुसºया स्टेपलमध्ये ४,२२० रुपये प्रतिक्विंटल असा दर जाहीर करण्यात आलेले आहेत. खासगी बाजारात एक नोव्हेंबरला विक्री झालेल्या कापसानुसार अमरावतीला सरासरी ४००० रूपये, धामणगाव रेल्वे ४२००, अचलपूर ४३५० तर धारणी येथे ४०५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे