शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

भूकंपाच्या हादऱ्याने अमरावती जिल्ह्यातले साद्राबाडी पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:20 PM

मेळघाटातील साद्राबाडी येथे सातत्याने भूकंपाचे हादरे बसत असल्याने भीतीपोटी नागरिक नातेवाईकांकडे गेल्याने गाव ओस पडले आहे.

ठळक मुद्देशासकीय यंत्रणा पोहोचलीमहिला, मुले नातेवाइकांकडे, घराची राखण करताहेत पुरुष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील साद्राबाडी येथे सातत्याने भूकंपाचे हादरे बसत असल्याने भीतीपोटी नागरिक नातेवाईकांकडे गेल्याने गाव ओस पडले आहे. गावात घरांची राखण करण्यासाठी प्रत्येकी एक व्यक्ती थांबली असून, सायंकाळी गावाबाहेर व सकाळी पुन्हा गावात, अशी बहुतांश कुटुंबांची दैनंदिनी झाली आहे.२२ आॅगस्टला दुपारी ४ नंतर धरणीकंप झाला. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास एक मोठा हादरा बसला. त्यानंतर २.३० च्या सुमारास पाच जबर हादरे बसले. गुरुवारी पहाटे ५.३० वाजता सौम्य हादरे बसले. त्यानंतर सकाळी ७ वाजता पुन्हा जबर हादरा बसला. नंतर सकाळी १०.२१ ते १०.५८ पर्यंत पाच जबर हादरे बसले. धरणी कंपाचे हे सत्र सतत सुरू असल्याने नागरिकांनी बुधवारीच महिला व मुलांना नातेवाईकांच्या घरी पोहचविले. त्यामुळे परिसरातील गावे ओस पडली आहेत. नागरिकांच्या मनातून भूकंपाची भीती कमी झालेली नाही. जमिनीला बसणाऱ्या हादऱ्यांचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

सूनबाई गेल्या माहेरीगावात लग्न होऊन आलेल्या नवीन सूनेला तिच्या माहेरचे लोक मंडळी भूकंपाच्या वार्तेने घेऊन गेले आहेत. गावातील ५० टक्के महिला व मुले गाव सोडून गेले आहेत.

आपत्ती निवारण पथक पोहोचलेअमरावतीहून धारणीमार्गे लगतच्या साद्राबाडीसह लगतच्या गोलांडोह गावात आपत्ती निवारण पथक दाखल झाले. पथकात १० जवानांचा समावेश आहे. गुरुवारी पथकाने आजूबाजूच्या गावांना भेटी देऊन लोकांना धीर दिला.भाजपकडून मदतीचा हातभारतीय जनता पक्षातर्फे रेस्क्यू पथक आणि कर्मचाऱ्यांसाठी जेवण व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील हे कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद शाळेत नाश्ता आणि जेवण घेऊन आले.

टॅग्स :Earthquakeभूकंप