शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील साडेसहा हजार गावांमध्ये दुष्काळस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 20:15 IST

यंदाच्या खरीप हंगामात विभागात लागवडीयोग्य ७ हजार २१५ गावांत खरिपाची अंतिम पैसेवारी सोमवारी विभागीय आयुक्तांनी जाहीर केली.

गजानन मोहोडअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात लागवडीयोग्य ७ हजार २१५ गावांत खरिपाची अंतिम पैसेवारी सोमवारी विभागीय आयुक्तांनी जाहीर केली. यामध्ये ६ हजार ५२४ गावांना न्याय देण्यात आला. या गावांत ४८ पैसेवारी आहे. उर्वरित ६९१ गावांमध्ये पीक स्थिती उत्तम असल्याचा जावईशोध महसूल विभागाने लावला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ६४२, तर वाशिम जिल्ह्यातील १९ गावांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.प्रचलित धोरणानुसार, अमरावती विभागात खरिपाची अंतिम पैसेवारी ही १५ जानेवारीला जाहीर केली जाते. मात्र, गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला पैसेवारी जाहीर करावी, असे आदेश महसूल विभागाने दिले. यंदा ३१ डिसेंबरला रविवार असल्याने दुसरे दिवशी सोमवारी पैसेवारी जाहीर करण्यात आली. यामुळे विभागातील ६,५२४ गावातील उद्ध्वस्त खरिपावर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदाच्या हंगामात पेरणीपासूनच पावसाच्या सरासरीत कमी व सलग खंड राहिला. यंदाच्या पावसाळ्यात १२० दिवसांपैकी जूनमध्ये ९, जुलै १२, आॅगस्ट ९ व सप्टेंबर महिन्यात ८ असे एकूण ३६ दिवस पाऊस पडला. बुलडाणा जिल्ह्यात ९९, तर उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये पावसाची ७६ टक्केवारी राहिली. कमी पावसाने मूग, उडीद व सोयाबीनसारखी अल्प कालावधीतील पिके बाद झालीत. शासनस्तरावर तुरीचे पीक हे रबीमध्ये गृहीत धरले जाते.  त्यामुळे शेतकºयांची सर्व दारोमदार कपाशीवर असताना, पात्या-फुलांवर आलेल्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा मोठा अटॅक झाला. यामध्ये विभागातील किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशी उद्ध्वस्त झाली. काही ठिकाणी नुकसानाची पातळी ९६ टक्क्यांपर्यंत असल्याचे कृषी विभागाच्या पंचनाम्यात स्पष्ट झाले. शेतातील उभ्या कपाशीवर शेतकºयांनी रोटाव्हेटर फिरविला. शासनाने पंचनाम्याचे आदेश देऊन जिरायती क्षेत्राला दोन हेक्टर मर्यादेत ३० हजार ८०० रुपये किमान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा केली. आता जिल्ह्यात दुष्काळस्थितीच स्पष्ट झाल्याने शासन याव्यतिरिक्त कोणत्या सोयी-सुविधा जाहीर करते, याकडे लक्ष लागले आहे.

अशी आहे जिल्हानिहाय पैसेवारीविभागात लागवडीयोग्य  ७,२१५ गावे आहेत. यापैकी ६,५२४ गावांत सरासरी ४८ पैसेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १,९६३ गावात ४६ पैसे, अकोला जिल्ह्यातील ९९० गावांमध्ये ४४ पैसे, यवतमाळ जिल्ह्यात २,०४९ गावांमध्ये ४७ पैसे, वाशिम जिल्ह्यातील ७७४ गावांमध्ये ४७ पैसे व १९ गावांमध्ये ५० पैशांच्या वर तसेच  बुलडाणा जिल्ह्यात ७४८ गावात ५० पैशांपेक्षा कमी, तर ६७२ गावांत ५० पैशांच्या वर ५५ पैसे अशी पैसेवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जाहीर केली. या सर्व गावांमध्ये दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागू झाला आहे