शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

व-हाडातील साडेसहा हजार गावांमध्ये दुष्काळस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 20:15 IST

यंदाच्या खरीप हंगामात विभागात लागवडीयोग्य ७ हजार २१५ गावांत खरिपाची अंतिम पैसेवारी सोमवारी विभागीय आयुक्तांनी जाहीर केली.

गजानन मोहोडअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात लागवडीयोग्य ७ हजार २१५ गावांत खरिपाची अंतिम पैसेवारी सोमवारी विभागीय आयुक्तांनी जाहीर केली. यामध्ये ६ हजार ५२४ गावांना न्याय देण्यात आला. या गावांत ४८ पैसेवारी आहे. उर्वरित ६९१ गावांमध्ये पीक स्थिती उत्तम असल्याचा जावईशोध महसूल विभागाने लावला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ६४२, तर वाशिम जिल्ह्यातील १९ गावांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.प्रचलित धोरणानुसार, अमरावती विभागात खरिपाची अंतिम पैसेवारी ही १५ जानेवारीला जाहीर केली जाते. मात्र, गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला पैसेवारी जाहीर करावी, असे आदेश महसूल विभागाने दिले. यंदा ३१ डिसेंबरला रविवार असल्याने दुसरे दिवशी सोमवारी पैसेवारी जाहीर करण्यात आली. यामुळे विभागातील ६,५२४ गावातील उद्ध्वस्त खरिपावर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदाच्या हंगामात पेरणीपासूनच पावसाच्या सरासरीत कमी व सलग खंड राहिला. यंदाच्या पावसाळ्यात १२० दिवसांपैकी जूनमध्ये ९, जुलै १२, आॅगस्ट ९ व सप्टेंबर महिन्यात ८ असे एकूण ३६ दिवस पाऊस पडला. बुलडाणा जिल्ह्यात ९९, तर उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये पावसाची ७६ टक्केवारी राहिली. कमी पावसाने मूग, उडीद व सोयाबीनसारखी अल्प कालावधीतील पिके बाद झालीत. शासनस्तरावर तुरीचे पीक हे रबीमध्ये गृहीत धरले जाते.  त्यामुळे शेतकºयांची सर्व दारोमदार कपाशीवर असताना, पात्या-फुलांवर आलेल्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा मोठा अटॅक झाला. यामध्ये विभागातील किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशी उद्ध्वस्त झाली. काही ठिकाणी नुकसानाची पातळी ९६ टक्क्यांपर्यंत असल्याचे कृषी विभागाच्या पंचनाम्यात स्पष्ट झाले. शेतातील उभ्या कपाशीवर शेतकºयांनी रोटाव्हेटर फिरविला. शासनाने पंचनाम्याचे आदेश देऊन जिरायती क्षेत्राला दोन हेक्टर मर्यादेत ३० हजार ८०० रुपये किमान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा केली. आता जिल्ह्यात दुष्काळस्थितीच स्पष्ट झाल्याने शासन याव्यतिरिक्त कोणत्या सोयी-सुविधा जाहीर करते, याकडे लक्ष लागले आहे.

अशी आहे जिल्हानिहाय पैसेवारीविभागात लागवडीयोग्य  ७,२१५ गावे आहेत. यापैकी ६,५२४ गावांत सरासरी ४८ पैसेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १,९६३ गावात ४६ पैसे, अकोला जिल्ह्यातील ९९० गावांमध्ये ४४ पैसे, यवतमाळ जिल्ह्यात २,०४९ गावांमध्ये ४७ पैसे, वाशिम जिल्ह्यातील ७७४ गावांमध्ये ४७ पैसे व १९ गावांमध्ये ५० पैशांच्या वर तसेच  बुलडाणा जिल्ह्यात ७४८ गावात ५० पैशांपेक्षा कमी, तर ६७२ गावांत ५० पैशांच्या वर ५५ पैसे अशी पैसेवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जाहीर केली. या सर्व गावांमध्ये दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागू झाला आहे