शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 16:49 IST

पावसाने दीर्घ दडी मारल्याने परिसरातील अडीचशेवर गावे आणि दर्यापूर-अंजनगाव शहरांना पाणीपुरवठा करणा-या शहानूर प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

अंजनगाव सुर्जी, दि. 2 - ऑगस्ट महिन्यात पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याची भरीव आवक धरणात येणे आवश्यक होते, पण पावसाने दीर्घ दडी मारल्याने परिसरातील अडीचशेवर गावे आणि दर्यापूर-अंजनगाव शहरांना पाणीपुरवठा करणा-या शहानूर प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. तशा स्पष्ट सूचना जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपलवार यांनी कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याच्या सूचना ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. 

त्यानुसार या विभागाने धरणातील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पुरवठ्यावर आचारसंहिता लावण्याचे निश्चित केले आहे. सप्टेंबर महिन्यात जर पुरेशी आवक झाली नाही तर या धरणातून होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्याचे विभागाने निश्चित केले आहे. दिनांक २८ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा व जलसिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी धरणाची पाहणी करून हा निर्णय घेतला आहे. 

यावर्षी ऑगस्ट महिन्यात या धरणातील पाण्याची पातळी फक्त एक मीटरने वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने सलग २५ दिवसांची दडी मारल्याने धरणाच्या क्षेत्रात वाढलेली पातळी तीन वर्षांच्या तुलनेत नगण्य आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये ४३ दशलक्ष घनमीटरचा पाणीसाठा आॅगस्ट २०१५ मध्ये ३८ दशलक्ष घनमीटर झाला होता. ऑगस्ट २०१६ मध्ये त्यात समाधानकारक वाढ झाली. परंतु यावर्षी पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात धरणात फक्त ३३ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. त्यादृष्टीने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे. 

यावर्षी शहानूर नदीला एकही पूर गेला नाही. ज्या चिखलदरा तालुक्यातून नदीचा उगम आहे तेथे सर्वात कमी पाऊस पडला. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची एकदाही वेळ आली नाही. अन्यथा दरवर्षी जास्तीचे पाणी धरणातून सोडून पाण्याच्या पातळीचे नियोजन केले जाते. 

पाणीपुरवठा विभाग नियोजनाच्या तयारीतजलशुद्धीकरण केंद्रातून केला जाणारा पाणीपुरवठा व त्याची देखभाल दुरूस्ती यासाठीसुद्धा वेळ आवश्यक आहे. त्यात यावर्षी पाणी साठ्यातील झालेली चिंताजनक घट यामुळे अधिकाºयांनी नियोजन करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. अधिकारी वर्ग आवश्यक त्या उपाययोजना करीत असून प्रसार माध्यमांनासुद्धा याबाबत प्रसिद्धी देण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

धरणात पुरेसा पाणीसाठा

पावसाचे प्रमाण कमी असले तरी परतीचा पाऊस जाण्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दमदार हजेरीने नदी जिवंत झाली असून पाण्याची आवक समाधानकारक होईल, असे वाटते. निर्णय वरिष्ठ अधिकाºयांनी घ्यावयाचे असल्यामुळे त्यांची अंमलबजावणी आमच्यावर बंधनकारक आहे. - सुमित हिरेकर, शाखा अभियंता, शहानूर प्रकल्प, अंजनगाव