शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 16:49 IST

पावसाने दीर्घ दडी मारल्याने परिसरातील अडीचशेवर गावे आणि दर्यापूर-अंजनगाव शहरांना पाणीपुरवठा करणा-या शहानूर प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

अंजनगाव सुर्जी, दि. 2 - ऑगस्ट महिन्यात पावसाच्या प्रमाणानुसार पाण्याची भरीव आवक धरणात येणे आवश्यक होते, पण पावसाने दीर्घ दडी मारल्याने परिसरातील अडीचशेवर गावे आणि दर्यापूर-अंजनगाव शहरांना पाणीपुरवठा करणा-या शहानूर प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. तशा स्पष्ट सूचना जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपलवार यांनी कनिष्ठ अभियंत्यांना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याच्या सूचना ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. 

त्यानुसार या विभागाने धरणातील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पुरवठ्यावर आचारसंहिता लावण्याचे निश्चित केले आहे. सप्टेंबर महिन्यात जर पुरेशी आवक झाली नाही तर या धरणातून होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्याचे विभागाने निश्चित केले आहे. दिनांक २८ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा व जलसिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी धरणाची पाहणी करून हा निर्णय घेतला आहे. 

यावर्षी ऑगस्ट महिन्यात या धरणातील पाण्याची पातळी फक्त एक मीटरने वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने सलग २५ दिवसांची दडी मारल्याने धरणाच्या क्षेत्रात वाढलेली पातळी तीन वर्षांच्या तुलनेत नगण्य आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये ४३ दशलक्ष घनमीटरचा पाणीसाठा आॅगस्ट २०१५ मध्ये ३८ दशलक्ष घनमीटर झाला होता. ऑगस्ट २०१६ मध्ये त्यात समाधानकारक वाढ झाली. परंतु यावर्षी पावसाने दीर्घ उघडीप दिल्याने यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात धरणात फक्त ३३ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. त्यादृष्टीने पाण्याचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे. 

यावर्षी शहानूर नदीला एकही पूर गेला नाही. ज्या चिखलदरा तालुक्यातून नदीचा उगम आहे तेथे सर्वात कमी पाऊस पडला. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची एकदाही वेळ आली नाही. अन्यथा दरवर्षी जास्तीचे पाणी धरणातून सोडून पाण्याच्या पातळीचे नियोजन केले जाते. 

पाणीपुरवठा विभाग नियोजनाच्या तयारीतजलशुद्धीकरण केंद्रातून केला जाणारा पाणीपुरवठा व त्याची देखभाल दुरूस्ती यासाठीसुद्धा वेळ आवश्यक आहे. त्यात यावर्षी पाणी साठ्यातील झालेली चिंताजनक घट यामुळे अधिकाºयांनी नियोजन करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. अधिकारी वर्ग आवश्यक त्या उपाययोजना करीत असून प्रसार माध्यमांनासुद्धा याबाबत प्रसिद्धी देण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

धरणात पुरेसा पाणीसाठा

पावसाचे प्रमाण कमी असले तरी परतीचा पाऊस जाण्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दमदार हजेरीने नदी जिवंत झाली असून पाण्याची आवक समाधानकारक होईल, असे वाटते. निर्णय वरिष्ठ अधिकाºयांनी घ्यावयाचे असल्यामुळे त्यांची अंमलबजावणी आमच्यावर बंधनकारक आहे. - सुमित हिरेकर, शाखा अभियंता, शहानूर प्रकल्प, अंजनगाव