शहरं
Join us  
Trending Stories
1
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
4
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
5
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
6
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
7
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
8
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
9
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
10
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
11
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
12
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
13
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
14
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
15
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
16
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
17
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
18
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
19
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
20
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र

कृषी महोत्सवाला यंत्रणेचीच वाळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:38 IST

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या शास्वत उत्पन्नात वाढ व्हावी, या उदात्त भावनेतून शासनाद्वारा पाच दिवसीय कृषी महोत्सवाची प्रत्येक जिल्ह्यात उपलब्धी करण्यात आली.

ठळक मुद्देकशी होईल उद्दिष्टपूर्ती? : शेतकऱ्यांच्या नव्हे अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी उत्सव

आॅनलाईन लोकमतअमरावती : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या शास्वत उत्पन्नात वाढ व्हावी, या उदात्त भावनेतून शासनाद्वारा पाच दिवसीय कृषी महोत्सवाची प्रत्येक जिल्ह्यात उपलब्धी करण्यात आली. अमरावती जिल्ह्याचा कृषी महोत्सव मात्र याला अपवाद ठरणारा आहे. कुठेच प्रचार, प्रसिद्धी नसल्याने या कृषी महोत्सवाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही. विशेष म्हणजे महोत्सवस्थळी आयोजनाच्या बहुतांश मानकांचे उल्लंघन होत असल्याने, याचा कितपत लाभ होईल, याविषयी शेतकरीच साशंक आहेत. केवळ अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी व शासन निधीच्या उधळपट्टीसाठी हा अट्टाहास आहे का, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणांतर्गत (आत्मा) अमरावती जिल्हा कृषी महोत्सव-२०१८ येथील सायंसकोर मैदानावर १७ ते २१ मार्चदरम्यान कृषी महोत्सव सुरू आहे.या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, प्रगतिशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ यांचे बहुमूल्य मार्गदर्शनाचा शेतकºयांना लाभ व्हावा, शेतमालास अधिक भाव मिळावा, यासाठी शेतकरी ते थेट ग्राहक, अशी विक्री शृंखला विकसित व्हावी. या माध्यमातून २०२० पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हा या आयोजनामागील शासनाचा उद्देश आहे. मात्र, ई- निविदा प्रक्रियेपासूनच आयोजन यंत्रणेचा यामधील हस्तक्षेप व महोत्सव आयोजनाच्या बहुतांश मानकांचे समिती सदस्यांच्या उपस्थितीत खुलेआम उल्लंघन होत असल्याने या महोत्सवाचा आत्माच हरविला व याला व्यावसायिक स्वरूप आले असल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली.या कृषी महोत्सवाची माहिती प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी आयोजन समितीद्वारा प्रचार व प्रसिद्धीवर मोठा भर द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांची भरगच्च उपस्थिती होऊन त्यांना अधिकाधिक लाभ मिळेल, या विषयीच्या स्पष्ट शासनसूचना आहेत. मात्र, या महोत्सवासाठी माहिती विभागाच्या पत्रकाशिवाय कसलीच तयारी केलेली नाही. प्रत्येक तालुक्यासह जिल्हा मुख्यालयी बॅनर, पोस्टर, होर्ल्डिंग्ज लावल्याचे तसेच प्रसिद्धी पत्रके, हॅन्डविल गावागावांत मोठ्या प्रमाणावर वाटपासाठी शासनाच्या विशेष सूचना असताना असा कुठलाच प्रकार झाला नसल्याने किंबहुना यासाठी आयोजनाची मुख्य यंत्रणा असणारी ‘आत्मा’ विभागातील अधिकाऱ्यांनी याला अर्थपूर्ण बगल दिल्यानेच हा महोत्सव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही. शासनाची योजना कितीही चांगली असो, अंमलबजावणी करणारी यंत्रणाच जर तुंबड्या भरणारी असेल तर त्या-त्या योजनेचे कसे वाटोळे होते, याचे हे मूर्तिमंत उदाहरण येथील कृषी महोत्सव ठरणार आहे. यासंदर्भात ‘आत्मा’ प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.आयोजनाच्या मानकांचे उल्लंघनमहोत्सवस्थळी महत्त्वाचे असणारे सुपर स्ट्रक्चरच्याऐवजी येथे डोम उभारण्यात आलेले आहेत. निविदेतील अटींचे हे सरळसरळ उल्लंघनच आहे.शहरामध्ये १० बाय २० फूट अकाराचे किमान ३० होर्डिंग्ज लावायला हवेत. मात्र, असे एकही होर्डिंग्ज उद्घाटनापर्यंत तरी लावण्यात आलेले नव्हते.स्थानिक केबलद्वारा किंवा स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स चॅनलद्वारा अद्याप जाहिरात नाही. हॅडविल, पत्रक, घडीपुस्तिकांचे वाटप नाही. प्रचाररथही फिरकलेच नाही.अंमलबजावणी यंत्रणा ‘आत्मा’च्या अधिकाºयांना याची कल्पना असतानाही हा प्रकार होत असल्याने यामध्ये अर्थपूर्ण व्यवहाराचा आरोप केला जात आहे.