शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा दुष्काळ, घोषणांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

विदर्भाच्या कॅलिफोर्नियाची शोकांतिका, १९५७ पासून पूर्णवेळ कार्यान्वित राहण्याचे आव्हान वरूड : तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येथून ...

विदर्भाच्या कॅलिफोर्नियाची शोकांतिका, १९५७ पासून पूर्णवेळ कार्यान्वित राहण्याचे आव्हान

वरूड : तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येथून देशासह विदेशातसुद्धा संत्राफळांची विक्री केली जाते. एवढेच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यासह बांगलादेशी व्यापारीसुद्धा या परिसरात येतात. संत्री, मोसंबीकरिता प्रसिद्ध असलेल्या ‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’त ७५ वर्षांमध्ये एकही संत्रा प्रक्रिया केंद्र नसणे ही संत्रा उत्पादकांची शोकांतिका आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेली घोषणा तरी पूर्ण होते काय, याकडे संत्रा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

शेंदूरजनाघाट येथे अमरावती फ्रूट ग्रोअर इंडस्ट्रीयल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या नावाने संत्रा ज्यूस काढणारी फॅक्टरी १९५७ मध्ये स्थापन झाली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी २७ नोव्हेंबर १९६० रोजी त्याचे उद्घाटन केले होते. त्यांनीच ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ असे संबोधन केले होते. सहकारी तत्त्वावर सुरु असलेला संत्रा प्रकल्पातून देशाच्या कानाकोपऱ्यात बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, मुंबई, कानपूर, अमृतसर आदी शहरांमध्ये संत्रा ज्यूस पोहचविला.

प्रकल्पाला घरघर

१९५८ ते १९६३ दरम्यान सुरळीत चालविल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जावर सुरू केलेल्या प्रकल्पाला राजाश्रय मिळाला नसल्याने आर्थिक घरघर लागली आणि प्रकल्प बंद पडला. यानंतर मागणी होत राहिली, पण प्रकल्प मिळाला नाही.

--------------

सहकारी प्रकल्पही रसातळाला

१९९२ साली सोपेक नावाने सहकारी तत्त्वावर संत्रा प्रक्रिया प्रकल्प वरूडलगत रोशनखेडा येथे सुरू झाला. परंतु, कालौघात बंद पडला. यानंतर तत्कालीन कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी नोगा हा शासकीय संत्रा प्रकल्प मंजूर करून मायवाडी एमआयडीसीमध्ये उभा केला. मोठ्या थाटात उद्घाटन पार पडले आणि प्रकल्पही तेवढ्याच दणक्यात बंद झाला.

-----------------

आश्वासन हवेत विरले

२०१४ मध्ये तत्कालीन आमदार अनिल बोेंडे यांनी राष्ट्रीय कृषी व संत्रा परिषद १ते ४ ऑक्टोबर २०१५ ला वरूड येथील बाजार समितीच्या प्रांगणात घेतली होती. याप्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरुड येथे संत्रा डिहायड्रेशन प्रकल्प, तर मोर्शीला संत्रा प्रक्रिया केंद्राची घोषणा डझनभर मंत्र्यांसमोर झाली होती. परंतु, हे आश्वासन हवेत विरले. ॉ

दरम्यान, घोषणा आणि आश्वासनांची खैरात वाटून संत्रा उत्पादकांना आशेवर ताटकळत ठेवण्याचा प्रयत्न राजकारणी करीत आहे. सर्व घोषणा गेल्या ७५ वर्षांपासून हवेतच विरत असल्याची चर्चा असून शेतकऱ्यांचा सरकार वर विश्वासच राहिलेला नाही.

--------------

कुठे आहेत सुगीचे दिवस

२४ डिसेंबर २०१७ मधे गव्हाणकुंड येथील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात ना. नितीन गडकरी यांनी नागपूर येथील मिहानमध्ये पाच हजार कोटींचा संत्रा प्रकल्प स्वामी रामदेव बाबा यांच्यावतीने उभारणार असल्याचे सांगितले गेले होते.

------------------

नांदेड व्हाया मोर्शी

२०१४ मध्ये कोका कोलाचा प्रकल्प वरूडला होण्याच्या घोषणा झाल्या. वरूडचा प्रकल्प मोर्शीत हिवरखेड (ठानाठुनी) येथे गेला. हा प्रकल्प मोर्शीतून नांदेडला पळविला गेला.

---------------

पुन्हा घोषणा

१० मार्च २०२१ च्या अर्थसंकल्पात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प साकारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. परंतु, नेमका कुठे आणि किती आर्थिक तरतूद राहणार, हे कोडेच आहे.