शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

अधिग्रहणातील विहिरींना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:35 IST

चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाही कागदोपत्री पाणीपुरवठा दाखविला जात असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची दाहकता वाढली : खासगी ३७३ विहिरी अन् ६५ टँकरवर भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाही कागदोपत्री पाणीपुरवठा दाखविला जात असल्याचे वास्तव आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात ३७३ खासगी विहिरी व विंधन विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना केली जात आहे. तात्पुरता उपाय म्हणून अमरावती तालुक्यात बोडणा, परसोडा डिगरगव्हाण, तिवसा तालुक्यात कुºहा, ठाणाठुणी, वरखेड, तारखेड, मोझरी, भारवाडी, सार्सी, गुरुदेवनगर, घोटा, माळेगाव, मोर्शी तालुक्यात वाघोली, लेहगाव आखतवाडा, पोरगव्हाण, पिंपळखुटा, दहसूर, आसोना, गोराळा, सावरखेड, शिरखेड, वरूड तालुक्यात शहापूर, चांदूर रेल्वे तालुक्यात सालोरा खुर्द, आमला, जळका, निमला, सावंगी, अमदोरी, धामणगाव तालुक्यात उसळगव्हाण, अंजनवती, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, शिंदी, घाटलाडकी, चिखलदरा तालुक्यात सोमवारखेडा, भिलखेडा, मनभंग, आडनदी, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, भांदरी, खडीमल, कुलंगना, गौरखेडा, मोथा, लवादा, पस्तलाई, आलाडोह, खोंगडा, आकी, नागापूर, एकझिरा व चौराकुंड येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.उपाययोजनांची सद्यस्थितीआराखड्यानुसार १९३९ उपायोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यापैकी ८३३ गावांच्या ९५५ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीत ४६८ गावांच्या ५४० उपाययोजनांची कामे सुरू आहेत, तर ३२१ गावांच्या ४०६ उपायोजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. यासाठी ८ कोटी ३ लाख ६७ हजारांचा निधी अपेक्षित आहे.१.१८ लाख नागरिकांचीमदार टँकरवरपाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यात १० तालुक्यांतील ६४ गावे व १,१८,२०२ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. अमरावती तालुक्यातील तीन गावांत २४८९, तिवसा तालुक्यातील १० गावांत २७४९८,मोर्शी तालुक्यातील ११ गावांत १८१८९, वरूड तालुक्यातील एका गावात ३१९६, चांदूर रेल्वे तालुक्यातील सात गावांत १२४४५, धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन गावांत २९६०, अचलपूर तालुक्यातील दोन गावांत २१५४७, चांदूर बाजार तालुक्यातील एका गावात ७५१२, चिखलदरा तालुक्यातील २६ गावांत १४८९९, धारणी तालुक्यातील एका गावांत १०५० लोकसंख्येची मदार टँकरवर आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई