शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहणातील विहिरींना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:35 IST

चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाही कागदोपत्री पाणीपुरवठा दाखविला जात असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची दाहकता वाढली : खासगी ३७३ विहिरी अन् ६५ टँकरवर भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाही कागदोपत्री पाणीपुरवठा दाखविला जात असल्याचे वास्तव आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात ३७३ खासगी विहिरी व विंधन विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना केली जात आहे. तात्पुरता उपाय म्हणून अमरावती तालुक्यात बोडणा, परसोडा डिगरगव्हाण, तिवसा तालुक्यात कुºहा, ठाणाठुणी, वरखेड, तारखेड, मोझरी, भारवाडी, सार्सी, गुरुदेवनगर, घोटा, माळेगाव, मोर्शी तालुक्यात वाघोली, लेहगाव आखतवाडा, पोरगव्हाण, पिंपळखुटा, दहसूर, आसोना, गोराळा, सावरखेड, शिरखेड, वरूड तालुक्यात शहापूर, चांदूर रेल्वे तालुक्यात सालोरा खुर्द, आमला, जळका, निमला, सावंगी, अमदोरी, धामणगाव तालुक्यात उसळगव्हाण, अंजनवती, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, शिंदी, घाटलाडकी, चिखलदरा तालुक्यात सोमवारखेडा, भिलखेडा, मनभंग, आडनदी, कोयलारी, पाचडोंगरी, सोनापूर, धरमडोह, बहाद्दरपूर, पिपादरी, खिरपाणी, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, भांदरी, खडीमल, कुलंगना, गौरखेडा, मोथा, लवादा, पस्तलाई, आलाडोह, खोंगडा, आकी, नागापूर, एकझिरा व चौराकुंड येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.उपाययोजनांची सद्यस्थितीआराखड्यानुसार १९३९ उपायोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यापैकी ८३३ गावांच्या ९५५ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीत ४६८ गावांच्या ५४० उपाययोजनांची कामे सुरू आहेत, तर ३२१ गावांच्या ४०६ उपायोजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. यासाठी ८ कोटी ३ लाख ६७ हजारांचा निधी अपेक्षित आहे.१.१८ लाख नागरिकांचीमदार टँकरवरपाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यात १० तालुक्यांतील ६४ गावे व १,१८,२०२ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. अमरावती तालुक्यातील तीन गावांत २४८९, तिवसा तालुक्यातील १० गावांत २७४९८,मोर्शी तालुक्यातील ११ गावांत १८१८९, वरूड तालुक्यातील एका गावात ३१९६, चांदूर रेल्वे तालुक्यातील सात गावांत १२४४५, धामणगाव रेल्वे तालुक्यातील दोन गावांत २९६०, अचलपूर तालुक्यातील दोन गावांत २१५४७, चांदूर बाजार तालुक्यातील एका गावात ७५१२, चिखलदरा तालुक्यातील २६ गावांत १४८९९, धारणी तालुक्यातील एका गावांत १०५० लोकसंख्येची मदार टँकरवर आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई