शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंचा अंत पाहू नका, अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल : मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:58 IST

Amravati : मनोज जरांगे पाटलांचा घणाघात; अन्नत्याग आंदोलनाला सक्रिय पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : मी येथे नुसते भाषण ठोकून पाठिंबा जाहीर करायला आलो नाही. महाराष्ट्रातील समस्त शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बच्चू कडूंची संमती घ्यावी. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये एक चाकही फिरणार नाही. शासनाला असा इशारा देऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सक्रिय पाठिंबा दर्शविला.

अन्नत्याग उपोषणाच्या चौथ्या दिवशी बुधवारी मनोज जरांगे पाटील हे उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला 'लबाडांचे सरकार' संबोधून कडाडून टीका केली. सरकारने बच्चू कडू यांच्या संयमाचा अंत पाहू नये. कारण शांत बसलेला वाघ हा चवताळलेल्या वाघापेक्षा खतरनाक असतो. त्यामुळे बच्चू कडू यांचा संयम सुटला, तर कधी नव्हे असे या महाराष्ट्राचे रौद्ररूप या देशाला पाहावे लागेल. हे जनआंदोलन असून, येथे कुणीही जातपात आडवी आणू नये. कारण बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढतोय, कुण्या जातीसाठी नाही. तेव्हा आंदोलनात सहभागी असणाऱ्यांची शेतकरी ही एकच जात असली पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील दहेगाव पाटोदा या ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव घेऊन बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला, तसेच मेंढपाळ संघटना, मच्छीमार संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक संघटना, भारतीय किसान युनियनसह अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

आसेगावात टॉवरवर चढले आंदोलकअन्नत्याग उपोषणाला समर्थन देण्यासाठी आसेगाव पूर्णा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता बीएसएनएल टॉवरवर चढून 'शोले स्टाइल' आंदोलन केले. चांदूर बाजार बंद पुकारण्यात आला होता. यात चांदूर बाजार शहरातील संपूर्ण प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंदच ठेवण्यात आली.

"देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या तेव्हा जातीयवादी गिधाडांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडली; परंतु आता शेतकरी या जातीयवाद्यांचे मनसुबे सफल होऊ देणार नाहीत."- रविकांत तुपकर

"अन्नत्याग उपोषणाने आतड्यांना कसे वेढे पडतात, याची मला पूर्ण कल्पना आहे. चार दिवस अन्नावाचून राहणे सोपे नाही. त्यासाठी खूप धाडस लागते व असे धाडसी निर्णय बच्चू कडूंसारखा योद्धाच घेऊ शकतो."- मनोज जरांगे पाटील

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAmravatiअमरावती