शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

बच्चू कडूंचा अंत पाहू नका, अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल : मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:58 IST

Amravati : मनोज जरांगे पाटलांचा घणाघात; अन्नत्याग आंदोलनाला सक्रिय पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : मी येथे नुसते भाषण ठोकून पाठिंबा जाहीर करायला आलो नाही. महाराष्ट्रातील समस्त शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बच्चू कडूंची संमती घ्यावी. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये एक चाकही फिरणार नाही. शासनाला असा इशारा देऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सक्रिय पाठिंबा दर्शविला.

अन्नत्याग उपोषणाच्या चौथ्या दिवशी बुधवारी मनोज जरांगे पाटील हे उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला 'लबाडांचे सरकार' संबोधून कडाडून टीका केली. सरकारने बच्चू कडू यांच्या संयमाचा अंत पाहू नये. कारण शांत बसलेला वाघ हा चवताळलेल्या वाघापेक्षा खतरनाक असतो. त्यामुळे बच्चू कडू यांचा संयम सुटला, तर कधी नव्हे असे या महाराष्ट्राचे रौद्ररूप या देशाला पाहावे लागेल. हे जनआंदोलन असून, येथे कुणीही जातपात आडवी आणू नये. कारण बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढतोय, कुण्या जातीसाठी नाही. तेव्हा आंदोलनात सहभागी असणाऱ्यांची शेतकरी ही एकच जात असली पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील दहेगाव पाटोदा या ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव घेऊन बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला, तसेच मेंढपाळ संघटना, मच्छीमार संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक संघटना, भारतीय किसान युनियनसह अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

आसेगावात टॉवरवर चढले आंदोलकअन्नत्याग उपोषणाला समर्थन देण्यासाठी आसेगाव पूर्णा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता बीएसएनएल टॉवरवर चढून 'शोले स्टाइल' आंदोलन केले. चांदूर बाजार बंद पुकारण्यात आला होता. यात चांदूर बाजार शहरातील संपूर्ण प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंदच ठेवण्यात आली.

"देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या तेव्हा जातीयवादी गिधाडांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडली; परंतु आता शेतकरी या जातीयवाद्यांचे मनसुबे सफल होऊ देणार नाहीत."- रविकांत तुपकर

"अन्नत्याग उपोषणाने आतड्यांना कसे वेढे पडतात, याची मला पूर्ण कल्पना आहे. चार दिवस अन्नावाचून राहणे सोपे नाही. त्यासाठी खूप धाडस लागते व असे धाडसी निर्णय बच्चू कडूंसारखा योद्धाच घेऊ शकतो."- मनोज जरांगे पाटील

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAmravatiअमरावती