शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

कुणी कापूस घेता का कापूस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:01 IST

वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कापसाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. ३० एप्रिल या मुदतीपर्यंत ३ हजार ८२९ शेतकºयांनी नोंदणी केली. या हंगामातील त्या शेतकऱ्यांसह जुने ६४६ असे एकूण ४४७५ शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. पैकी ५ मेपर्यंत २८९ गाड्यांची मोजणी झाली. राहिलेला कापूस कधी मोजणार, हा प्रश्न तूर्त अनुत्तरित आहे.

ठळक मुद्देआर्त हाक। खरिपाकडे वाटचाल, शेतकऱ्यांच्या जिवावर उठला कोरोना

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : वरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. पण, खेडा खरेदीमध्ये कापसाला कमी भाव असल्याने शेतकऱ्यांचा कल पणन संघाला कापूस विकण्याकडे होता. मात्र, त्या खरेदीला लॉकडाऊनचा अडसर आल्याने अजूनही शेतकऱ्यांकडे ७० टक्के कापूस घरातच पडून आहे. ‘कुणी कापूस घेता का कापूस ? असे म्हणण्याची वेळ लॉकडाऊनमध्ये अडवणूक झालेल्या शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कापसाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. ३० एप्रिल या मुदतीपर्यंत ३ हजार ८२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. या हंगामातील त्या शेतकऱ्यांसह जुने ६४६ असे एकूण ४४७५ शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. पैकी ५ मेपर्यंत २८९ गाड्यांची मोजणी झाली. राहिलेला कापूस कधी मोजणार, हा प्रश्न तूर्त अनुत्तरित आहे.खरीप हंगाम आता दीड-दोन महिन्यांवर आला आहे. त्यामुळे खरिपातील पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे व खताच्या खरेदीसाठी शेतकºयांकडून पैसे जुळवण्यासाठी आटापिटा होत आहे. असे असताना शेतकºयांचा माल घरात पडून आहे. नवीन हंगामाची तयारी रासायनिक खते, बी-बियाणांची जुळवाजुळव करायची असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.कापसामुळे सुटली खाजउन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना कापसामुळे खाजेसारखे त्वचाविकार उद्भवू लागले आहेत. यामुळे शासनाने तातडीने कापूस खरेदीचा वेग वाढवून शेतकºयांना चिंतामुक्त करावे व कापूसकोंडी फोडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.क्विंटलमागे एक हजारांचे नुकसानखुल्या बाजाराचे भाव ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल, तर शासकीय दर ५४५० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. त्यामुळे खुल्या बाजारात कापूस विकल्यास प्रतिक्विंटल १ हजार रुपयांचे नुकसान होत आहे.आर्थिक व्यवहार खुंटलाशेतकºयांकडे सध्याच्या घडीला काही ना काही शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध आहे. तथापि, संचारबंदीच्या बडग्याने बाजारात नेण्याची सोय नाही आणि खासगीत विकण्याने नुकसानाची हमी, अशा दुहेरी पेचात शेतकरी अडकले आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे खर्चही कमी झालेले नाहीत. शिल्लक शेतमाल हा शेतकऱ्यांकरिता जमापुंजी नव्हे, तर डोकेदुखी ठरू लागला आहे.आम्ही पणन महासंघाशी नुकताच पत्रव्यवहार केला. बाजार समिती शेतकरीहिताचेच निर्णय घेईल.- अजय नागमोतेसभापती, बाजार समिती, वरुडवरूडमध्ये येत्या दोन दिवसांत एक नवीन खरेदी केंद्र सुरू करू. त्यामुळे खरेदीचा वेग वाढेल. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.- देवेंद्र भुयारआमदार, मोर्शीखुल्या बाजारात कापसाचे भाव वाढतील, या आशेने हजारो क्विंटल कापूस घरातच आहे. खते, बियाणे खरेदी करावयाची आहे. शासनाने खरेदीचा वेग वाढवावा.- सुरेंद्र ठाकरे, शेतकरी, हातुर्णा

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड