शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

कुणी कापूस घेता का कापूस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:01 IST

वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कापसाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. ३० एप्रिल या मुदतीपर्यंत ३ हजार ८२९ शेतकºयांनी नोंदणी केली. या हंगामातील त्या शेतकऱ्यांसह जुने ६४६ असे एकूण ४४७५ शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. पैकी ५ मेपर्यंत २८९ गाड्यांची मोजणी झाली. राहिलेला कापूस कधी मोजणार, हा प्रश्न तूर्त अनुत्तरित आहे.

ठळक मुद्देआर्त हाक। खरिपाकडे वाटचाल, शेतकऱ्यांच्या जिवावर उठला कोरोना

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : वरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. पण, खेडा खरेदीमध्ये कापसाला कमी भाव असल्याने शेतकऱ्यांचा कल पणन संघाला कापूस विकण्याकडे होता. मात्र, त्या खरेदीला लॉकडाऊनचा अडसर आल्याने अजूनही शेतकऱ्यांकडे ७० टक्के कापूस घरातच पडून आहे. ‘कुणी कापूस घेता का कापूस ? असे म्हणण्याची वेळ लॉकडाऊनमध्ये अडवणूक झालेल्या शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कापसाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. ३० एप्रिल या मुदतीपर्यंत ३ हजार ८२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. या हंगामातील त्या शेतकऱ्यांसह जुने ६४६ असे एकूण ४४७५ शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. पैकी ५ मेपर्यंत २८९ गाड्यांची मोजणी झाली. राहिलेला कापूस कधी मोजणार, हा प्रश्न तूर्त अनुत्तरित आहे.खरीप हंगाम आता दीड-दोन महिन्यांवर आला आहे. त्यामुळे खरिपातील पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे व खताच्या खरेदीसाठी शेतकºयांकडून पैसे जुळवण्यासाठी आटापिटा होत आहे. असे असताना शेतकºयांचा माल घरात पडून आहे. नवीन हंगामाची तयारी रासायनिक खते, बी-बियाणांची जुळवाजुळव करायची असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.कापसामुळे सुटली खाजउन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना कापसामुळे खाजेसारखे त्वचाविकार उद्भवू लागले आहेत. यामुळे शासनाने तातडीने कापूस खरेदीचा वेग वाढवून शेतकºयांना चिंतामुक्त करावे व कापूसकोंडी फोडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.क्विंटलमागे एक हजारांचे नुकसानखुल्या बाजाराचे भाव ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल, तर शासकीय दर ५४५० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. त्यामुळे खुल्या बाजारात कापूस विकल्यास प्रतिक्विंटल १ हजार रुपयांचे नुकसान होत आहे.आर्थिक व्यवहार खुंटलाशेतकºयांकडे सध्याच्या घडीला काही ना काही शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध आहे. तथापि, संचारबंदीच्या बडग्याने बाजारात नेण्याची सोय नाही आणि खासगीत विकण्याने नुकसानाची हमी, अशा दुहेरी पेचात शेतकरी अडकले आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे खर्चही कमी झालेले नाहीत. शिल्लक शेतमाल हा शेतकऱ्यांकरिता जमापुंजी नव्हे, तर डोकेदुखी ठरू लागला आहे.आम्ही पणन महासंघाशी नुकताच पत्रव्यवहार केला. बाजार समिती शेतकरीहिताचेच निर्णय घेईल.- अजय नागमोतेसभापती, बाजार समिती, वरुडवरूडमध्ये येत्या दोन दिवसांत एक नवीन खरेदी केंद्र सुरू करू. त्यामुळे खरेदीचा वेग वाढेल. शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.- देवेंद्र भुयारआमदार, मोर्शीखुल्या बाजारात कापसाचे भाव वाढतील, या आशेने हजारो क्विंटल कापूस घरातच आहे. खते, बियाणे खरेदी करावयाची आहे. शासनाने खरेदीचा वेग वाढवावा.- सुरेंद्र ठाकरे, शेतकरी, हातुर्णा

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड