शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

दिवाळी गेली अंधारात; विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर शेतकऱ्याने उगारली खुर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 11:35 IST

पोलिसांसोबत झाला वाद, तातडीने पीकविमा देण्याची केली मागणी

अमरावती : यंदा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून याला कृषी विभाग आणि पीकविमा कंपनी जबाबदार असल्याचा अरोप करत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी आंदोलन केले. यावेळी एका संतप्त शेतकऱ्याने पोलिसांसमोरच पीकविमा कंपनीच्या प्रतीनिधीवर खुर्ची उगारल्याने पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेत, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकविकास संघटनेने दिला आहे.

जिल्ह्यातील सुमारे ३ हजार १५६ फळबाग शेतकरी संकटात सापडला असून त्यांची दिवाळी ही कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीमुळे अंधारात गेल्याचे लोकविकास संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी कृषी अधिकारी यांच्या दालनात शेतकऱ्यांनी स्वतःला अधिकारी व पीक विमा कंपनी प्रतिनिधींना तब्बल दीड तास कोंडून घेतले. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, अशी भूमिकाच आंदोलनकर्त्यांनी यावेळी घेतली होती. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता बघता याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

या दरम्यान पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा सुरू असतानाच एका संतप्त शेतकऱ्याने प्रतिनिधी खोटा बोलत असल्याचे सांगत त्यावर खुर्ची उगारली. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडल्याने पोलिसांनी तातडीने प्रतिनिधीचा बचाव केला. त्यामुळे यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला होता. आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकविकास संघटनेच्या वतीने कृषी विभागासह पीकविमा कंपनीला देण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात रमण लंगोटे, नियाज अली, प्रवीण लंगोटे, विजय भुले आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनAmravatiअमरावती