शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

दिवाळी गेली अंधारात; विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर शेतकऱ्याने उगारली खुर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 11:35 IST

पोलिसांसोबत झाला वाद, तातडीने पीकविमा देण्याची केली मागणी

अमरावती : यंदा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असून याला कृषी विभाग आणि पीकविमा कंपनी जबाबदार असल्याचा अरोप करत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात सोमवारी आंदोलन केले. यावेळी एका संतप्त शेतकऱ्याने पोलिसांसमोरच पीकविमा कंपनीच्या प्रतीनिधीवर खुर्ची उगारल्याने पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेत, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकविकास संघटनेने दिला आहे.

जिल्ह्यातील सुमारे ३ हजार १५६ फळबाग शेतकरी संकटात सापडला असून त्यांची दिवाळी ही कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीमुळे अंधारात गेल्याचे लोकविकास संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी कृषी अधिकारी यांच्या दालनात शेतकऱ्यांनी स्वतःला अधिकारी व पीक विमा कंपनी प्रतिनिधींना तब्बल दीड तास कोंडून घेतले. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, अशी भूमिकाच आंदोलनकर्त्यांनी यावेळी घेतली होती. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता बघता याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

या दरम्यान पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत चर्चा सुरू असतानाच एका संतप्त शेतकऱ्याने प्रतिनिधी खोटा बोलत असल्याचे सांगत त्यावर खुर्ची उगारली. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडल्याने पोलिसांनी तातडीने प्रतिनिधीचा बचाव केला. त्यामुळे यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला होता. आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकविकास संघटनेच्या वतीने कृषी विभागासह पीकविमा कंपनीला देण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात रमण लंगोटे, नियाज अली, प्रवीण लंगोटे, विजय भुले आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनAmravatiअमरावती