शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

जिल्हा खाजेने बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:33 IST

जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल्याचे चित्र आहे. दूषित पाण्यापासून साथीच्या आजारांसह त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग इतरांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये चौपट वाढ : शंभरामागे २० रुग्ण

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल्याचे चित्र आहे. दूषित पाण्यापासून साथीच्या आजारांसह त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग इतरांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्याच्या दिवसांत कपडे पूर्णपणे वाळत नसल्याने तेच परिधान केल्यास त्वचेवर लाल चट्टे पडतात. त्याला ‘रॅशेस’ असेही म्हणतात. वातावरणात बदल होत असल्याने पाणी व घामामुळे त्वचारोगात वाढ होत आहे. पूर्वी हा आजार कुटुंबातील एखाद्यालाच व्हायचा आणि त्यावर योग्य उपचार घेतल्यानंतर लगेच बराही व्हायचा. पण, आता एकानंतर दुसऱ्याला, दुसऱ्यानंतर तिसऱ्याला अशाप्रकारे एकाच कुटुंबातील सर्वांना याची पाठोपाठ लागण होत आहे. म्हणून हे इंन्फेक्शन पूर्णपणे बरे होईपर्यंत त्याच्यावर उपचार घेण्याचा तसेच उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञांनी दिला आहे.अशी करा उपाययोजनागजकर्ण झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवा. एकच फणी आणि एकमेकांचे कपडे वापरू नका. रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. बाह्य उपचारांबरोबरच पोटसुद्धा साफ असणे आवश्यक. त्वचा नेहमी कोरडी राहील, याची काळजी घ्या. वजन जास्त असल्यास मांडीला मांडी घासते व घामाने आजार वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ शरीरावर पावडर लावा. ओले कपडे परिधान करणे टाळा.विषाणू जाईपर्यंत आजार कायमपूर्वी हा आजार बरा व्हायला जवळपास दोन आठवडे लागायचे. पण, आता औषध, मलम लावूनही लगेच बरा होत नाही. त्याचे डाग जायलाही जवळपास तितकेच महिने जातात. गजकर्ण बरा झाला, की पुन्हा येत नव्हता. पण, आता या आजाराचा विषाणू जोपर्यंत त्वचेतून पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत अधूनमधून हा आजार उद्भवत राहतो.शरीराच्या या भागावर होतो आजारहात, मान, चेहरा, कोपर, पोटावरील त्वचेवर, बोटांच्या बेचक्यात, पोटावर, काखेत तसेच जननेंद्रियांच्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्वचेची आग होणे, खाज येणे, कपडे घट्ट घातलेल्या ठिकाणी खाज व चट्टे निर्माण होतात.काही वर्षांपूर्वी १०० रुग्णांपैकी पाच ते सहा रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'चे असायचे. पण, आता दररोज २० ते २५ रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'वर उपचार घेण्यासाठी येत आहेत.- डॉ. गणेश मुधडा,त्वचारोगतज्ज्ञ अमरावती