शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

जिल्हा खाजेने बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:33 IST

जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल्याचे चित्र आहे. दूषित पाण्यापासून साथीच्या आजारांसह त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग इतरांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये चौपट वाढ : शंभरामागे २० रुग्ण

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल्याचे चित्र आहे. दूषित पाण्यापासून साथीच्या आजारांसह त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग इतरांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्याच्या दिवसांत कपडे पूर्णपणे वाळत नसल्याने तेच परिधान केल्यास त्वचेवर लाल चट्टे पडतात. त्याला ‘रॅशेस’ असेही म्हणतात. वातावरणात बदल होत असल्याने पाणी व घामामुळे त्वचारोगात वाढ होत आहे. पूर्वी हा आजार कुटुंबातील एखाद्यालाच व्हायचा आणि त्यावर योग्य उपचार घेतल्यानंतर लगेच बराही व्हायचा. पण, आता एकानंतर दुसऱ्याला, दुसऱ्यानंतर तिसऱ्याला अशाप्रकारे एकाच कुटुंबातील सर्वांना याची पाठोपाठ लागण होत आहे. म्हणून हे इंन्फेक्शन पूर्णपणे बरे होईपर्यंत त्याच्यावर उपचार घेण्याचा तसेच उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञांनी दिला आहे.अशी करा उपाययोजनागजकर्ण झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवा. एकच फणी आणि एकमेकांचे कपडे वापरू नका. रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. बाह्य उपचारांबरोबरच पोटसुद्धा साफ असणे आवश्यक. त्वचा नेहमी कोरडी राहील, याची काळजी घ्या. वजन जास्त असल्यास मांडीला मांडी घासते व घामाने आजार वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ शरीरावर पावडर लावा. ओले कपडे परिधान करणे टाळा.विषाणू जाईपर्यंत आजार कायमपूर्वी हा आजार बरा व्हायला जवळपास दोन आठवडे लागायचे. पण, आता औषध, मलम लावूनही लगेच बरा होत नाही. त्याचे डाग जायलाही जवळपास तितकेच महिने जातात. गजकर्ण बरा झाला, की पुन्हा येत नव्हता. पण, आता या आजाराचा विषाणू जोपर्यंत त्वचेतून पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत अधूनमधून हा आजार उद्भवत राहतो.शरीराच्या या भागावर होतो आजारहात, मान, चेहरा, कोपर, पोटावरील त्वचेवर, बोटांच्या बेचक्यात, पोटावर, काखेत तसेच जननेंद्रियांच्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्वचेची आग होणे, खाज येणे, कपडे घट्ट घातलेल्या ठिकाणी खाज व चट्टे निर्माण होतात.काही वर्षांपूर्वी १०० रुग्णांपैकी पाच ते सहा रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'चे असायचे. पण, आता दररोज २० ते २५ रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'वर उपचार घेण्यासाठी येत आहेत.- डॉ. गणेश मुधडा,त्वचारोगतज्ज्ञ अमरावती