शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्हा खाजेने बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:33 IST

जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल्याचे चित्र आहे. दूषित पाण्यापासून साथीच्या आजारांसह त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग इतरांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये चौपट वाढ : शंभरामागे २० रुग्ण

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल्याचे चित्र आहे. दूषित पाण्यापासून साथीच्या आजारांसह त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा संसर्ग इतरांना जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पावसाळ्याच्या दिवसांत कपडे पूर्णपणे वाळत नसल्याने तेच परिधान केल्यास त्वचेवर लाल चट्टे पडतात. त्याला ‘रॅशेस’ असेही म्हणतात. वातावरणात बदल होत असल्याने पाणी व घामामुळे त्वचारोगात वाढ होत आहे. पूर्वी हा आजार कुटुंबातील एखाद्यालाच व्हायचा आणि त्यावर योग्य उपचार घेतल्यानंतर लगेच बराही व्हायचा. पण, आता एकानंतर दुसऱ्याला, दुसऱ्यानंतर तिसऱ्याला अशाप्रकारे एकाच कुटुंबातील सर्वांना याची पाठोपाठ लागण होत आहे. म्हणून हे इंन्फेक्शन पूर्णपणे बरे होईपर्यंत त्याच्यावर उपचार घेण्याचा तसेच उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञांनी दिला आहे.अशी करा उपाययोजनागजकर्ण झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवा. एकच फणी आणि एकमेकांचे कपडे वापरू नका. रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. बाह्य उपचारांबरोबरच पोटसुद्धा साफ असणे आवश्यक. त्वचा नेहमी कोरडी राहील, याची काळजी घ्या. वजन जास्त असल्यास मांडीला मांडी घासते व घामाने आजार वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ शरीरावर पावडर लावा. ओले कपडे परिधान करणे टाळा.विषाणू जाईपर्यंत आजार कायमपूर्वी हा आजार बरा व्हायला जवळपास दोन आठवडे लागायचे. पण, आता औषध, मलम लावूनही लगेच बरा होत नाही. त्याचे डाग जायलाही जवळपास तितकेच महिने जातात. गजकर्ण बरा झाला, की पुन्हा येत नव्हता. पण, आता या आजाराचा विषाणू जोपर्यंत त्वचेतून पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत अधूनमधून हा आजार उद्भवत राहतो.शरीराच्या या भागावर होतो आजारहात, मान, चेहरा, कोपर, पोटावरील त्वचेवर, बोटांच्या बेचक्यात, पोटावर, काखेत तसेच जननेंद्रियांच्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्वचेची आग होणे, खाज येणे, कपडे घट्ट घातलेल्या ठिकाणी खाज व चट्टे निर्माण होतात.काही वर्षांपूर्वी १०० रुग्णांपैकी पाच ते सहा रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'चे असायचे. पण, आता दररोज २० ते २५ रुग्ण 'फंगस इन्फेक्शन'वर उपचार घेण्यासाठी येत आहेत.- डॉ. गणेश मुधडा,त्वचारोगतज्ज्ञ अमरावती