शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंचांना हवे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

गाव विकास योजनेची हवी माहिती ५५२ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपेक्षित, प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक करतात दिशाभूल मोहन राऊत धामणगाव रेल्वे : ...

गाव विकास योजनेची हवी माहिती

५५२ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपेक्षित, प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक करतात दिशाभूल

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : आगामी पाच वर्षांत गावात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रशासनाच्या मदतीसोबतच जिल्ह्यातील ५५२ सरपंच, उपसरपंच यांना प्रशिक्षणाची गरज व्यक्त होत आहे. प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक दिशाभूल करू शकतात, अशी भीती आहे.

पंचायत राजमधील सर्वात महत्त्वाच्या टप्पा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ च्या कलम ५ अन्वये गावाचा कारभार चालतो. ग्रामपंचायतीचा वार्षिक आराखडा तयार करण्याचे अधिकार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना आहेत.

गतवर्षी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच, उपसरपंच निवडून आले आहेत. नवखे असल्याने लोककल्याणकारी योजना राबविताना त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्या योजना कशा आहेत, किती खाते असतात, मासिक सभेमध्ये कोणते विषय घ्यावे, याचा अभ्यास नाही. सरपंच, उपसरपंच गोंधळात पडले आहेत. पंचायत राज व्यवस्थेनुसार या सरपंच, उपसरपंचांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने विस्तार अधिकारी तथा मास्टर ट्रेनर यांनी किमान मोठ्या ग्रामपंचायतींच्या गावांत जाऊन सरपंचांना प्रशिक्षण दिले द्यावे, अशी मागणी होत आहे.

२९ बाबींचे हवे प्रशिक्षण

गावात रस्ते बांधणे, रस्त्यांची दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय, जन्म, मृत्यू व विवाह नोंदी, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शिक्षण, आरोग्यविषयक सोयी, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, गावाचा बाजार, जत्रा, उत्सव, यांची व्यवस्था ठेवणे या २९ बाबी गावात ग्रामसेवक राबवित असतात. त्यांच्या कामाकडे लक्ष ठेवणे व प्रसंगी मदत सरपंच, उपसरपंचांनी करणे गरजेचे आहे.

--------------------

आम्ही पदावर येऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला. कोरोनामुळे आम्हाला प्रशिक्षण मिळाले नाही. प्रशिक्षण दिल्यास गावच्या विकासात आमचा हातभार लागू शकतो.

- संदीप इंगळे, उपसरपंच, कावली

सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव यांच्या समन्वयाने ग्रामपंचायतचा कारभार चालतो. आम्हा नवीन लोकांना प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. आता तरी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत प्रशिक्षण द्यावे.

- ममता मुकेश राठी, सरपंच, गव्हा फरकाडे