शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंचांना हवे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

गाव विकास योजनेची हवी माहिती ५५२ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपेक्षित, प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक करतात दिशाभूल मोहन राऊत धामणगाव रेल्वे : ...

गाव विकास योजनेची हवी माहिती

५५२ ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपेक्षित, प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक करतात दिशाभूल

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : आगामी पाच वर्षांत गावात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रशासनाच्या मदतीसोबतच जिल्ह्यातील ५५२ सरपंच, उपसरपंच यांना प्रशिक्षणाची गरज व्यक्त होत आहे. प्रशिक्षण नसल्याने ग्रामसेवक दिशाभूल करू शकतात, अशी भीती आहे.

पंचायत राजमधील सर्वात महत्त्वाच्या टप्पा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ च्या कलम ५ अन्वये गावाचा कारभार चालतो. ग्रामपंचायतीचा वार्षिक आराखडा तयार करण्याचे अधिकार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना आहेत.

गतवर्षी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच, उपसरपंच निवडून आले आहेत. नवखे असल्याने लोककल्याणकारी योजना राबविताना त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्या योजना कशा आहेत, किती खाते असतात, मासिक सभेमध्ये कोणते विषय घ्यावे, याचा अभ्यास नाही. सरपंच, उपसरपंच गोंधळात पडले आहेत. पंचायत राज व्यवस्थेनुसार या सरपंच, उपसरपंचांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने विस्तार अधिकारी तथा मास्टर ट्रेनर यांनी किमान मोठ्या ग्रामपंचायतींच्या गावांत जाऊन सरपंचांना प्रशिक्षण दिले द्यावे, अशी मागणी होत आहे.

२९ बाबींचे हवे प्रशिक्षण

गावात रस्ते बांधणे, रस्त्यांची दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय, जन्म, मृत्यू व विवाह नोंदी, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शिक्षण, आरोग्यविषयक सोयी, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, गावाचा बाजार, जत्रा, उत्सव, यांची व्यवस्था ठेवणे या २९ बाबी गावात ग्रामसेवक राबवित असतात. त्यांच्या कामाकडे लक्ष ठेवणे व प्रसंगी मदत सरपंच, उपसरपंचांनी करणे गरजेचे आहे.

--------------------

आम्ही पदावर येऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला. कोरोनामुळे आम्हाला प्रशिक्षण मिळाले नाही. प्रशिक्षण दिल्यास गावच्या विकासात आमचा हातभार लागू शकतो.

- संदीप इंगळे, उपसरपंच, कावली

सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव यांच्या समन्वयाने ग्रामपंचायतचा कारभार चालतो. आम्हा नवीन लोकांना प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. आता तरी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत प्रशिक्षण द्यावे.

- ममता मुकेश राठी, सरपंच, गव्हा फरकाडे