शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र, राज्य शासनाविरोधात जिल्हा काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: October 28, 2015 00:29 IST

केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनचे आमिष दाखवीत जनतेची मते घेणाऱ्या भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे.

आंदोलन : जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीचा निषेधअमरावती : केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अच्छे दिनचे आमिष दाखवीत जनतेची मते घेणाऱ्या भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे. शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे डाळीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर आणि वाढते भारनियमन बंद करून अखंडित वीजपुरवठा करावा यासाठी मंगळवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा सरकार विरोधात निदर्शने केलीत. वाढलेली महागाई आटोक्यात आणून शासकीय स्वस्तधान्य दुकानातून माफक दरात डाळीचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.केंद्रात आणि राज्यात सत्तेत येताच एका वर्षातच गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावून बड्या उद्योजकांच्या तिजोऱ्या भरण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. योजना केवळ गरीब व सर्वसामान्यांसाठी राबवीत असल्याचा देखावा करून गरिबांना जीवनावश्यक वस्तूमध्ये मध्ये एका वर्षातच अव्याढव्य भाववाढ केल्याचे वास्तव आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. याशिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट सर्वश्रृत आहे. असे असतानाच ट्रॉन्सफार्मर जळण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी वीज पुरवठा वेळीअवेळी खंडित होत आहे. ही विदारक स्थितीत भाजपा सरकारमुळे ओढवल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण काँग्रेसने केला आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्यानिमित्त स्वस्त धान्य दुकानातून माफक दरात डाळींचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदनाव्दारे केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, जि.प. अध्यक्ष सतीश उईके, गिरीश कराळे, अरूणा गोरले, सरिता मकेश्वर, दीपा लेंडे, ज्योती आरेकर, रजंना उईके, मोहन सिंगवी, गणेश आरेकर, प्रवीण घुईखेडकर, बापुराव गायकवाड, महेंद्रसिंग गैलवार, विलास पवार, सुधाकर भारसाकळे, प्रमोद दाळू, सुरेश आळे, भानुदास चोपडे, भागवत खांडे, र्कैलास आवारे, श्रीराम नेहर, संजय वानखडे, हिरालाल मावस्कर, अवधूत हरणे, बिटू मगरोळे, वसंत देशमुख संजय मापले, प्रदीप देशमुख, बबलू बोबडे, राजू कुरेशी, गजानन पुरी, किशोर देशमुख, बंडू देशमुख, दयाराम काळे, हेमंत येवले व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)