शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पोहोचल्या कोयलारी-पाचडोंगरीला; पोलीस बंदोबस्तात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 20:26 IST

Amravati News ¯ अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सोमवारी दुपारी तडकाफडकी कोयलारी गाठले. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले.

ठळक मुद्देडॉक्टरांशिवाय कुणाचेच ऐकू नका, आदिवासींना सल्ला

अमरावती : दूषित पाण्यामुळे तालुक्यातील कोयलारी-पाचडोंगरी येथे चौघांचा मृत्यू झाला, तर चारशेवर ग्रामस्थ आजारी पडले. सुट्टीवरून परतलेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सोमवारी दुपारी तडकाफडकी कोयलारी गाठले. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले, तर डॉक्टरांशिवाय कुणाचेही ऐकू नका, असा सल्ला आदिवासींना दिला.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत आरोग्य, विद्युत, पाणी पुरवठा, पंचायत विभागाचे अधिकारी होते. त्यांनी कोयलारी व पाचडोंगरी गावांमध्ये जात आदिवासींसोबत संवाद साधला. मृतांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. पाचडोंगरी येथील नंदराम धिकार यांनी आपबीती सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची पाहणी केली तसेच काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र व चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयाची स्थिती बघितली.

पोलीस बंदोबस्तात उपचार

आदिवासी भागात बरे वाटायच्या आतच जबरीने घरी नेले जात असल्याचा अनुभव आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिल्यामुळे आता दवाखान्यापुढे पोलिसांचा २४ तास बंदोबस्त लावण्यात येणार आहे. केवळ डॉक्टरांचेच ऐका, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी रुग्णांना बजावले.

विद्युत पुरवठा खंडितच

आदिवासींचे जीव धोक्यात आले असताना परिसरातील विद्युत पुरवठ्याचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे अतिरिक्त जनरेटर सर्व ठिकाणी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

टँकरही भरेना

विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे टँकरच भरले जात नाही. गावातील विहिरी, हातपंप सर्व सील करण्यात आले आहेत. सौरऊर्जेवरील यंत्रणा ढगाळ वातावरणामुळे कुचकामी ठरली. त्यातून मार्ग काढत कसेबसे टँकर भरून पाणी पाठविले जात आहे.

बेड, टॉयलेट वाढवा

रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड तसेच मोबाईल टॉयलेट स्वच्छता, स्वच्छ पाणी, योग्य औषधोपचार, औषधसाठा परिपूर्ण ठेवण्यासह सर्व बाबींवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

आतापर्यंत ३४४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. थोडे उपचार झाल्यावर आदिवासी लगेच घरी घेऊन जातात. त्यामुळे रुग्णालयापुढे आता पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

--------------

टॅग्स :Healthआरोग्य