शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पोहोचल्या कोयलारी-पाचडोंगरीला; पोलीस बंदोबस्तात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 20:26 IST

Amravati News ¯ अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सोमवारी दुपारी तडकाफडकी कोयलारी गाठले. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले.

ठळक मुद्देडॉक्टरांशिवाय कुणाचेच ऐकू नका, आदिवासींना सल्ला

अमरावती : दूषित पाण्यामुळे तालुक्यातील कोयलारी-पाचडोंगरी येथे चौघांचा मृत्यू झाला, तर चारशेवर ग्रामस्थ आजारी पडले. सुट्टीवरून परतलेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सोमवारी दुपारी तडकाफडकी कोयलारी गाठले. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले, तर डॉक्टरांशिवाय कुणाचेही ऐकू नका, असा सल्ला आदिवासींना दिला.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत आरोग्य, विद्युत, पाणी पुरवठा, पंचायत विभागाचे अधिकारी होते. त्यांनी कोयलारी व पाचडोंगरी गावांमध्ये जात आदिवासींसोबत संवाद साधला. मृतांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. पाचडोंगरी येथील नंदराम धिकार यांनी आपबीती सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची पाहणी केली तसेच काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र व चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयाची स्थिती बघितली.

पोलीस बंदोबस्तात उपचार

आदिवासी भागात बरे वाटायच्या आतच जबरीने घरी नेले जात असल्याचा अनुभव आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिल्यामुळे आता दवाखान्यापुढे पोलिसांचा २४ तास बंदोबस्त लावण्यात येणार आहे. केवळ डॉक्टरांचेच ऐका, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी रुग्णांना बजावले.

विद्युत पुरवठा खंडितच

आदिवासींचे जीव धोक्यात आले असताना परिसरातील विद्युत पुरवठ्याचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे अतिरिक्त जनरेटर सर्व ठिकाणी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

टँकरही भरेना

विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे टँकरच भरले जात नाही. गावातील विहिरी, हातपंप सर्व सील करण्यात आले आहेत. सौरऊर्जेवरील यंत्रणा ढगाळ वातावरणामुळे कुचकामी ठरली. त्यातून मार्ग काढत कसेबसे टँकर भरून पाणी पाठविले जात आहे.

बेड, टॉयलेट वाढवा

रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड तसेच मोबाईल टॉयलेट स्वच्छता, स्वच्छ पाणी, योग्य औषधोपचार, औषधसाठा परिपूर्ण ठेवण्यासह सर्व बाबींवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

आतापर्यंत ३४४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. थोडे उपचार झाल्यावर आदिवासी लगेच घरी घेऊन जातात. त्यामुळे रुग्णालयापुढे आता पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

--------------

टॅग्स :Healthआरोग्य