शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पोहोचल्या कोयलारी-पाचडोंगरीला; पोलीस बंदोबस्तात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 20:26 IST

Amravati News ¯ अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सोमवारी दुपारी तडकाफडकी कोयलारी गाठले. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले.

ठळक मुद्देडॉक्टरांशिवाय कुणाचेच ऐकू नका, आदिवासींना सल्ला

अमरावती : दूषित पाण्यामुळे तालुक्यातील कोयलारी-पाचडोंगरी येथे चौघांचा मृत्यू झाला, तर चारशेवर ग्रामस्थ आजारी पडले. सुट्टीवरून परतलेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सोमवारी दुपारी तडकाफडकी कोयलारी गाठले. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले, तर डॉक्टरांशिवाय कुणाचेही ऐकू नका, असा सल्ला आदिवासींना दिला.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत आरोग्य, विद्युत, पाणी पुरवठा, पंचायत विभागाचे अधिकारी होते. त्यांनी कोयलारी व पाचडोंगरी गावांमध्ये जात आदिवासींसोबत संवाद साधला. मृतांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. पाचडोंगरी येथील नंदराम धिकार यांनी आपबीती सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची पाहणी केली तसेच काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र व चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयाची स्थिती बघितली.

पोलीस बंदोबस्तात उपचार

आदिवासी भागात बरे वाटायच्या आतच जबरीने घरी नेले जात असल्याचा अनुभव आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिल्यामुळे आता दवाखान्यापुढे पोलिसांचा २४ तास बंदोबस्त लावण्यात येणार आहे. केवळ डॉक्टरांचेच ऐका, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी रुग्णांना बजावले.

विद्युत पुरवठा खंडितच

आदिवासींचे जीव धोक्यात आले असताना परिसरातील विद्युत पुरवठ्याचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे अतिरिक्त जनरेटर सर्व ठिकाणी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

टँकरही भरेना

विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे टँकरच भरले जात नाही. गावातील विहिरी, हातपंप सर्व सील करण्यात आले आहेत. सौरऊर्जेवरील यंत्रणा ढगाळ वातावरणामुळे कुचकामी ठरली. त्यातून मार्ग काढत कसेबसे टँकर भरून पाणी पाठविले जात आहे.

बेड, टॉयलेट वाढवा

रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड तसेच मोबाईल टॉयलेट स्वच्छता, स्वच्छ पाणी, योग्य औषधोपचार, औषधसाठा परिपूर्ण ठेवण्यासह सर्व बाबींवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.

आतापर्यंत ३४४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. थोडे उपचार झाल्यावर आदिवासी लगेच घरी घेऊन जातात. त्यामुळे रुग्णालयापुढे आता पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

--------------

टॅग्स :Healthआरोग्य