शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत मंत्री, आमदारांच्या उमेदवारीने चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:01 IST

राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, धारणीचे आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी हे  जिल्ह्यातील प्रमुख नेते सहकार क्षेत्रात ‘एन्ट्री’ टाकत असल्याने ही निवडणूक रंगणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तब्बल ११ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीत राज्यमंत्री, आमदारांनी उमेदवारी दाखल केल्याने मोठी चुरस वाढली आहे. शुक्रवारपर्यंत ११८ उमेदवारांनी संचालक पदासाठी नामांकन दाखल केले आहे.राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, धारणीचे आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी हे  जिल्ह्यातील प्रमुख नेते सहकार क्षेत्रात ‘एन्ट्री’ टाकत असल्याने ही निवडणूक रंगणार आहे. बॅंक निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरच सहकार क्षेत्रातील नेत्यांनी मतदारांच्या भेटीगाठीचे सत्र चालविले आहे. २१ संचालक पदासाठीच्या निवडणुकीत १६८६ मतदार संख्या आहे. एक -एक मत आपल्याकडे कसे खेचता येईल, यासाठी रणनिती आखली जात आहे. आता तर मंत्री, आमदार थेट या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे मतदारांसाठी ‘अच्छे दिन’ मानले जात आहे. विशेषत: सेवा सहकारी सोसायटीच्या मतदारांसाठी ही निवडणूक पर्वणी ठरणारी आहे. हल्ली शहर, गाव, खेड्यात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची धुमशान सुरू झाले आहे.

२३ सप्टेंबरपासून प्रचाराला वेग८ ते २२ सप्टेबर या दरम्यान नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया चालणार आहे. रिंगणातील उमेदवारांना २३ सप्टेंबर रोजी बोधचिन्हाचे वाटप होणार असून, त्यानंतर थेट प्रचाराला वेग येणार आहे. उमेदवारांना ११ दिवस प्रचारासाठी मिळणार आहे. ४ ऑक्टोंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांनी मोर्चेबांधणी चालविली आहे.

अनेकांचे राजकीय अस्तित्व पणाला?जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणुकीत हल्ली उमेदवारांची भाऊगर्दी बघायला मिळत आहे. मात्र, २२ सप्टेंबर रोजी नामांकन मागे घेण्याची तारीख आहे. त्यामुळे कोण मैदान सोडते आणि कोण कायम राहते, हे ‘विड्रॉल’ नंतर चित्र होणार स्पष्ट होणार आहे. २३ सप्टेंबरपासून रणधुमाळी सुरु होईल. उमेदवारांनी केलेली गर्दी बघता ‘लक्ष्मीदर्शन’ साठी तर ही उमेदवारी नाही, अशी शंका येत आहे.

 

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक