शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद उच्च कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 13:25 IST

Amravati : तत्कालीन प्रभारी कुलगुरू अडचणीत, डॉ. प्रशांत गावंडे यांची याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेला आहे. याप्रकरणी विद्यापीठाने सुनावणी घेऊन न्यायनिवाडा करावा, अन्यथा १० जून रोजी न्यायालय अंतिम निकाल देईल, असे स्पष्ट केले आहे. डॉ. प्रशांत गावंडे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सन २०२३ मध्ये १० सदस्य संख्या असलेल्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात अध्यक्षपदासाठी डॉ. दिनेश खेडकर आणि डॉ. प्रशांत गावंडे या दोघांनाही समान पाच मते पडली. त्यामुळे उपकुलसचिव विक्रांत मालवीय यांनी ईश्वरचिठीचा निर्णय घेतला. यावेळी ईश्वर चिठीतून डॉ. प्रशांत गावंडे यांचे नाव बाहेर आले. तेव्हा डॉ. दिनेश खेडकर आपसूकच बाद झाले असा समज झाला. मात्र, विद्यापीठ परिनियमानुसार ईश्वरचिठीतून ज्या व्यक्तीचे नाव येते ती व्यक्ती स्पर्धेतून बाद करावी लागते. मात्र, यावेळी डॉ. दिनेश खेडकर यांचे नावे चिठी निघाली नसताना डॉ. गावंडे यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले. ही बाब नंतर लक्षात आली असता दिनेश खेडकर समर्थकांनी तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद यावले यांच्याकडे तक्रार केली.

त्यानंतर प्रशासनाने डॉ. गांवडे यांच्याऐवजी दिनेश खेडकर यांना अभ्यास मंडळाचे अध्यक्षपद बहाल केले. तथापि, यानिर्णयाविरुद्ध डॉ. प्रशांत गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ५८२८/२०२३ नुसार धाव घेतली. तत्कालीनप्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद यावले, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांना प्रतिवादी केले आहे. दरम्यान, याप्रकरणी २ मे रोजी उच्च न्यायालयात तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना वारंवार नोटीस बजावूनसुद्धा ते गैरहजर राहत असल्याबाबत कोर्टाने ताशेरे ओढले. याप्रकरणी विद्यापीठाने योग्य ती कार्यवाही करून १३ मे रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेशित केले आहे. त्यामुळे १३ मे रोजी याविषयावर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालय दोन आठवड्यात म्हणजे १० जून रोजी अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कुलसचिवांच्या अडचणी वाढल्यावनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा डॉ. दिनेश खेडकर यांचे बाजूने निर्णय दिल्यास नुटा कुलसचिवांवर आक्षेप घेईल आणि डॉ. गावंडे यांना कौल दिला तर शिक्षण मंच जीव घेईल, अशा प्रकारे इकडे आड तिकडे विहीर, अशी कुलसचिवांची अवस्था झाली आहे. कुलगुरु नवीन असल्याने शिक्षक संघटनांच्या दबावात न येता कुलगुरूंनी सुनावणी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

विद्या परिषदेचे राजकारण कुणाच्या पथ्यावर?डॉ. दिनेश खेडकर यांना विजयी घोषित केल्यास विद्या परिषदमधून व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्य नामित करण्याचा मार्ग सुकर होईल व व्यवस्थापन परिषदेवर शिक्षण मंचाचे दोन सदस्य जातील. कारण अॅकेडेमीकमध्ये शिक्षण मंचचे प्राबल्य आहे. कुलसचिवांचा कालावधी १७ मे रोजी संपत असल्याने निवडणुकीतील वेळकाढूपणाचे हे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे लागू शकते

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयuniversityविद्यापीठAmravatiअमरावती