शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद उच्च कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 13:25 IST

Amravati : तत्कालीन प्रभारी कुलगुरू अडचणीत, डॉ. प्रशांत गावंडे यांची याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेला आहे. याप्रकरणी विद्यापीठाने सुनावणी घेऊन न्यायनिवाडा करावा, अन्यथा १० जून रोजी न्यायालय अंतिम निकाल देईल, असे स्पष्ट केले आहे. डॉ. प्रशांत गावंडे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सन २०२३ मध्ये १० सदस्य संख्या असलेल्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात अध्यक्षपदासाठी डॉ. दिनेश खेडकर आणि डॉ. प्रशांत गावंडे या दोघांनाही समान पाच मते पडली. त्यामुळे उपकुलसचिव विक्रांत मालवीय यांनी ईश्वरचिठीचा निर्णय घेतला. यावेळी ईश्वर चिठीतून डॉ. प्रशांत गावंडे यांचे नाव बाहेर आले. तेव्हा डॉ. दिनेश खेडकर आपसूकच बाद झाले असा समज झाला. मात्र, विद्यापीठ परिनियमानुसार ईश्वरचिठीतून ज्या व्यक्तीचे नाव येते ती व्यक्ती स्पर्धेतून बाद करावी लागते. मात्र, यावेळी डॉ. दिनेश खेडकर यांचे नावे चिठी निघाली नसताना डॉ. गावंडे यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले. ही बाब नंतर लक्षात आली असता दिनेश खेडकर समर्थकांनी तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद यावले यांच्याकडे तक्रार केली.

त्यानंतर प्रशासनाने डॉ. गांवडे यांच्याऐवजी दिनेश खेडकर यांना अभ्यास मंडळाचे अध्यक्षपद बहाल केले. तथापि, यानिर्णयाविरुद्ध डॉ. प्रशांत गावंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ५८२८/२०२३ नुसार धाव घेतली. तत्कालीनप्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद यावले, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांना प्रतिवादी केले आहे. दरम्यान, याप्रकरणी २ मे रोजी उच्च न्यायालयात तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना वारंवार नोटीस बजावूनसुद्धा ते गैरहजर राहत असल्याबाबत कोर्टाने ताशेरे ओढले. याप्रकरणी विद्यापीठाने योग्य ती कार्यवाही करून १३ मे रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेशित केले आहे. त्यामुळे १३ मे रोजी याविषयावर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालय दोन आठवड्यात म्हणजे १० जून रोजी अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कुलसचिवांच्या अडचणी वाढल्यावनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाचा डॉ. दिनेश खेडकर यांचे बाजूने निर्णय दिल्यास नुटा कुलसचिवांवर आक्षेप घेईल आणि डॉ. गावंडे यांना कौल दिला तर शिक्षण मंच जीव घेईल, अशा प्रकारे इकडे आड तिकडे विहीर, अशी कुलसचिवांची अवस्था झाली आहे. कुलगुरु नवीन असल्याने शिक्षक संघटनांच्या दबावात न येता कुलगुरूंनी सुनावणी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

विद्या परिषदेचे राजकारण कुणाच्या पथ्यावर?डॉ. दिनेश खेडकर यांना विजयी घोषित केल्यास विद्या परिषदमधून व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्य नामित करण्याचा मार्ग सुकर होईल व व्यवस्थापन परिषदेवर शिक्षण मंचाचे दोन सदस्य जातील. कारण अॅकेडेमीकमध्ये शिक्षण मंचचे प्राबल्य आहे. कुलसचिवांचा कालावधी १७ मे रोजी संपत असल्याने निवडणुकीतील वेळकाढूपणाचे हे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे लागू शकते

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयuniversityविद्यापीठAmravatiअमरावती