शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

कचऱ्यात फेकलेल्या बालिकेची अमरावतीला रवानगी

By admin | Updated: May 7, 2016 00:45 IST

दि. ३० एप्रिललच्या रात्री ११.२५ वाजता शहरातील शांकुतल कॉलनीत अभागी मात्या-पित्याने नवजात बालिकेला कचऱ्यात फेकल्याची घटना उघडकीस आली.

माता-पित्याचा शोध नाही : दत्तक घेण्यासाठी अनेकांची तयारीवरूड : दि. ३० एप्रिललच्या रात्री ११.२५ वाजता शहरातील शांकुतल कॉलनीत अभागी मात्या-पित्याने नवजात बालिकेला कचऱ्यात फेकल्याची घटना उघडकीस आली. अखेर त्या बेवारस नवजात बालिकेची अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. मुलगी घरात जन्म घेताच लक्ष्मीचे रुप समजले जाते. तरीही केवळ मुलाचा अट्टाहास करुन मुलीला गर्भातच मारण्याचा प्रकार शहरासह खेडयापाडयात सुरू असतो, तर वंशाच्या दिव्याकरिता प्रयत्नशील असणारी जोडपी आणि कुटुंबे अनेक आहेत. पंरतु मुलीच वंशाचा दिवा असल्याचे सिध्द होऊनही मुलीवर प्रेम करणारे फार थोडे आहेत. असाच प्रकार शहरातील शांकूतल विहारात ३० एप्रिलच्या रात्री उघडकीस आला. तीन युवकांना रडण्याचा आवाज ऐकू आल्यावरून शोध घेतला असता एक गोरीगोमटी नवजात बालिका विव्हळत असताना दिसली. तिला बाल रुग्णालयात दाखल करण्यात येऊन पोलिसांना माहिती दिली. परंतु चार दिवसांचा अवधी लोटूनही पोलिसांना ते निर्दयी अभागी माता पिता अद्यापही गवसले नाहीत, हे ेआश्चर्य आहे. बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण चौधरी आणि डॉ.समता चौधरी या दाम्पत्यांनी उपचार करून नवजात शिशूला सावध केले होते. परंतु पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून नवजात बालिकेला अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णलयामधील बालकल्याण मंडळाच्या ताब्यात देण्यात आले. स्त्री भ्रूणहत्येचे भूत अद्यापही समाजातील लोकांच्या डोक्यावर चढले असल्याचे पुन्हा या धटनेने सिध्द होते. केवळ वंशाचा दिवा पाहिजे म्हणून फेकण्यात आलेल्या त्या नवजात बालिकेला अंधाऱ्या रात्री कचऱ्यात फेकण्यात आल्याने हृदयाचा थरकाप उडविणारे वृत्त ऐकून अनेकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या होत्या. परंतु त्या युवकांनी धाडसामुळेचे तीच ेप्राण वाचले. पोटच्या गोळयाला कचऱ्यात फेकणारी ती अभागी माता कोण? याचा शोध अद्यापही सुरुच आहे. नवजात गोऱ्यागोमट्या बालिकेला दत्तक घेण्याकरिता तालुक्यातून शेकडो हात पुढे सरसावले आहे. (तालुका प्रतिनिधी)‘त्या’ एक दिवसाच्या बालिकेला बेवारस फेकणाऱ्या माता-पित्याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र अद्यापही धागेदोरे गवसले नाहीत. सदर नवजात बालिका ही मध्य प्रदेशातील असावी, असा अंदाज आहे. परंतु सदर बालिकेच्या पालणपोषणाकरिता तिला जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे बाल कल्याण मंडळाच्या ताब्यात देण्यात आले आहे. किमान सहा महिने तरी तिला दत्तक दिले जाणार नाही. तिच्या जन्मदात्यांचा शोध घेणे अनिवार्य आहे.- अर्जुन ठोसरे, ठाणेदार.