शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शिवसेनेची दुष्काळ प्रश्नावर बंदद्वार चर्चा

By admin | Updated: September 24, 2015 00:29 IST

राज्यात भाजप- सेनेचे शासन असले तरी या दोन्ही पक्षात सुंदोपसंदी सुरु आहे. एकमेकांवर कुरघोळीचे राजकारण करण्यात एकही संधी सोडली जात नाही.

दिवाकर रावते यांचे मार्गदर्शन : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा सल्लाअमरावती : राज्यात भाजप- सेनेचे शासन असले तरी या दोन्ही पक्षात सुंदोपसंदी सुरु आहे. एकमेकांवर कुरघोळीचे राजकारण करण्यात एकही संधी सोडली जात नाही. याच पार्श्वभूमिवर राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दुष्काळ, शेतकरी प्रश्नांवर बुधवारी बंदद्वार चर्चा करुन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या सूचना त्यांनी शिवसैनिकांना दिल्यात. येथील शासकीय विश्राम भवनात ना. दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या बैठकीला आ. श्रीकांत देशपांडे, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, नाना नागमोते, प्रशांत वानखडे, दिनेश बूब, दिंगबर मानकर, पंजाबराव तायवाडे, बाळासाहेब भागवत, शिवसेनेच्या महिला नेत्या शोभा लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी ना. रावते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांना दुष्काळग्रस्त भागात जावून बळीराजाला जगण्याची उमेद द्यावी लागणार आहे. विशेषत: हे अभियान विदर्भ, मराठवाड्यात राबविले जात आहे. शासन योजनेचा लाभ श्ोतकऱ्यांना मिळावा, यासाठी त्यांच्या दारापर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी ना. रावते यांनी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ची माहिती दिली. नवीन विहिरींची योजना, जलयुक्त शिवार योजना, रोहयोतून विविध कामे करुन शेतकऱ्यांना शासन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्नांची परकाष्ठा करावी, असा सल्ला त्यांनी दिला. ना. रावते हे दुष्काळ प्रश्नांवर शिवसैनिकांशी संवाद साधण्याच्या हेतूने आले असले तरी जिल्ह्यात शिवसेनेत आलेली मरगळ झटकण्यासाठी हा दौरा असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)