शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद बैठकीत निवडणूक रणनीतीवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 05:00 IST

महाराष्ट्रात सध्या घाणेरडे राजकारण सुरू असल्याची टीका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले. या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्याचा उद्योग भाजपने चालविला असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणारे असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती विभागातील नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आलेल्या संवाद बैठकीतून  निवडणुकीची रणनीती आखली. विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका अथवा नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अव्वल कशी राहील, याचे विचारमंथन झाले. येत्या काळात अमरावतीत दोन दिवसीय शिबिर आयोजनावरही शिक्कामाेर्तब करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाने जोश भरला, हे विशेष. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या संवाद बैठकीला व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार प्रकाश गजभिये, आमदार राजू तोडसाम, आमदार अमोल मिटकरी, आमदार किरण सरनाईक, एकनाथ खडसे, गुलाबराव गावंडे, माजी आमदार तुकाराम बिडकर, इंद्रनील नाईक, माजी मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार संदीप बाजोरिया, माजी विधानसभा उपसभापती शरद तसरे, केवलराम काळे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, रमेश बंग, माजी आमदार रेखा खेडकर, माजी मंत्री भारत बोंद्रे, गुलाबराव गावंडे, बळीराम शिरसकार, हरिदास भदे,    शैलेजा तोटे, सुनील पाटील, दत्ता डहाके, महिला पदाधिकारी सुरेखा ठाकरे, संगीता ठाकरे, सलील देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी केले.

राज्य सरकार धोक्यात आणण्यासाठी षडयंत्रराज्याचे महाविकास आघाडीची सत्ता धोक्यात आणण्यासाठी दरदिवशी नवनवी षडयंत्रे रचत असल्याचा आरोप खासदार शरद पवार यांनी आवर्जून केला. सरकार अस्थिर करण्याचे मनसुबे हाणून पाडा.

वैनगंगेचे पाणी नळगंगेद्वारे पश्चिम विदर्भात येणार : जयंत पाटीलवैनगंगेच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी हे नळगंगेद्वारे पश्चिम विदर्भात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील यांनी म्हणाले. याबाबत पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आम्हाला यापूर्वी सूचित केले आहे. त्यामुळे येथील सिंचनाचा अनुशेष दूर होणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या पोलीस अटकेत असलेल्या अनिल देशमुख व मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा त्यांनी निषेध नोंदविला. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. 

संजय खोडके यांच्यावर कौतुकाची थापराष्ट्रवादी कॉंग्रेसची अमरावती विभागीय संवाद बैठक आयोजित केल्याबद्दल नेते शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदींनी संज़य खोडके यांच्या कार्यावर कौतुकाची थाप दिली. काेरोनानंतर पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांची यशस्वी बैठक झाली, हे विशेष.

राज्यात घाणेरड्या राजकारणाचा शिरकाव : एकनाथ खडसेमहाराष्ट्रात सध्या घाणेरडे राजकारण सुरू असल्याची टीका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले. या हल्ल्यामागे भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्याचा उद्योग भाजपने चालविला असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणारे असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

एसआरपीएफच्या चार कंपन्यांसह पोलीस बंदोबस्तराष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईस्थित ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला चढवला. त्या अनुषंगाने अमरावतीतील पवार यांच्या जाहीर कार्यक्रमावर पोलिसांची करडी नजर होती. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वात डीसीपीद्वय विक्रम साळी व एम. एम. मकानदार, पाचही सहायक पोलीस आयुक्तांची प्रत्येक घडामोडीवर सूक्ष्म नजर होती. एसआरपीएफच्या चार कंपन्यांसह १० पोलीस निरीक्षक, २८ सहायक व उपनिरीक्षक, २१५ पोलीस अंमलदार, ३७ महिला अंमलदार व २० पोलिसांचा समावेश असलेली आरसीपीदेखील तैनात होती. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार