शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

प्रमाणपत्राअभावी अपंग शासकीय योजनांपासून वंचित

By admin | Updated: April 29, 2015 00:25 IST

सुदृढ आरोग्य व सर्वसाधारण देहयष्टी हे दैवी वरदान असली तरी समाजातील अनेक महिला-पुरुषापासून हे वरदान नैसर्गिक आघाताने हिरावून घेतल्या जाते.

३० हजार अपंगांवर अन्याय : धडपडणारे गरजू प्रतीक्षा यादीतसुरेश सवळे चांदूरबाजारसुदृढ आरोग्य व सर्वसाधारण देहयष्टी हे दैवी वरदान असली तरी समाजातील अनेक महिला-पुरुषापासून हे वरदान नैसर्गिक आघाताने हिरावून घेतल्या जाते. समाजातील अशा महिला-पुरुषासाठी काहीसा आधार म्हणून शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जातात. या योजना पदरात पाडून घेण्यासाठी टक्केवारी नुसार अपंग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना प्रचंड आटापीटा करावा लागतो. असा त्रास सहन करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या राज्यात ३० हजारावर पोहचली आहे. राज्यातील अपंगांना त्यांचा हक मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना कार्यरत आहेत. आ. बच्चू कडू यांनी तर अपंगांची हाक थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात नेऊन आंदोलनही केल्याचा अनुभव आहे. शासनाने जिल्हास्तरावर अशा लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली. यातही अनेक अडचणी येत गेल्या. प्रामुख्याने जिल्हास्तरावर असे बोगस प्रमाणपत्र मिळवून योजनांचा लाभ लाटणाऱ्यांचीच संख्या वाढत गेली. ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आता आॅनलाईन राबविण्यात येत आहे.आॅनलाईन पद्धतीमुळे प्रक्रियेत पारदर्शकता आली असली तरी पूर्वीप्रमाणे त्वरीत प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला काहीसा तडा गेला आहे. आॅक्टोबर २०१२ च्या शासकीय आदेशानुसार ही प्रक्रिया आॅनलाईन झाली. मात्र ही पद्धत स्वीकारताना लाभार्थ्यांना हेलपाटे खावे लागणार नाही. कागदोपत्री ही दक्षता घेण्यात आली असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या लाभार्थ्यांना वर्ष-दीड वर्ष प्रतीक्षा यादीतच रहावे लागते. याची अनेक उदाहरणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दिसून येते. प्रतिक्षेत असलेले विभागनिहाय लाभार्थी अमरावती ४७१५, नागपूर २६९१, औरंगाबाद ८७०७, मुंबई ४७९१, नाशिक २३४६, पुणे ५९९८ असे आहेत. आॅनलाईनच्या माध्यमातून शासनाने प्रक्रिया अद्यावत केली असली तरी यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते. शासन आदेशात प्रमाणपत्र मिळविताना अपंगांना कुठलाही त्रास होऊ नये किमान अपंग लाभार्थ्याची शारीरिक, मानसिक अवस्था लक्षात घेऊन त्यांची लालफितशाहीतून सुटका करण्याचीही व्यवस्था आहे. मात्र त्याची योग्य ती अंमलबजावणी होताना दिसत नाही. राज्यातील ३० लाखावर अपंगांना न्याय देऊन त्यांच्या न्याय्य मागण्या पदरात पाडून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. अपंगांना आवश्यक प्रमाणपत्र त्यांना वेळेवर मिळणे गरजेचे आहे. यात त्यांना त्रास व हेलपाटे होत असेल तर ही बाब शासनकर्त्याच्या नजरेत आणून देऊ याउपरही न्याय मिळाला नाही तर वेळप्रसंगी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारू व अपंगांना न्याय मिळवून देऊ.- आ. बच्चू कडू, अचलपूर मतदारसंघ.