शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्राअभावी अपंग शासकीय योजनांपासून वंचित

By admin | Updated: April 29, 2015 00:25 IST

सुदृढ आरोग्य व सर्वसाधारण देहयष्टी हे दैवी वरदान असली तरी समाजातील अनेक महिला-पुरुषापासून हे वरदान नैसर्गिक आघाताने हिरावून घेतल्या जाते.

३० हजार अपंगांवर अन्याय : धडपडणारे गरजू प्रतीक्षा यादीतसुरेश सवळे चांदूरबाजारसुदृढ आरोग्य व सर्वसाधारण देहयष्टी हे दैवी वरदान असली तरी समाजातील अनेक महिला-पुरुषापासून हे वरदान नैसर्गिक आघाताने हिरावून घेतल्या जाते. समाजातील अशा महिला-पुरुषासाठी काहीसा आधार म्हणून शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जातात. या योजना पदरात पाडून घेण्यासाठी टक्केवारी नुसार अपंग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना प्रचंड आटापीटा करावा लागतो. असा त्रास सहन करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या राज्यात ३० हजारावर पोहचली आहे. राज्यातील अपंगांना त्यांचा हक मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना कार्यरत आहेत. आ. बच्चू कडू यांनी तर अपंगांची हाक थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात नेऊन आंदोलनही केल्याचा अनुभव आहे. शासनाने जिल्हास्तरावर अशा लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली. यातही अनेक अडचणी येत गेल्या. प्रामुख्याने जिल्हास्तरावर असे बोगस प्रमाणपत्र मिळवून योजनांचा लाभ लाटणाऱ्यांचीच संख्या वाढत गेली. ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आता आॅनलाईन राबविण्यात येत आहे.आॅनलाईन पद्धतीमुळे प्रक्रियेत पारदर्शकता आली असली तरी पूर्वीप्रमाणे त्वरीत प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला काहीसा तडा गेला आहे. आॅक्टोबर २०१२ च्या शासकीय आदेशानुसार ही प्रक्रिया आॅनलाईन झाली. मात्र ही पद्धत स्वीकारताना लाभार्थ्यांना हेलपाटे खावे लागणार नाही. कागदोपत्री ही दक्षता घेण्यात आली असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या लाभार्थ्यांना वर्ष-दीड वर्ष प्रतीक्षा यादीतच रहावे लागते. याची अनेक उदाहरणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दिसून येते. प्रतिक्षेत असलेले विभागनिहाय लाभार्थी अमरावती ४७१५, नागपूर २६९१, औरंगाबाद ८७०७, मुंबई ४७९१, नाशिक २३४६, पुणे ५९९८ असे आहेत. आॅनलाईनच्या माध्यमातून शासनाने प्रक्रिया अद्यावत केली असली तरी यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते. शासन आदेशात प्रमाणपत्र मिळविताना अपंगांना कुठलाही त्रास होऊ नये किमान अपंग लाभार्थ्याची शारीरिक, मानसिक अवस्था लक्षात घेऊन त्यांची लालफितशाहीतून सुटका करण्याचीही व्यवस्था आहे. मात्र त्याची योग्य ती अंमलबजावणी होताना दिसत नाही. राज्यातील ३० लाखावर अपंगांना न्याय देऊन त्यांच्या न्याय्य मागण्या पदरात पाडून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. अपंगांना आवश्यक प्रमाणपत्र त्यांना वेळेवर मिळणे गरजेचे आहे. यात त्यांना त्रास व हेलपाटे होत असेल तर ही बाब शासनकर्त्याच्या नजरेत आणून देऊ याउपरही न्याय मिळाला नाही तर वेळप्रसंगी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारू व अपंगांना न्याय मिळवून देऊ.- आ. बच्चू कडू, अचलपूर मतदारसंघ.