शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

रात्रभरात झाले होत्याचे नव्हते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

बेनोडा परिसरात सर्वाधिक क्षेत्र संत्राबागांनी व्यापले आहेत. मागील वर्षीच्या अभूतपूर्व दुष्काळातून कशाबशा वाचविलेल्या संत्राबागा पावसाच्या खंडाने यावर्षी बहरल्या नाहीत. तेव्हा वर्षाचा गाडा चालविण्यासाठी संत्राउत्पादकांनी खरीप पिकांची कास धरली. मात्र, त्यातही निसर्गाने साथ दिली नाही. उभ्या सोयाबीन पिकामध्ये रोटाव्हेटर चालवावा लागला. अतिवृष्टीने ज्वारी काळी झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले.

ठळक मुद्देनववर्षाचे स्वागत अवकाळी पावसाने : थंडीची लाट कायम, तूर झोपली, कांदा पीकही बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा (शहीद) : कडाक्याची थंडी आणि दवाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. रात्रभरात दवाने शेतकऱ्यांची हिरवीगार पिके करपून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.बेनोडा परिसरात सर्वाधिक क्षेत्र संत्राबागांनी व्यापले आहेत. मागील वर्षीच्या अभूतपूर्व दुष्काळातून कशाबशा वाचविलेल्या संत्राबागा पावसाच्या खंडाने यावर्षी बहरल्या नाहीत. तेव्हा वर्षाचा गाडा चालविण्यासाठी संत्राउत्पादकांनी खरीप पिकांची कास धरली. मात्र, त्यातही निसर्गाने साथ दिली नाही. उभ्या सोयाबीन पिकामध्ये रोटाव्हेटर चालवावा लागला. अतिवृष्टीने ज्वारी काळी झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले. कपाशी व तुरीचे पीक समाधानकारक दिसत असतानाच दवाच्या प्रादुर्भावाने बळीराजाच्या आशेवर पाणी फेरले गेले. ऐन भरात असलेल्या तुरीवर दव पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार असल्याने त्याचा हिरमोड झाला.यावर्षी मक्याच्या उत्पादनात सार्वत्रिक घट असल्याने त्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे. यामुळे काहींनी रबी हंगामात मक्याची लागवड केली. मात्र, दवाने त्यालाही सोडले नाही. ऐन कणीस फेकण्याच्या स्थितीत असलेला मका रात्रभरात करपून गेल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील एकाच वर्षात अभूतपूर्व दुष्काळ, अनियमित पाऊस आणि आता दव असे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तीन ऋतूत तीन अस्मानी संकटांना सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर आली होती. त्यांना तोंड देता-देता शेतकरी मेटाकुटीला आला असून, सरकारने अतिवृष्टीच्या मदतीतून वगळलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना निदान दवाची नुकसानभरपाई देऊन अंतिम दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.नांदगाव खंडेश्वर : चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवर दुष्परिणाम झाला आहे. फुलोर, कळी व शेंगा अवस्थेत असलेले तुरीचे पीक थंडीमुळे करपल्यागत झाले आहे.नांदगाव खंडेश्वर येथील बारमुंड शिवारात तूर पिकावर दवाळ गेल्याचे नांदगाव खंडेश्वर येथील शेतकरी पांडुरंग इखार यांनी सांगितले. याशिवाय या कडाक्याच्या थंडीचा कांद्याच्या रोपावरही परिणाम झाला असून, रोपाचे शेंडे करपले आहे. सध्या प्रत्येक शेतात दिवसभर शेकोटी पेटल्याचे चित्र आहे.चांदूर बाजार, नांदगावातही पिकांना फटकाचांदूर बाजार : तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात उभ्या केलेल्या खरीप व रब्बी पिकांना नववर्षात अवकाळी मुसळधार पावसाने झोडपले. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणाने पिकांवर संकट कोसळले असताना, पावसासह वातावरणात पसरलेल्या गारठ्याने पिकांची दैना केली आहे.तालुक्यात सध्या हरभरा, तूर, कांदा, गहू पिके चांगलीच बहरली आहेत. अशातच नववर्षात पावसाने सकाळीच दमदार हजेरी लावल्याने या पिकांना मोठी झळ पोहोचली आहे. एकीकडे मुसळधार अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे बोचरी थंडी यामुळे शेतकरी व मजूर वर्ग शेतात जाण्याचाही कंटाळा करीत आहेत. या अवकाळी पावसाचा परिणाम संत्रा पिकावरसुद्धा झाला आहे. झाडावर असलेला संत्रा गळू लागला आहे. ऐन तुरीच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने हजेरी लावल्याने पीक जमिनीकडे झेपावत आहे. यासोबतच कपाशी या पिकालाही पावसाचा चांगलाच फटका बसला असून, कापूस ओला झाल्याने प्रतवारी खराब झाल्याची शेतकऱ्यांची तक्रारा आहे. गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे बहरलेल्या तुरीच्या शेंगांमध्ये अळीचे प्रमाणही वाढले आहे. शेतात सध्या रबीची गहू, कांदा ही नाजूक पिके असून, जोमात बरसल्या अवकाळी पावसामुळे कांदा पीक जमिनीतच सडत आहे, तर गहू शेतातच जमिनीवर लोळला आहे. थंडी कितीही राहू देत, पण ढगाळ वातावरण नको, अशी शेतकरी वर्ग मनोमन प्रार्थना करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेती