शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
4
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
5
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
6
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
7
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
8
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
9
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
10
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
11
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
12
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
13
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
14
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
15
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
16
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
17
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
18
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
19
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

रात्रभरात झाले होत्याचे नव्हते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

बेनोडा परिसरात सर्वाधिक क्षेत्र संत्राबागांनी व्यापले आहेत. मागील वर्षीच्या अभूतपूर्व दुष्काळातून कशाबशा वाचविलेल्या संत्राबागा पावसाच्या खंडाने यावर्षी बहरल्या नाहीत. तेव्हा वर्षाचा गाडा चालविण्यासाठी संत्राउत्पादकांनी खरीप पिकांची कास धरली. मात्र, त्यातही निसर्गाने साथ दिली नाही. उभ्या सोयाबीन पिकामध्ये रोटाव्हेटर चालवावा लागला. अतिवृष्टीने ज्वारी काळी झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले.

ठळक मुद्देनववर्षाचे स्वागत अवकाळी पावसाने : थंडीची लाट कायम, तूर झोपली, कांदा पीकही बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा (शहीद) : कडाक्याची थंडी आणि दवाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. रात्रभरात दवाने शेतकऱ्यांची हिरवीगार पिके करपून लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.बेनोडा परिसरात सर्वाधिक क्षेत्र संत्राबागांनी व्यापले आहेत. मागील वर्षीच्या अभूतपूर्व दुष्काळातून कशाबशा वाचविलेल्या संत्राबागा पावसाच्या खंडाने यावर्षी बहरल्या नाहीत. तेव्हा वर्षाचा गाडा चालविण्यासाठी संत्राउत्पादकांनी खरीप पिकांची कास धरली. मात्र, त्यातही निसर्गाने साथ दिली नाही. उभ्या सोयाबीन पिकामध्ये रोटाव्हेटर चालवावा लागला. अतिवृष्टीने ज्वारी काळी झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले. कपाशी व तुरीचे पीक समाधानकारक दिसत असतानाच दवाच्या प्रादुर्भावाने बळीराजाच्या आशेवर पाणी फेरले गेले. ऐन भरात असलेल्या तुरीवर दव पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार असल्याने त्याचा हिरमोड झाला.यावर्षी मक्याच्या उत्पादनात सार्वत्रिक घट असल्याने त्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे. यामुळे काहींनी रबी हंगामात मक्याची लागवड केली. मात्र, दवाने त्यालाही सोडले नाही. ऐन कणीस फेकण्याच्या स्थितीत असलेला मका रात्रभरात करपून गेल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील एकाच वर्षात अभूतपूर्व दुष्काळ, अनियमित पाऊस आणि आता दव असे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तीन ऋतूत तीन अस्मानी संकटांना सामोरे जाण्याची वेळ बळीराजावर आली होती. त्यांना तोंड देता-देता शेतकरी मेटाकुटीला आला असून, सरकारने अतिवृष्टीच्या मदतीतून वगळलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना निदान दवाची नुकसानभरपाई देऊन अंतिम दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.नांदगाव खंडेश्वर : चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवर दुष्परिणाम झाला आहे. फुलोर, कळी व शेंगा अवस्थेत असलेले तुरीचे पीक थंडीमुळे करपल्यागत झाले आहे.नांदगाव खंडेश्वर येथील बारमुंड शिवारात तूर पिकावर दवाळ गेल्याचे नांदगाव खंडेश्वर येथील शेतकरी पांडुरंग इखार यांनी सांगितले. याशिवाय या कडाक्याच्या थंडीचा कांद्याच्या रोपावरही परिणाम झाला असून, रोपाचे शेंडे करपले आहे. सध्या प्रत्येक शेतात दिवसभर शेकोटी पेटल्याचे चित्र आहे.चांदूर बाजार, नांदगावातही पिकांना फटकाचांदूर बाजार : तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात उभ्या केलेल्या खरीप व रब्बी पिकांना नववर्षात अवकाळी मुसळधार पावसाने झोडपले. गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणाने पिकांवर संकट कोसळले असताना, पावसासह वातावरणात पसरलेल्या गारठ्याने पिकांची दैना केली आहे.तालुक्यात सध्या हरभरा, तूर, कांदा, गहू पिके चांगलीच बहरली आहेत. अशातच नववर्षात पावसाने सकाळीच दमदार हजेरी लावल्याने या पिकांना मोठी झळ पोहोचली आहे. एकीकडे मुसळधार अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे बोचरी थंडी यामुळे शेतकरी व मजूर वर्ग शेतात जाण्याचाही कंटाळा करीत आहेत. या अवकाळी पावसाचा परिणाम संत्रा पिकावरसुद्धा झाला आहे. झाडावर असलेला संत्रा गळू लागला आहे. ऐन तुरीच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने हजेरी लावल्याने पीक जमिनीकडे झेपावत आहे. यासोबतच कपाशी या पिकालाही पावसाचा चांगलाच फटका बसला असून, कापूस ओला झाल्याने प्रतवारी खराब झाल्याची शेतकऱ्यांची तक्रारा आहे. गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ वातावरणामुळे बहरलेल्या तुरीच्या शेंगांमध्ये अळीचे प्रमाणही वाढले आहे. शेतात सध्या रबीची गहू, कांदा ही नाजूक पिके असून, जोमात बरसल्या अवकाळी पावसामुळे कांदा पीक जमिनीतच सडत आहे, तर गहू शेतातच जमिनीवर लोळला आहे. थंडी कितीही राहू देत, पण ढगाळ वातावरण नको, अशी शेतकरी वर्ग मनोमन प्रार्थना करीत आहेत.

टॅग्स :agricultureशेती