शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धामणगावात रिकामटेकडे झाले सैराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

मोहन राऊत धामनगाव रेल्वे : ना डॉक्टरची चिट्ठी, ना महत्त्वाचे कारण, मेडिकल घरानजीक असताना एक-दोन रुपयांच्या तापाच्या गोळीसाठी ...

मोहन राऊत

धामनगाव रेल्वे : ना डॉक्टरची चिट्ठी, ना महत्त्वाचे कारण, मेडिकल घरानजीक असताना एक-दोन रुपयांच्या तापाच्या गोळीसाठी रिकामटेकडे संपूर्ण शहरात सैराटासारखे दुचाकीने फिरत असल्याने यावर वचक कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभर घरात राहणारे कुटुंब रात्री रस्त्यावर शतपावली करीत फिरायला निघत असल्याने कोरोनाची साखळी तुटणार कशी, हादेखील प्रश्नच आहे.

जिल्हा प्रशासनाने १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करीत सर्व शासकीय कार्यालयाची कामे बंद केली आहेत. बँकेतील पैसे काढण्याचा व्यवहारही बंद केला. प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. धामणगाव तालुक्याची कोरोना स्थिती पाहिली, तर आज जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे कोरोना रुग्ण धामणगाव तालुक्यात आहेत. आठवड्यात एका दिवशी तब्बल ७० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण तालुक्यात आढळले आहे. प्रत्येक कोरोना चाचणीत दहा रुग्णांमागे चार रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळत आहेत. अनेक रिकामटेकडे सकाळी ७ वाजता कधी दुधाच्या नावाने, तर कधी दोन रुपयांच्या तापाच्या गोळीच्या नावावर अख्खे शहर पिंजून काढत आहे. पोलिसांनी अडवले असता, तापाची गोळी आणायला गेलो, विक्स, बाम खरेदीला गेलो, असे क्षुल्लक कारण सांगितले जाते. ज्या व्यक्तीच्या घराच्या बाजूला व रहिवासी असलेल्या चौक परिसरात मेडिकल आहेत, ते सोडून शहर फिरायची गरज काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

पोलिसांचा वचक, कारवाई आवश्यक

अकारण फिरणाऱ्यांवर चाप न लावल्यास सात दिवसांच्या लॉकडाऊनचा फायदा होणे शक्य नाही तसेच कोरोना साखळी तुटणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

दिवसा घरात रात्री कुटुंब रस्त्यावर

जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या या कडक निर्बंधाचे पालन काही कुटुंब करतात. मात्र, रात्रीला आपल्या लहानग्याला घेऊन रस्त्यावर फिरण्यासाठी येतात. दिवसा कोरोनाची भीती, तर रात्रीला कोरोनाचा फैलाव होत नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. अंजनसिंगी, रामगाव, परसोडी, यवतमाळ या रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते.

यंत्रणा सजग, नागरिकांचे काय?

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे हे कोरोना चाचणीपासून, तर लसीकरण योग्य पद्धतीने व्हावे म्हणून स्वतः चिठ्ठ्या वाटतात. एका वर्षांपासून सतत अविरत सेवा देता-देता ते आजारी पडले आहे. तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांच्या नातेवाइकांचे निधन झाले तरी ते दुसऱ्या दिवशी रुजू होऊन तालुक्याच्या आरोग्य विभागाचा कारभार पाहत आहे. दत्तापूरचे पोलीस निरीक्षक ब्रमानंद शेळके हे २४ तास शहरात ड्युटी करीत आहेत. तहसीलदार गौरवकुमार भळगाठिया, गटविकास अधिकारी माया वानखडे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे हे कोरोनाविरुद्धच्या लढाईचे जोखमीने काम पार पाडत आहे.

कोट

वाढत्या कोरोनाकाळात सात दिवसही घरात न बसणाऱ्या व रस्त्यावर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांना पकडून त्वरित त्यांची कोरोना चाचणी करा, त्यांचे वाहन जप्त करा तसेच न ऐकल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा, असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

- इब्राहिम चौधरी, उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे