शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'अमरावतीतील घटनाक्रम दुर्दैवी; मोर्चाला परवानगी कुणी दिली? याची चौकशी करावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 14:57 IST

राजकीय दबावाखाली येऊन पोलीस एकतर्फी कारवाई करत असतील तर, आम्ही याचा निषेध करून भाजपचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे येऊन जेलभरो आंदोलन करू, असे फडणवीस म्हणाले.

ठळक मुद्देराज्यातील वेगवेगळ्या शहरात एकाच दिवशी मोर्चे कसे निघाले ? फडणवीसांचा सवाल

अमरावती : अमरावतीत १२ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेला मोर्चा हा चुकीच्या माहितीच्या आधारे आयोजित करण्यात आला. हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत दुर्दैवी आहे, याची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज अमरावतीत बोलत होते.

त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यामध्ये अनेक आस्थापनांची तोडफोड करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज रविवारी अमरावती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली.

इतके मोठे मोर्चे राज्यातील वेगवेगळ्या शहरात एकाच दिवशी निघतात, अमरावतीमध्ये १२ नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चाला परवानगी होती का, किती लोकांना परवानगी देण्यात आली, कोणी परवानगी दिली? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. फेक न्युजच्या आधारे हे मोर्चे प्लॅन केले गेले. समाजाला भडकवण्यात आलं. दंगल भडकवण्यासाठी समाजकंटकांनी एका विशिष्ट समुदायाच्या आस्थापनांना, लोकांना टार्गेट करण्यात आलं. असे सांगत १२ तारखेची घटना घडली नसती तर १३ तारखेची घटना घडली नसती असेही फडणवीसांनी म्हटले. 

कुठल्याच हिंसेंच समर्थन केल जाऊ शकत नाही. मात्र, पोलीस १३ तारखेला घडलेल्या घटनेवर कारवाई करत आहेत. परंतु, १२ तारखेच्या मोर्चाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हे अत्यंत चुकीचे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यासोबतत, भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली असून असून त्यांना मारहाणही करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. एकतर्फी कारवाई करायची असेल, खोट्या गुन्ह्यात अडकावयाचे असेल तर आम्ही भाजप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसह जेलभरो आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :PoliticsराजकारणAmravatiअमरावतीTripuraत्रिपुराDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा