शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'अमरावतीतील घटनाक्रम दुर्दैवी; मोर्चाला परवानगी कुणी दिली? याची चौकशी करावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 14:57 IST

राजकीय दबावाखाली येऊन पोलीस एकतर्फी कारवाई करत असतील तर, आम्ही याचा निषेध करून भाजपचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे येऊन जेलभरो आंदोलन करू, असे फडणवीस म्हणाले.

ठळक मुद्देराज्यातील वेगवेगळ्या शहरात एकाच दिवशी मोर्चे कसे निघाले ? फडणवीसांचा सवाल

अमरावती : अमरावतीत १२ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेला मोर्चा हा चुकीच्या माहितीच्या आधारे आयोजित करण्यात आला. हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत दुर्दैवी आहे, याची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज अमरावतीत बोलत होते.

त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यामध्ये अनेक आस्थापनांची तोडफोड करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज रविवारी अमरावती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली.

इतके मोठे मोर्चे राज्यातील वेगवेगळ्या शहरात एकाच दिवशी निघतात, अमरावतीमध्ये १२ नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चाला परवानगी होती का, किती लोकांना परवानगी देण्यात आली, कोणी परवानगी दिली? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. फेक न्युजच्या आधारे हे मोर्चे प्लॅन केले गेले. समाजाला भडकवण्यात आलं. दंगल भडकवण्यासाठी समाजकंटकांनी एका विशिष्ट समुदायाच्या आस्थापनांना, लोकांना टार्गेट करण्यात आलं. असे सांगत १२ तारखेची घटना घडली नसती तर १३ तारखेची घटना घडली नसती असेही फडणवीसांनी म्हटले. 

कुठल्याच हिंसेंच समर्थन केल जाऊ शकत नाही. मात्र, पोलीस १३ तारखेला घडलेल्या घटनेवर कारवाई करत आहेत. परंतु, १२ तारखेच्या मोर्चाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हे अत्यंत चुकीचे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यासोबतत, भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली असून असून त्यांना मारहाणही करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. एकतर्फी कारवाई करायची असेल, खोट्या गुन्ह्यात अडकावयाचे असेल तर आम्ही भाजप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसह जेलभरो आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. 

टॅग्स :PoliticsराजकारणAmravatiअमरावतीTripuraत्रिपुराDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा